शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी पाससाठी सर्वच तहसील कार्यालयांत गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:35 IST

बीड : जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयात लॉकडाऊन काळात पास देण्याची ऑनलाइन व ऑफलाइन व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रवास ...

बीड : जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयात लॉकडाऊन काळात पास देण्याची ऑनलाइन व ऑफलाइन व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रवास पाससाठी कारण महत्त्वाचे असून, त्यासाठीच पास दिला जाणार आहे. मात्र, क्षुल्लक कारणासाठीही पासची मागणी वाढू लागल्याने, तहसील प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे, तर गरजूंना पास तत्काळ देण्यात यावेत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत. मात्र, काही कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना योग्य उत्तर दिले जात नसल्यामुळे नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे.

शुक्रवारी लॉकडाऊनचा पहिला दिवस होता. त्याच दिवशी प्रवासी पाससाठी मोठी गर्दी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात होती. जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातून पासची व्यवस्था केल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. मात्र, त्यासाठी ऑनलाइन मदत केंद्र व पास केंद्र याची पूर्व तयारी करणे गरजेची होती. पूर्वतयारी न झाल्याने नागरिकांनी पाससाठी ई-मेलवर मागणी केल्यानंतरही योग्य प्रतिसाद मिळून येत नव्हता, तर व्हॉट्सॲपच्या नंबरवरूनही प्रतिक्रिया दिली जात नव्हती. त्यामुळे संबंधित तहसील कार्यालयात पासच्या मागणीसाठी ऑफलाइन गर्दी होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली असून, नियोजन न केल्यामुळे अधिकारी, कर्मचारीही भांबावले आहेत. त्यामुळे पास यंत्रणा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून एकखिडकी कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे, तर जास्तीतजास्त प्रवासी पास हे ऑनलाइन दिले, तर नागरिकांची सोय होईल व गर्दी होणार नाही, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

सुसूत्रता आणणे गरजेचे

लॉकडाऊन करण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले होतो. त्या संदर्भात सर्व तहसीलदारांना जिल्हाधिकारी यांनी सूचनाही दिल्या होत्या. त्या पद्धतीने तहसील कार्यालयात ईमेल आयडी, व्हॉट्सॲप क्रमांक, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील हेल्पलाइन यांचे नंबर नागरिकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे होते. त्यामुळे पास व्यवस्थेत सुधारणा करून सुसूत्रता आणणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे.

लॉकडाऊन नागरिकांसाठीच

लॉकडाऊन कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी केलेले आहे. त्या संदर्भात जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संसर्ग कमी होताच टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे व क्षुल्लक कारणास्तव प्रवासी पासचा हट्ट धरू नये, कोरोना काळात आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.