बांधकामाच्या पाण्यासाठी आटापिटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:25 IST2021-05-31T04:25:08+5:302021-05-31T04:25:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : तालुक्यातील शिवार पाणीदार आहे; पण घरातील रांजन कोरडा ठाक पडल्याची स्थिती काही गावांत पाहायला ...

बांधकामाच्या पाण्यासाठी आटापिटा
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : तालुक्यातील शिवार पाणीदार आहे; पण घरातील रांजन कोरडा ठाक पडल्याची स्थिती काही गावांत पाहायला मिळत आहे. घोटभर पाण्यासाठी शिवारभर भटकंती करावी लागते. मग बांधकामासाठीच्या पाण्याचा विचार न केलेलाच बरा म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. काही नागरिक बांधकाम करण्यासाठी कोसो दूर पाईप अंथरून बांधकामाच्या पाण्यासाठी जिवाचा आटापिटा करत बांधकाम करत आहेत.
बहुतेक गावे उन्हाळ्यात तर काही गावे बारा महिने तहानलेली आहेत. मग बांधकाम कसे करायचे? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. घरकुल व इतर बांधकामे केवळ पाण्यामुळे बंद पडले आहेत. गावालगतचे जलस्त्रोतही कोरडे पडले आहेत. बांधकामास तर पाणी मुबलक लागते. मग अशा परिस्थितीत बांधकाम करणे तारेवरची कसरत बनली आहे. यंदा पाण्याची कमतरता आहे. सिमेंटचे दुकान बंद, रेती मिळणे मुश्कील झाले आहे. पावसाळा जवळ आल्याने विटांचे भाव कडाडले आहेत. अशा परिस्थितीत बांधकाम करणे कठीण झाले आहे. पाण्याअभावी अनेकांच्या घरकुलांचे कामे रखडली आहेत. बांधकाम कसे करायचे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
....
गावात पिण्यासाठी पाणी नाही. जलस्रोत कोरडे पडले आहेत. बांधकामास लागणारे सर्व बांधकाम साहित्य लॉकडाऊनपूर्वीच खरेदी केले आहे पण पाणी नाही. त्यामुळे बांधकाम रखडले आहेत. जसे पाणी मिळेल तसा भिंतीची थर देणे सुरू आहे. बांधकामास मुबलक पाणी लागत असल्यामुळे पाईपाची जमवाजमव करून दोन किलोमीटर पाईप अंथरून शेतातून पाण्याची व्यवस्था केली आहे.
- तानाजी शिंदे, नागरिक, सुगाव.
===Photopath===
300521\avinash mudegaonkar_img-20210528-wa0096_14.jpg
===Caption===
ग्रामीण भागात बांधकामासाठी पाणी टंचाई जाणवत आहे. यासाठी दूरवरुन पाई्प अंथरुन पाणी आणावे लागत आहे.