शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
3
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
4
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
5
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
6
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
7
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
8
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
9
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
10
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
12
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
13
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
14
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
15
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
16
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
17
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
18
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
19
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
20
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल

अव्वल स्थानापेक्षा राष्ट्रकुल पदक महत्त्वाचे- किदाम्बी श्रीकांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 1:56 AM

चार वर्षांपूर्वी आजारामुळे बॅडमिंटन स्टार किदाम्बी श्रीकांत याची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कामगिरी ढेपाळली होती. यंदा गोल्ड कोस्टमध्ये पदक जिंकण्याच्या इराद्यानेच श्रीकांत स्पर्धेत उतरणार आहे.

नवी दिल्ली : चार वर्षांपूर्वी आजारामुळे बॅडमिंटन स्टार किदाम्बी श्रीकांत याची राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत कामगिरी ढेपाळली होती. यंदा गोल्ड कोस्टमध्ये पदक जिंकण्याच्या इराद्यानेच श्रीकांत स्पर्धेत उतरणार आहे.ग्लास्गो राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेच्या काही दिवस आधी श्रीकांत आजारी पडला होता. गोपीचंद अकादमीत तो बाथरुममध्ये बेशुद्धावस्थेत पडलेला आढळला होता. आठवडाभर आयसीयूत ठेवल्यानंतर त्याला मेंदूज्वर झाल्याचे निष्पन्न झाले होते. या कटु स्मृती विसरून आज देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडू बनलेला श्रीकांत देशासाठी पदक जिंकण्यास सज्ज आहे. त्याच्या नावावर चार प्रतिष्ठेची जेतेपदे आहेत, शिवाय त्याला नुकताच पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.२०१४ ची घटना सांगताना श्रीकांत म्हणाला,‘ताप आल्यामुळे मी आजारी पडलो होतो. कुणीही मला त्या घटनेबद्दल सांगू इच्छित नाही. मी बरा होऊन राष्टÑकुलमध्ये खेळलो पण उपांत्यपूर्व फेरीामध्ये सिंगापूरच्या खेळाडूकडून पराभूत झालो. चार वर्षानंतर आता पदकाची आशा पल्लवित झाली आहे. मागील वर्षभरात मी आणखी अनुभवी बनलो. त्यामुळे राष्ट्रकुलचे पदक जिंकण्यास माझे प्राधान्य राहील. यंदा अव्वल स्थानावर पोहोचण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे असेल ते राष्ट्रकुलचे पदक जिंकणे.’ (वृत्तसंस्था)भारताच्या खात्यात केवळ तीन पदकपारुपल्ली कश्यप याने ग्लास्गो राष्टÑकुलमध्ये सुवर्ण जिंकून ३२ वर्षानंतर पुरुष एकेरीत भारतासाठी सुवर्णमय कामगिरी केली. यंदा श्रीकांतच्या खेळावर देशातील कोट्यवधी चाहत्यांची नजर असेल. कश्यपपूर्वी केवळ प्रकाश पदुकोण(१९७८) आणि सय्यद मोदी(१९८२)यांनी या खेळात राष्टÑकुल सुवर्ण जिंकले होते. श्रीकांत म्हणाला, मागच्यावेळी आम्ही चांगले पदक जिंकलो. यंदा चार वर्षांआधीच्या तुलनेत आघाडीवर असल्याने पदके जिंकण्याची शक्यता बळावली आहे.’

टॅग्स :BadmintonBadminton