शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

Beed: महिनाभर ऊस तोडून घेतला, पैसे मागताच डांबलं; मजुरांकडूनच घेतले 28000 हजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 16:38 IST

बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा मुद्दा सध्या राज्यभर गाजत असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमधील एका ठेकेदाराने मध्य प्रदेशातून १६ जणांना ऊसतोडीसाठी आणलं आणि डांबून ठेवलं. 

Beed Latest News: दिवसाला ५०० रुपये मजुरी देऊ, असे सांगत त्यांना ऊसतोड करण्यासाठी आणण्यात आले. महिनाभर ऊस तोडून घेतला. मजुरांनी पैसे मागितले आणि घरी जाण्याचा विषय काढताच त्यांना डांबण्यात आलं. एका गावात त्यांना २४ तास ओलीस ठेवण्यात आलं. इतकंच नाही, तर मजुरांच्या कुटुंबीयांकडून पैसे उकळले. सुटका झाल्यानंतर मध्य प्रदेशात पोहोचलेल्या कामगारांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ही व्यथा सांगितली. त्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलं. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची जोरात चर्चा सुरू आहे. यावरून वातावरण तापलेलं असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

बीडमधील एका ऊसतोड मुकादमाने ऊसतोडीसाठी मध्य प्रदेशातील १६ मजुरांना आणले. दिवसाला ५०० रुपये मजुरी देण्यात येईल, असे या मजुरांना सांगण्यात आले होते. हे मजूर बीडमध्ये आले. त्यांच्याकडून महिनाभर ऊसतोड करून घेतली गेली. 

पैसे देण्यास मुकादमाने दिला नकार

डांबून ठेवण्यात आलेले हे सर्व मजूर मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील कुठला तालुक्यातील आहेत. या मजुरांनी सुटका झाल्यानंतर घर गाठले आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सगळा घटनाक्रम सांगितला. 

डांबून ठेवण्यात आलेल्या १६ मजुरांपैकी एक असलेल्या हरी सिंह यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील बीडमध्ये ऊस तोडण्यासाठी नेण्यात आले होते. ५०० रुपये मजुरी देण्यात येईल असे सांगितले होते. पण, तिथे गेल्यानंतर मुकादमाने आमच्याकडून काम करून घेतले. त्यानंतर आम्हालाच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. डांबून ठेवले आणि सोडण्यासाठी आमच्याकडूनच पैसे घेतले. आमच्या कुटुंबीयांनी २८ हजार ऑनलाईन पाठवल्यानंतर आम्हाला सोडण्यात आले.

प्रत्येकाच्या कुटुंबाने प्रत्येकी १६०० रुपये जमा करून २८००० रुपये जमवले. त्यानंतर ते मुकादमाला देण्यात आले, असे एका मजुराने जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. 

शिव सिंह नावाच्या मजुराने सांगितले की, ऊसतोडीसाठी आम्ही गेलो होतो. सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत काम करायचो. यासाठी ५०० रुपये मजुरी देऊ असे सांगितले होते. पण, एक महिना झाला. त्यानंतर ते म्हणाले की आणखी काम करा. आम्ही घरी जायचा विषय काढला, तर आम्हाला जीवे मारण्याची धमक्या दिल्या जाऊ लागल्या. त्यानंतर आम्हाला २४ तास डांबून ठेवण्यात आले. 

जिल्हाधिकारी म्हणाले की, 'मजुरी करण्यासाठी य मजुरांना महाराष्ट्रात नेण्यात आले होते. बरेच दिवस त्यांनी काम केले, पण त्यांना पैसे देण्यात आलेच नाही. त्यांना घरी जाऊ देण्यासाठी पैसे घेण्यात आले. हे बेकायदेशीर आहे आणि तक्रारीच्या आधारे पोलीस अधीक्षक आणि कामगार अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीsugarcaneऊसPoliceपोलिसBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या