शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

​परीक्षेला जाण्यापूर्वी....!!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2016 18:04 IST

परीक्षा द्वितीय सत्राची असो की अंतिम सत्राची, विद्यार्थ्यांमध्ये ताणतणाव वाढतोच.

रवींद्र मोरे परीक्षा द्वितीय सत्राची असो की अंतिम सत्राची, विद्यार्थ्यांमध्ये ताणतणाव वाढतोच. यावेळी त्यांच्यावर मानसिक दडपण येतच असते. कारण केलेल्या मेहनतीचा खरा कस परीक्षांमध्येच लागत असतो. याकाळात विद्यार्थ्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्याच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. मग परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना नेमका कोणता आहार द्यावा? कोणता आहार टाळावा? तसेच परीक्षेला जाण्यापूर्वी काय काळजी घ्यावी, याबाबत आजच्या सदरात ‘लोकमत’ सीएनएक्सने घेतलेला आढावा...सकस आहाराचे महत्त्व-परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या मनावर विशेष दडपण असते. त्यातच आहाराच्या बाबतीत हेडसांड झाल्याने परीक्षेदरम्यान विद्यार्थी आजारी पडतात आणि त्यांचे शारीरिक संतुलनाबरोबरच मानसिक संतुलनदेखील बिघडते. म्हणूनच पालकांनी परीक्षेच्या काळात आपल्या पाल्याच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे. परीक्षेच्या काळात वाचन, मनन, चिंतन करणे तसेच अधिक गुण मिळविण्यासाठी करण्यात येत असलेली धडपड यामुळे मेंदूचे कार्य वाढते आणि पर्यायी थकतो. यामुळे शारीरिक व बौद्धीक झीज भरून काढण्यासाठी योग्य व सकस आहार देणे महत्त्वाचे आहे. यामुळे मेंदूवरील ताण तर कमी होतो शिवाय मेंदूच्या पेशींना मुबलक पोषक घटक मिळाल्याने स्मरणशक्तीदेखील वाढते. परीक्षेपूर्वी कोणता आहार घ्याल ?परीक्षेदरम्यान निरुत्साहीपणा वाटू नये म्हणून मुलांना रक्तातील साखरेचे प्रमाण वाढेल असे अन्नपदार्थांबरोबरच अधिकाधिक पोषक आहार द्यावा. त्यात सुकामेवा, मिल्कशेक, व्हेजिटेबल सॅन्डविच, फळं व पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य आदींचा समावेश असावा. तसेच परीक्षेला जाण्यापूर्वी दही व साखरदेखील द्यावी. कारण दही साखरेच्या सेवनामुळे शरीराला थंडावा मिळतो, तसेच सतत उर्जा मिळते.  परीक्षेपूर्वी कोणता आहार टाळाल ?अतिशय मेदयुक्त आणि प्रीझवेटीव्ह टाकलेले पदार्थ कटाक्षाने टाळा, कारण अशा पदार्थामुळे मुलांना परीक्षेदरम्यान थकवा जाणवेल आणि याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर पर्यायी निकालावर जाणवेल. तसेच पिझ्झा, बर्गर, वडे, समोसे, फळांचा कृत्रिम रस आदी पदार्थांचाही आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. हे पदार्थ मेंदूच्या पेशींसाठी हानीकारक असून मानसिक संतुलन बिघडते. त्यामुळे परीक्षेच्या काळात बाहेरचे काहीही न देता घरगुती बनविलेलेच अन्नपदार्थ द्यावेत. यामुळे विद्यार्थ्यांना कोणतेही पोटाचे विकार होणार नाहीत. आहाराबरोबरच पुरेशी झोप घेणे व भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. अभ्यास आणि परीक्षेबाबत काही टिप्स : जर आपल्याला परीक्षेत चांगले मार्क्स हवे असतील तर आपणास अभ्यासासाठी काही नियमावली बनवावी लागेल आणि त्याची अंमलबजावणीदेखील करावी लागेल. त्यातच मनापासून अभ्यास तर हवाच शिवाय चांगल्या पुस्तकांचे वाचनही हवे. तसेच स्वत:च्या चांगल्या नोट्सदेखील तयार करायला हव्यात. या नोट्स आपल्याला परीक्षेला जाण्यापूर्वी खूप उपयुक्त ठरतात. आपण जो काही अभ्यास केला असेल त्याचा लिखानातून वेळोवेळी सराव करावा. तसेच प्रत्येक दिवशी अभ्यासाबरोबरच मनोरंजनालाही पूरेसा वेळ द्या. जो पण अभ्सास कराल तो एकाग्रतेने करा. कारण एकाग्रतेशिवाय परीक्षेत यश मिळविणे कठीण आहे. परीक्षेची भिती नको परीक्षेबाबत उगाच भिती बाळगून मनावर ताण येऊ देऊ नये. यासाठी आहाराबरोबच पूरेशी झोप घ्या. पूरेशा झोपेअभावी आपण कोणतेच काम चांगल्या पद्धतीने करु शकत नाही. विशेषत: अभ्यासासाठी चांगली झोप अत्यंत महत्त्वाची आहे. परीक्षा कक्षेत नेहमी वेळेच्या अगोदर पोहचा. परीक्षेत अगोदर असे प्रश्न सोडवा ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सहज जमतात. कठीण प्रश्न नंतर सोडवा. परीक्षेअगोदर अशा गप्पा मारु नका, ज्यामुळे आपल्यात अनावश्यक ताण वाढेल. परीक्षेदरम्यान आपण संयमी जीवन व्यतीत करावे. तरच आपण एक यशस्वी विद्यार्थी बनू शकाल आणि जीवनातदेखील यश संपादन कराल.