शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

त्यांना घरी तर, आम्हाला शाळेत का ठेवले ? नित्रुड येथील ११ बाधितांनी शाळा सोडून घर गाठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 8:13 PM

बाहेरून आलेल्या नातेवाईकांना सरपंचाने घरीच क्वारंटाईन केल्याचे कळताच शाळेतील अनेक जण आले घरी

ठळक मुद्देकाहीजणांना थेट घरीच होमक्वारंटाईन करण्याचा प्रकार

- पुरूषोत्तम करवा माजलगाव : तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढतच चाललेला असताना गुरुवारी पुन्हा १२ रुग्ण पॉझिटीव्ह निघाले असून यातील  ११ रुग्ण नित्रुड तर, एकजण सुर्डी येथील आहे. नित्रुडचे सर्वजण मुंबईहुन आलेले असून सुरवातीला त्यांना जिल्हा परिषद शाळेत ठेवण्यात आले होते; परंतु सरपंचाच्या नातेवाईकांना घरी ठेवण्यात आल्याने शाळेत ठेवण्यात आलेले घरी निघुन गेले.त्यानंतर ते अनेकांच्या संपर्कात आल्याचे बोलले जात आहे.

चार दिवसापूर्वी जिल्ह्यासह तालुक्यात एकही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण नव्हता परंतु; हिवरा येथील मुंबईहून आलेला एकजण तर, दोन दिवसानंतर बाजूलाच असलेल्या कवडगावथडी येथील मुंबईहूनच आलेले दोघेजणांना कोरोनाची लागन झाल्याचे रिपोर्ट आले होते. यामुळे माजलगाव तालुका चांगलाच हादरला आहे. त्यानंतर गुरुवारी तालुक्यातील तब्बल १२ रुग्णांचे रिपोर्ट हे पॉझिटीव्ह आल्याने एकाच खळबळ उडाली आहे. यात सुर्डी (न.) येथील एकजण तर, नित्रुड येथील तब्बल ११ रुग्णांचा समावेश आहे. नित्रुड येथील एकाच कुटुंबातील ११ पॉझिटीव्ह हे मुंबईतील तुर्भे उपनगरातून  १५ मे रोजी रात्री ११ वाजता एका खाजगी वाहनातून विनापरवाना आलेले होते.

सुरवातीला सर्व नागरिकांना नित्रुड प्रशासनाने जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते; परंतु सरपंचाचे नातेवाईक मुंबईतुन आलेला एक तर सोलापूर येथून आलेल्या दोन जनांना ग्रामपंचायत प्रशासनाने होमक्वारंटाईन करून घरी ठेवल्याची माहिती या ११ लोकांना कळाली. यामुळे त्यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून त्यांना घरी तर, आम्हाला शाळेत का ठेवले ? आम्हालाही घरीच जायचे असे म्हणत ते थेट घरी निघून गेल्याची माहिती नित्रुड येथील नागरिकांनी दिली. त्यानंतर त्यांच्यावर कोणाचाच अंकुश न राहिल्याने ते गावासह इतर गावांच्याही लोकांच्या संपर्कात आल्याचीही माहिती पुढे येत आहे. गुरुवारी त्या ११ जणांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. जो तो काळजी करू लागला असून आणखी कोण कोण संपर्कात आले याची चर्चा परिसरात होऊ लागली आहे. तालुक्यात आतापर्यंत पॉझिटीव्ह निघालेले १५ जन हे सर्व मुंबईहूनच आलेले होते. यामुळे तालुक्यात मुंबई, पुण्यासारख्या शहरातून आलेल्या नागरिकांवर स्थानिकांच्या नजरा खिळल्या असून त्यांना प्रतिबंध केल्यास स्थानिकांशी हुज्जत घालण्याचे प्रकार घडत आहेत.

गावागावात होऊ लागले राजकीय हेवेदावेआठ दिवसापूर्वी तालुक्यातील ग्रामीण भागात मुंबई, पुणे, औरंगाबाद यासारख्या शहरातून मोठ्याप्रमाणात नागरिकांची आवक झाली आहे. स्थानिक पातळीवरच्या राजकीय हेवेदाव्यामुळे यातील काही जणांना स्वतंत्र क्वारंटाईन कक्षात तर, काहीजणांना थेट घरीच होमक्वारंटाईन करण्याच प्रकार होत आहे. यामुळे सर्वजण घरीच जाण्याची घाई करीत असल्याने रुग्णसंख्या वाढण्याला कारणीभूत ठरत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड