शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

​परीक्षेला जाण्यापूर्वी....!!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2016 18:04 IST

परीक्षा द्वितीय सत्राची असो की अंतिम सत्राची, विद्यार्थ्यांमध्ये ताणतणाव वाढतोच.

रवींद्र मोरे परीक्षा द्वितीय सत्राची असो की अंतिम सत्राची, विद्यार्थ्यांमध्ये ताणतणाव वाढतोच. यावेळी त्यांच्यावर मानसिक दडपण येतच असते. कारण केलेल्या मेहनतीचा खरा कस परीक्षांमध्येच लागत असतो. याकाळात विद्यार्थ्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्याच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. मग परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना नेमका कोणता आहार द्यावा? कोणता आहार टाळावा? तसेच परीक्षेला जाण्यापूर्वी काय काळजी घ्यावी, याबाबत आजच्या सदरात ‘लोकमत’ सीएनएक्सने घेतलेला आढावा...सकस आहाराचे महत्त्व-परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या मनावर विशेष दडपण असते. त्यातच आहाराच्या बाबतीत हेडसांड झाल्याने परीक्षेदरम्यान विद्यार्थी आजारी पडतात आणि त्यांचे शारीरिक संतुलनाबरोबरच मानसिक संतुलनदेखील बिघडते. म्हणूनच पालकांनी परीक्षेच्या काळात आपल्या पाल्याच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे. परीक्षेच्या काळात वाचन, मनन, चिंतन करणे तसेच अधिक गुण मिळविण्यासाठी करण्यात येत असलेली धडपड यामुळे मेंदूचे कार्य वाढते आणि पर्यायी थकतो. यामुळे शारीरिक व बौद्धीक झीज भरून काढण्यासाठी योग्य व सकस आहार देणे महत्त्वाचे आहे. यामुळे मेंदूवरील ताण तर कमी होतो शिवाय मेंदूच्या पेशींना मुबलक पोषक घटक मिळाल्याने स्मरणशक्तीदेखील वाढते. परीक्षेपूर्वी कोणता आहार घ्याल ?परीक्षेदरम्यान निरुत्साहीपणा वाटू नये म्हणून मुलांना रक्तातील साखरेचे प्रमाण वाढेल असे अन्नपदार्थांबरोबरच अधिकाधिक पोषक आहार द्यावा. त्यात सुकामेवा, मिल्कशेक, व्हेजिटेबल सॅन्डविच, फळं व पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य आदींचा समावेश असावा. तसेच परीक्षेला जाण्यापूर्वी दही व साखरदेखील द्यावी. कारण दही साखरेच्या सेवनामुळे शरीराला थंडावा मिळतो, तसेच सतत उर्जा मिळते.  परीक्षेपूर्वी कोणता आहार टाळाल ?अतिशय मेदयुक्त आणि प्रीझवेटीव्ह टाकलेले पदार्थ कटाक्षाने टाळा, कारण अशा पदार्थामुळे मुलांना परीक्षेदरम्यान थकवा जाणवेल आणि याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर पर्यायी निकालावर जाणवेल. तसेच पिझ्झा, बर्गर, वडे, समोसे, फळांचा कृत्रिम रस आदी पदार्थांचाही आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. हे पदार्थ मेंदूच्या पेशींसाठी हानीकारक असून मानसिक संतुलन बिघडते. त्यामुळे परीक्षेच्या काळात बाहेरचे काहीही न देता घरगुती बनविलेलेच अन्नपदार्थ द्यावेत. यामुळे विद्यार्थ्यांना कोणतेही पोटाचे विकार होणार नाहीत. आहाराबरोबरच पुरेशी झोप घेणे व भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. अभ्यास आणि परीक्षेबाबत काही टिप्स : जर आपल्याला परीक्षेत चांगले मार्क्स हवे असतील तर आपणास अभ्यासासाठी काही नियमावली बनवावी लागेल आणि त्याची अंमलबजावणीदेखील करावी लागेल. त्यातच मनापासून अभ्यास तर हवाच शिवाय चांगल्या पुस्तकांचे वाचनही हवे. तसेच स्वत:च्या चांगल्या नोट्सदेखील तयार करायला हव्यात. या नोट्स आपल्याला परीक्षेला जाण्यापूर्वी खूप उपयुक्त ठरतात. आपण जो काही अभ्यास केला असेल त्याचा लिखानातून वेळोवेळी सराव करावा. तसेच प्रत्येक दिवशी अभ्यासाबरोबरच मनोरंजनालाही पूरेसा वेळ द्या. जो पण अभ्सास कराल तो एकाग्रतेने करा. कारण एकाग्रतेशिवाय परीक्षेत यश मिळविणे कठीण आहे. परीक्षेची भिती नको परीक्षेबाबत उगाच भिती बाळगून मनावर ताण येऊ देऊ नये. यासाठी आहाराबरोबच पूरेशी झोप घ्या. पूरेशा झोपेअभावी आपण कोणतेच काम चांगल्या पद्धतीने करु शकत नाही. विशेषत: अभ्यासासाठी चांगली झोप अत्यंत महत्त्वाची आहे. परीक्षा कक्षेत नेहमी वेळेच्या अगोदर पोहचा. परीक्षेत अगोदर असे प्रश्न सोडवा ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सहज जमतात. कठीण प्रश्न नंतर सोडवा. परीक्षेअगोदर अशा गप्पा मारु नका, ज्यामुळे आपल्यात अनावश्यक ताण वाढेल. परीक्षेदरम्यान आपण संयमी जीवन व्यतीत करावे. तरच आपण एक यशस्वी विद्यार्थी बनू शकाल आणि जीवनातदेखील यश संपादन कराल.