शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

बीडच्या ३० समस्या अन् प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारात; शिवसेना जिल्हाप्रमुखांनी मांडल्या मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 2:05 PM

यातील बहुतांश प्रश्न मार्गी लावण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी आश्वासन दिल्याचेही सांगण्यात आले.

बीड : मागासलेला जिल्हा अशी ओळख बीडची आहे. ती पुसून काढण्यासाठी जिल्ह्यातील समस्या आणि प्रश्न मार्गी लावण्याची आवश्यकता आहे. अशाच ३० मुद्यांची यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंबईत जिल्हाप्रमुखांची बैठक झाली. यात जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी पाणी, वीज, रस्ता, आरोग्य आदी मुद्यांची मांडणी केली.

सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी साठवण तलाव आणि बंधारे उभारल्यास शेतकरी स्वावलंबी आणि समाधानी होईल. शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या शेतीमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात यावी. शेतीमाल साठवण्यासाठी शासकीय शीतगृह उपलब्ध करून देण्यात यावेत. फळ संशोधन केंद्र उभारण्यात यावे. मंजूर झालेल्या सिताफळ संशोधन केंद्राला निधी आणि जास्तीचे अधिकार देण्यात यावेत. मत्स्य उद्योग भराभराटीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात यावे, अतिरिक्त ऊस गाळपासाठी नियोजन लावण्यात यावे नसता शेतकऱ्याना अनुदान देण्यात यावे. शेततळ्यांसाठी अनुदान वाढवावे, शेत तिथे रस्ता यासाठी जास्तीचा निधी द्यावा. बालाघाट डोंगरामध्ये सौर ऊर्जा, सोलार योजनेला प्रोत्साहन देण्यात यावे. वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी देण्यात यावी. ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. अभ्यासासाठी मार्गदर्शन केंद्र आणि अत्याधुनिक अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात याव्यात. आरोग्य सुविधा तातडीने मिळाव्यात यासाठी ग्रामीण रुग्णालयांची संख्या वाढवावी. जिल्हा शासकीय रुग्णालयात खाटांची संख्या अपुरी पडत आहे. २०० खाटांचे रुग्णालय मंजूर झाले आहे. मात्र, अजून १०० खाटांचे रुग्णालय याच ठिकाणी होणे आवश्यक आहे. नगर ते परळी रेल्वे मार्गाचे काम मंद गतीने आहे. राज्य सरकारने ठरलेला हिस्सा तातडीने देऊन या रेल्वे मार्गाला गतिमान करावे. कायमस्वरूपी पोलीस अधीक्षक देण्यात यावे. पर्यटन व तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांना आणि भाविकांना बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करण्यात यावे, आदी मुद्यांची मांडणी बीड शिवसेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी केली. यातील बहुतांश प्रश्न मार्गी लावण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी आश्वासन दिल्याचेही सांगण्यात आले.

शिवसेनेचा सामाजिक प्रश्नांवर भर जिल्हाप्रमुखांची मुंबईत बैठक झाली आहे. यात आपण जिल्ह्यातील विविध महत्त्वाचे आणि जिव्हाळ्याचे असणारे प्रश्न व समस्यांचे ३० मुद्दे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले. यातील बहुतांश मुद्दे साेडविण्याचे अश्वासनही दिले आहे. बीड जिल्हा शिवसेनेच्यावतीने सामाजिक प्रश्नांवर जास्त भर दिला जात आहे.- अनिल जगताप, जिल्हाप्रमुख शिवसेना

टॅग्स :BeedबीडUddhav Thackerayउद्धव ठाकरे