शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

भाजपच्या मस्तवाल सत्तेचाच समारोप होईल : धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:16 IST

आमच्या सत्तेची सुरुवात ज्या परळीत झाली त्याच परळीतून तुमच्या मस्तवाल सत्तेचा समारोप होईल, असा टोला विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजपला लगावला. शुक्रवारी परळीत मुख्यमंत्र्यांनी परळी ही चांगले कार्य सुरु करण्याची भूमी, समारोपाची नाही असे विधान करत यात्रा आयोजकांचा समारोप होईल असे विधान केले होते. त्यावर शनिवारी धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले.

ठळक मुद्देकाँग्रेस - राष्ट्रवादीची परळीत संयुक्त सभा : सत्ता परिवर्तनाची वज्रमूठ आवळली

परळी : आमच्या सत्तेची सुरुवात ज्या परळीत झाली त्याच परळीतून तुमच्या मस्तवाल सत्तेचा समारोप होईल, असा टोला विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजपला लगावला. शुक्रवारी परळीत मुख्यमंत्र्यांनी परळी ही चांगले कार्य सुरु करण्याची भूमी, समारोपाची नाही असे विधान करत यात्रा आयोजकांचा समारोप होईल असे विधान केले होते. त्यावर शनिवारी धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले.राष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस आयच्या संयुक्त जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नवाब मलिक, आ.रामराव वडकुते, पीआरपी पक्षाचे अध्यक्ष आ.प्रा.जोगेंद्र कवाडे, आ. प्रकाश गजभिये, रजनी पाटील, सुमन आर.आर.पाटील, पद्मसिंह पाटील, फौजिया खान, चित्रा वाघ, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा.टी.पी.मुंडे, राजिकशोर मोदी, सुरेश नवले, ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे, सिराजभाई, गोविंद देशमुख, बजरंग सोनवणे, प्रा.सुषमा अंधारे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांच्याउपस्थितीत अंबाजोगाईतील भाजपाचे दत्ता पाटील यांच्यासह जिल्ह्यातील इतर पदाधिकाºाांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव न घेता खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, राष्ट्रवादीचा समारोप करू, असे बहिणबाई बोलल्या. राष्ट्रवादी काँग्रेस संपवणे चिक्की खाण्याइतके सोपे नाही. लोकसभा निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीत समोरासमोर या बघू कोण संपतंय असे आव्हान त्यांनी दिले.मुंडे म्हणाले, सरकारने स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नावे उसतोड कामगार महामंडळ बनवले जाईल अशी घोषणा केली. मी दुर्बिण लावून शोधलं पण ऊसतोड कामगारांचं महामंडळ काही सापडले नाही, ते महामंडळच रद्द केले. हा अपमान असल्याचे ते म्हणाले.आमच्या वाटेला जाऊ नका. जशाला तसं उत्तर द्यायची धमक आमच्यात आहे. अमित शाह तडीपार आहे, तुम्ही कोणावर आरोप करता ? आधी १६ मंत्र्यांच्या जे भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढले आहे त्याची चौकशी करा असा टोला त्यांनी लगावला.मोदींच्या काळात ७३१ जवान शहीद झाले४सभेदरम्यान छगन भुजबळ म्हणाले, मी काही घाबरणारा नेता नाही. हे सरकार शहीद जवानाच्या नावावर राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. दहशतवादी हल्ल्यांनी देश दु:खी असताना भाजपवाले राम मंदिर वही बनाएंगे असे म्हणतात, अशी टीका भुजबळ यांनी केली. मोदींच्या काळात ७३१ जवान शहीद झाले. सीमेवरील जवानही भाजपच्या काळात सुरक्षित नाही. कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे भुजबळ म्हणाले. देशातील सीबीआयसारख्या संस्था भाजप सरकारने मोडकळीस आणल्या. माध्यमांची कोंडी केली जाते. मोदी यांची मन की बात नौटंकी आहे. चहा विकला असे सांगणाऱ्या मोदींनी चहाप्रमाणे देश विकू नये असा टोला त्यांनी लगावला.

टॅग्स :Beedबीडcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारDhananjay Mundeधनंजय मुंडे