शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावर्षात ग्राहक घरीच, तक्रारी घटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:03 IST

२०१९ मध्ये जिल्ह्यात विविध ३०९ प्रकरणे दाखल होती. त्यापैकी २४६ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. तर विविध कारणे, ...

२०१९ मध्ये जिल्ह्यात विविध ३०९ प्रकरणे दाखल होती. त्यापैकी २४६ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. तर विविध कारणे, तांत्रिक अडचणींमुळे ४६ प्रकरणे प्रलंबित असलीतरी त्यांचा निपटारा करण्याची कार्यवाही सुरू आहे. मागील संपूर्ण वर्ष कोरोना लॉकडाऊनमुळे ग्राहकांकडून येणाऱ्या तक्रारी घटल्या. एप्रिल आणि मेमध्ये एकही तक्रार दाखल झाली नाही.

--------

ग्राहकांमध्ये पुरेशी जागरूकता नसल्याने अनेक प्रकरणात तांत्रिक बाबी उद‌्भवतात. काही प्रकरणांमध्ये ठोस पुरावा सादर करण्यास अडचणी येतात. तर काही प्रकरणात कराव्या लागणाऱ्या शासकीय तपासण्यांचे शुल्क जास्त असल्याने व ते तक्रारदाराला पेलवणारे नसते, त्यामुळे ते खचतात.

-------

तक्रारींचे स्वरूप

पीक विमा हप्ता भरला परंतू न मिळणे, विलंब , बँकेकडून मिळणारी सेवा, महावितरणकडून मिळणारे जादा रकमेचे बील, रिडींग, ट्रान्सपोर्ट, इलेक्ट्रॉनिक वस्तुंची वॉरंटी असताना पुरेशी सेवा न मिळणे, दूरसंचार, मोबाईल बिल, गृहनिर्माण, मेडीकल क्षेत्रातील निष्काळजीपणा आदी प्रकारच्या तक्रारींचे स्वरूप असते.

-------

बोगस बियाणांबाबत शेतकरी आयोगाकडे तक्रार करतात. परंतू जे बियाणे पेरले त्यापैकी काही बियाणे पुरावा म्हणून सांभाळून ठेवत नसल्याने अनेक प्रकरणात पेच निर्माण होतो. अनेक शेतकरी शेततळ्यासाठी अस्तारीकरणाचे प्लॅस्टिक खरेदी करतात, नंतर त्याची तक्रार येते. कंपनीच्या बाजुने युक्तीवादानंतर अशा प्लॅस्टिकचे आयएसओ तपासणे महत्वाचे असते, परंतू या तपासणीसाठीचे शुल्क क्षमतेपेक्षा जास्त असल्याने अशा प्रकरणात शेतकरी हतबल होतात. न्याय मिळण्यासही मर्यादा येतात.

----------

२०२० मध्ये दाखल तक्रारी

जानेवारी २३

फेब्रुवारी १५

मार्च ०९

एप्रिल ००

मे ००

जून १०

जुलै १३

ऑगस्ट ०५

सप्टेंबर ३६

ऑक्टोबर ३१

नोव्हेंबर १८

डिसेंबर ४१

एकूण २०१

----------

२०२० मधील दाखल तक्रारी -२०१

निकाली - २७

--------

२०१९ मधील दाखल तक्रारी ३०९

निकाली २४६

----------

ग्राहक संरक्षक कायद्याबाबत लोकशिक्षणाची गरज आहे. ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे काम कसे चालते, त्याचे फायदे याबाबत लोकजागृती कमी आहे. विविध ठिकाणी होणाऱ्या कायदेविषयक शिबिरांमध्ये ग्राहक संरक्षण कायद्याबाबत जनजागृती व्हावी म्हणून आम्ही वरिष्ठांना कळविले आहे. - श्रीधर किशनराव कुलकर्णी, अध्यक्ष, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, बीड.

---------