शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

बीड जिल्ह्यात अवैध वाळू उपस्यावरील १४७ कारवायांमधून दीड कोटीचा  दंड वसूल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 19:17 IST

जिल्ह्यातील ५ उपविभागीय मंडळात अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाºयांकडून मार्च महिन्यापासून १ कोटी ५७ लाख ६७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

बीड : जिल्ह्यातील ५ उपविभागीय मंडळात अवैध वाळू उपसा व वाहतूक करणा-यांकडून मार्च महिन्यापासून १ कोटी ५७ लाख ६७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तरी देखील जिल्ह्यातील बंद असलेल्या वाळू घाटांवरुन अवैध वाळू उपसा होत असल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्यात २०१८-१९ वर्षासाठी ५ वाळू घाटांचे लिलाव करण्यात आले होते. त्यामधून शासनाला १ कोटी ८० लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. ज्यांना हे लिलाव दिलेले आहेत त्यांना वाळू उपसा करण्यासंदर्भांत काही नियम व अटी ठरवून दिलेल्या आहेत. मात्र, हे सर्व नियम पायदळी तुडवत जिल्ह्यात अवैध वाळू उपसा सुरू आहे.

आतापर्यंत १४७ अवैध वाळू वाहतूक करणाºयांवर कारवाई केली आहे. यामध्ये ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले असून, दंड वसुली करण्यात आलेली आहे. माजलगाव तालुक्यात ३, बीडमध्ये २ व अंबाजोगाईत १ असे ५ वाळू घाट अधिकृतरित्या वाळू उपसा करण्याची परवानगी आहे. मात्र, या ठिकाणाहून देखील रोज करण्यात येणाºया उपसा क्षमतेपेक्षा अधिक वाळू साठा काढला जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. या वाढत्या उत्खननामुळे नद्यांमध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. तसेच ज्या गावांमधून वाळूचे वाहने जातात त्या गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या विषयी अनेक वेळा प्रशासनाक डे तक्रार करुन देखील कुठलीही कारवाई केली जात नाही.  

वाळूची किंमत ठरवावी उपसा केलेली वाळू अव्वाच्या सव्वा किंमतीने विक्री केली जाते. ग्राहकांना प्रत्येक ब्रासला किती भाव आहे, याविषयी शासनाने धोरण ठरवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

या वाळू घाटांवरून होतो अवैध वाळू उपसा जिल्ह्यातील रंजेगाव, खुंडरस, हिवरा, नाथापूर, गोदावरी काठावरील गावांमधून वाळू उपसा होत असल्याची माहिती आहे. बीड तालुक्यातील रंजेगाव याठिकाणी कलम १४४ लागू असताना देखील येथून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा केला जातो. तसेच याठिकाणी वाळू उपसा करणाºयांकडे पोलीस प्रशासन व महसूल यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे. गाडी चालकांकडून २० ते ३०  हजार रुपये हप्ता पोलिसांकडून घेतला जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी ११ पथके जिल्ह्यात कार्यरत आहेत. यामध्ये महसूल, पोलीस प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी सहभागी आहेत. मंडळनिहाय कारवाई करण्यासाठी कर्मचारी नेमलेले आहेत. यामुळे मोठ्या प्रमात अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर प्रतिबंध आले आहेत, असे गौण खनिकर्म अधिकारी आनंद पाटील यांनी सांगितले

कारवायांची आकडेवारी(मार्च ते जुलै २०१८)तालुका    कारवाया    दंड (लाखात)बीड                ३    ६.२१गेवराई          १९    २९.७५शिरुर            १७    १४.७५आष्टी            ५    २.८०पाटोदा           २    ०.८१माजलगाव    ८८    ८५.३४धारुर              १    २.८५वडवणी          २    ०.८१अंबाजोगाई    ३    १.३०केज               २    ०.३९परळी             ६    १२.६६एकूण        १४७    १५७.६७

टॅग्स :sandवाळूTahasildarतहसीलदारTaxकर