शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
2
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
3
स्वस्त झाला सिलिंडर; आजपासून किती रुपयांना मिळणार, पाहा ATF च्या किंमतीत किती झाला बदल?
4
जाहीर सभेत अजित पवारांचा 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख; दादा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले...
5
काळीज हेलावणारी घटना! ७ वर्षांच्या लेकाला वाचवण्यासाठी धावली, आणि भरधाव बसने आईला चिरडले; तीन लेकरांसमोर मातेचा मृत्यू
6
वैभव सूर्यवंशीचा टीम इंडियात धमाका; बिहारमध्ये गेल्यावर बॅटला लागलं 'ग्रहण'
7
खळबळजनक! 'तो' वाद टोकाला गेला, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच विवाहितेसोबत घडलं भयंकर
8
'तुम्ही चर्चा करत नाही, तो ड्रामा'; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
SIP ला लावा 'टॉप-अप'चा बुस्टर! दरवर्षी रक्कम वाढवा आणि तुमचं आर्थिक लक्ष्य वेळेआधी पूर्ण करा!
10
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक समायोजनाला बसला ब्रेक, समायोजन स्थगित; आता २०२५-२६ च्या संचमान्यतेनंतरच प्रक्रिया
11
हनिमूनच्या रात्री नवरी फक्त 'हे' म्हणाली, नवरदेव निघून गेला अन् परतलाच नाही; नेमकं काय घडलं?
12
नोकरी करणं गरज नाही तर केवळ छंद राहिल; Nikhil Kamath यांच्या पॉडकॉस्ट मध्ये Elon Musk यांची भविष्यवाणी
13
निवडणुका रद्द करण्याचा निर्णय चुकीचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक आयोगावर टीका
14
स्मृती मंधानाला चीट केल्याची चर्चा, लग्नही पुढे ढकललं; सर्व प्रकारानंतर पलाश मुच्छल पहिल्यांदाच दिसला
15
चायनामन कुलदीपची कमाल! शेन वॉर्नचा २३ वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास
16
समांथा रुथ प्रभूने गुपचुप केलं दुसरं लग्न? 'द फॅमिली मॅन'च्या दिग्दर्शकासोबत संसार थाटल्याच्या चर्चा
17
वरमाला झाली, वधू स्टेजवरून उतरली... अन् थेट प्रियकरासोबत पळून गेली! सप्तपदीपूर्वीच लग्नात मोठा राडा
18
तंबाखू-सिगारेट महागणार तर विमा होणार स्वस्त! ९ मोठी आर्थिक विधेयकं संसदेत मांडली जाणार
19
भयंकर! विधवा सून बॉयफ्रेंडसह दिसली शेतात; संतापलेल्या सासऱ्याने दोघांना बांधलं अन् लावली आग
20
हे ठरवून करत आहेत की खरेच असे घडत आहे? राज आणि उद्धव यांची भूमिका अस्वस्थ करणारी
Daily Top 2Weekly Top 5

बायपास ते बायपास रस्त्याची डोकेदुखी होणार दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:34 IST

बीड : बीड शहरातून धुळे - सोलापूर हा महामार्ग जातो. या महामार्गाला बाह्य वळण रस्ता झाल्याने शहरातील जिरेवाडी, जालना ...

बीड : बीड शहरातून धुळे - सोलापूर हा महामार्ग जातो. या महामार्गाला बाह्य वळण रस्ता झाल्याने शहरातील जिरेवाडी, जालना रोड, बार्शी रोड या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष झाले होते. शहरातील या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात यावे, यासाठी आमदार संदीप क्षीरसागर यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. जिरेवाडी, जालना रोड, बार्शी रोड बायपास टु बायपास या बीड शहरातील मुख्य रस्त्याच्या १८ कोटीच्या कामाला मंजुरी मिळाली असून, लवकरच निविदा प्रक्रिया करून काम सुरू केले जाणार आहे.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण महाराष्ट्र डिव्हीजनचे संतोष बाजपाई यांनी या बीड शहरातील बायपासअंतर्गत रस्त्याच्या १२ कि. मी. कामाला १८ कोटी रुपये मंजूर केल्याबाबतचे पत्र नागपूर आणि औरंगाबाद विभागास प्राप्त झाले आहे. लवकरच सदर प्रश्न मार्गी लागणार असल्याने आ. संदीप क्षीरसागर यांच्या प्रयत्नांना पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून मोठे यश आले आहे.

बीड शहरातून धुळे - सोलापूर हा महामार्ग गेलेला आहे. या रस्त्याला १२ कि. मी.चा बाह्य वळण रस्ता करण्यात आला. या बायपासमुळे शहरातील मूळ रस्त्याकडे महामार्गाच्या अधिकाऱ्यांचे, यंत्रणेचे दुर्लक्ष झाले. या रस्त्याला नाल्या, त्याचे उतार, त्याचे डांबरीकरण, सिमेंट काँक्रीटीकरण, नूतनीकरण करण्यात यावे, यासाठी आ. क्षीरसागर यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. याबाबत त्यांनी प्रकल्प संचालक यांच्यापासून नागपूर, मुंबई आणि दिल्लीपर्यंत पत्र व्यवहार केला. केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत पत्र व्यवहार केलेला आहे. बीड शहरातील मुख्य रस्त्याचा प्रश्न आता मार्गी लागला असून, बायपास टू बायपास या बीड शहरातील रस्त्याच्या कामासाठी १८ कोटी रूपये मंजूर झाले.

सिमेंट, डांबरी रस्त्यासह सुशोभिकरण होणार : आ. संदीप क्षीरसागर

बीड शहरातील मुख्य रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून, बायपासअंतर्गत असलेला हा रस्ता काही ठिकाणी सिमेंट तर काही ठिकाणी डांबरी होणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी सुशोभिकरण आणि पथदिवेदेखील बसवले जाणार आहेत. गेल्या २ वर्षांपासून सदर प्रश्न प्रलंबित होता. आता लवकरच बीड शहरातील रस्त्याचा प्रश्न कायमचा मिटला जाईल, असे आ. संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.