शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

पाणीउपसा रोखण्यासाठी प्रशासनाची आडमुठी भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 1:09 AM

काही ठिकाणी पाणी उपसा होत असल्याने आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना असताना पाटबंधारे विभागाकडून महावितरणच्या मदतीने विद्यूत पुरवठा खंडित केला जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, तसेच सर्व तलाव, गोदावरी नदी व इतर पाणी पुवठा करणाऱ्या ठिकाणावरुन पाणी उपसा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणी पाणी उपसा होत असल्याने आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना असताना पाटबंधारे विभागाकडून महावितरणच्या मदतीने विद्यूत पुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांना वेळोवेळी वीज खंडित होत असल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.गोदापट्टा किंवा जलसाठवण तलाव तसेच इतर मोठ्या प्रकल्पातून पाणी उपसा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरी देखील काही ठिकाणी मोटारी टाकून ऊस व इतर बागायती पिकांना पाणी दिले जात आहे. त्यांच्या मोटारी जप्त करुन कारवाई करण्याऐवजी महावितरणकडून विद्यूत पुरवठा खंडित करुन पाणी उपसा रोखण्याचा फसवा प्रयत्न पाटबंधारे विभागाकडून केला जात आहे. मात्र, याचा फटका सामान्य शेतक-यांना बसत असल्याचे गेवराई, माजलगाव, धारुर व इतर गोदाकाठावरील शेतक-यांकडून सांगण्यात आले. या परिसरात अनेक शेतक-यांच्या वहिरींना व बोअरला थोडेफार पाणी शिल्लक आहे. या पाण्यावर शेतकरी आपल्या जनावरांना पाणी पाजतात, तसेच दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पाणी वापरले जाते. परंतु विद्यूत पुरवठा खंडित केल्यामुळे पाणी उपसा करता येत नाही.गेवराई शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या जायकवाडी प्रकल्पातून पाणी सोडले जाते. हे पाणी गोदापात्रातून शहागड बंधाºयात येते. मात्र, या पाण्याचा शेतकरी उपसा करतात अशी भूमिका घेत नगरपालिकेने पाटबंधारे विभाग आणि महावितरण यांच्यावर दबाव वाढविला आहे. पाण्याचा विनापरवाना उपसा होत असेल तर अशा मोटारी जप्त करणे अथवा कारवाई अपेक्षित आहे. संबंधित कार्यालयांकडून महावितरणला हाताशी धरून या परिसरातील वीजपुरवठाच खंडित ठेवण्याची नवी शक्कल लढवली जात आहे. याचा फटका सर्वसामान्य शेतक-यांना बसत आहे. तात्काळ हा वीजपुरवठा खंडित करण्याचा खेळ थांबवा अन्यथा सर्व संबंधित कार्यालयांवर आंदोलन केले जाईल, असा इशारा देखील गोदाकाठावरील शेतक-यांनी दिला आहे.मागील ५ दिवसांपासून वीजपुरवठा खंडितगोदाकाठच्या गावांचा वीज पुरवठा मागच्या ४ ते ५ दिवसांपासून सातत्याने बंद करण्यात येत आहे.ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिका-यांना विचारल्यास ‘आम्हाला पाटबंधारे विभागाने पत्र दिले आहे’ असे सांगून अधिकारी मोकळे होतात.वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतक-यांना स्वत:च्या विहिरीतून पाणी काढून जनावरांना पाणी कसे पाजायचे हा प्रश्न पडला आहे.गावात टँकरला दूषित पाणी येते. मग घरी माणसांना पिण्यासाठी पाणी कोठून न्यायचे असे अनेक प्रश्न शेतक-यांसमोर उभा राहिला आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प