शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Beed: महिनाभर ऊस तोडून घेतला, पैसे मागताच डांबलं; मजुरांकडूनच घेतले 28000 हजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 16:38 IST

बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा मुद्दा सध्या राज्यभर गाजत असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमधील एका ठेकेदाराने मध्य प्रदेशातून १६ जणांना ऊसतोडीसाठी आणलं आणि डांबून ठेवलं. 

Beed Latest News: दिवसाला ५०० रुपये मजुरी देऊ, असे सांगत त्यांना ऊसतोड करण्यासाठी आणण्यात आले. महिनाभर ऊस तोडून घेतला. मजुरांनी पैसे मागितले आणि घरी जाण्याचा विषय काढताच त्यांना डांबण्यात आलं. एका गावात त्यांना २४ तास ओलीस ठेवण्यात आलं. इतकंच नाही, तर मजुरांच्या कुटुंबीयांकडून पैसे उकळले. सुटका झाल्यानंतर मध्य प्रदेशात पोहोचलेल्या कामगारांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ही व्यथा सांगितली. त्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलं. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची जोरात चर्चा सुरू आहे. यावरून वातावरण तापलेलं असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

बीडमधील एका ऊसतोड मुकादमाने ऊसतोडीसाठी मध्य प्रदेशातील १६ मजुरांना आणले. दिवसाला ५०० रुपये मजुरी देण्यात येईल, असे या मजुरांना सांगण्यात आले होते. हे मजूर बीडमध्ये आले. त्यांच्याकडून महिनाभर ऊसतोड करून घेतली गेली. 

पैसे देण्यास मुकादमाने दिला नकार

डांबून ठेवण्यात आलेले हे सर्व मजूर मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील कुठला तालुक्यातील आहेत. या मजुरांनी सुटका झाल्यानंतर घर गाठले आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सगळा घटनाक्रम सांगितला. 

डांबून ठेवण्यात आलेल्या १६ मजुरांपैकी एक असलेल्या हरी सिंह यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील बीडमध्ये ऊस तोडण्यासाठी नेण्यात आले होते. ५०० रुपये मजुरी देण्यात येईल असे सांगितले होते. पण, तिथे गेल्यानंतर मुकादमाने आमच्याकडून काम करून घेतले. त्यानंतर आम्हालाच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. डांबून ठेवले आणि सोडण्यासाठी आमच्याकडूनच पैसे घेतले. आमच्या कुटुंबीयांनी २८ हजार ऑनलाईन पाठवल्यानंतर आम्हाला सोडण्यात आले.

प्रत्येकाच्या कुटुंबाने प्रत्येकी १६०० रुपये जमा करून २८००० रुपये जमवले. त्यानंतर ते मुकादमाला देण्यात आले, असे एका मजुराने जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. 

शिव सिंह नावाच्या मजुराने सांगितले की, ऊसतोडीसाठी आम्ही गेलो होतो. सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत काम करायचो. यासाठी ५०० रुपये मजुरी देऊ असे सांगितले होते. पण, एक महिना झाला. त्यानंतर ते म्हणाले की आणखी काम करा. आम्ही घरी जायचा विषय काढला, तर आम्हाला जीवे मारण्याची धमक्या दिल्या जाऊ लागल्या. त्यानंतर आम्हाला २४ तास डांबून ठेवण्यात आले. 

जिल्हाधिकारी म्हणाले की, 'मजुरी करण्यासाठी य मजुरांना महाराष्ट्रात नेण्यात आले होते. बरेच दिवस त्यांनी काम केले, पण त्यांना पैसे देण्यात आलेच नाही. त्यांना घरी जाऊ देण्यासाठी पैसे घेण्यात आले. हे बेकायदेशीर आहे आणि तक्रारीच्या आधारे पोलीस अधीक्षक आणि कामगार अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीsugarcaneऊसPoliceपोलिसBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या