शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

पावसाळ्यात टायर पंक्चर किंवा वाहने का घसरतात? कशी काळजी घ्यावी...

By हेमंत बावकर | Updated: September 4, 2018 16:21 IST

उन्हाळ्यात टायर फुटतात तर पावसाळ्यात निसरडे रस्ते किंवा खड्ड्यांमुळे रिम बेंड होण्याच्या घटनाही वाढतात. यामुळे वाहनाच्या टायरचे आरोग्य चांगले ठेवणे आपल्या हातात आणि फायद्याचे आहे. 

मुंबई : उन्हाळा किंवा हिवाळ्याच्या तुलनेत कार किंवा बाईक घसरण्याच्या  घटना पावसाळ्यात जास्त घडतात. याचसोबत टायर पंक्चर होण्याचा धोकाही वाढतो. उन्हाळ्यात टायर फुटतात तर पावसाळ्यात निसरडे रस्ते किंवा खड्ड्यांमुळे रिम बेंड होण्याच्या घटनाही वाढतात. यामुळे वाहनाच्या टायरचे आरोग्य चांगले ठेवणे आपल्या हातात आणि फायद्याचे आहे. 

महाराष्ट्रात सरासरी 60 ते 70 दिवस पाऊस असतो. कोकणात तर जवळपास १०० दिवस पावसाचेच असतात. काहीवेळा दलदलीची जमीन किंवा रस्त्यांची निकृष्ट कामे यामुळे रस्त्यांवर भलेमोठे खड्डे पडलेले असतात. या खड्डयांमुळे आधीच वेग मंदावलेला असल्याने त्रस्त असलेले वाहनचालक टायर पंक्चर किंवा वाहन घसरल्यास आणखी अडचणीत सापडतात. प्रवासावेळी प्रत्येकदा पंक्चर काढणारा भेटेलच असे नाही. या प्रकारांपासून वाचण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत काही टीप्स...

पावसाचे पाणी जेव्हा रस्त्यावर साचलेले असते, तेव्हा खडी निखळलेली असते. यावेळी वरून टायर जात असताना खडीचे छोटे छोटे अनुकुचिदार तुकडे टायरमध्ये घुसतात. यामुळे टायर पंक्चर होण्याची शक्यता असते. पाणी साचलेल्या रस्त्यावर टायरची ग्रिप कमी होते. यावेळी वेगात असल्यास व अचानक ब्रेक दाबल्यास टायर घसरतात. यामुळे बऱ्याचदा अपघातही होतात. 

यामुळे अशा प्रसंगांपासून बचावासाठी काय करायला हवे. असे प्रसंग तर नेहमीच उद्भवतात. आपण काय चुका करतो माहितीये, कारचे किंवा बाईकच्या टायरची ग्रीप संपेपर्यंत वापरतो. टायर गुळगुळीत झाल्याने वाहने घसरतात. यासाठी टायरवर 3 एमएम रबर असणे गरजेचे असते. एवढा रबर (ग्रीप) नसल्यास टायर त्वरीत बदलने आवश्यक ठरते. 

 भारतीय रस्त्यांनुसार जास्तीत जास्त 80 किमीचा वेग असणे कायदेशीर आहे. तर एक्सप्रेस हायवेवर तो नुकताच १२० किमी करण्यात आला आहे. या वेगात गाडी नियंत्रणात राहते. यामुळे गाडी घसरण्याची किंवा टायर फुटण्याची शक्यता कमी होते. 

टायरमध्ये हवा कमी-जास्त असल्यासही गाडी घसरू शकते. कार कंपनी जेवढा दाब सांगते तेवढा दाब ठेवल्यास आपण सुरक्षित राहतो. टायरचे प्रेशर पॅसेंजर, सामानानुसार बदलत असते. याबाबतची माहीती चालकाच्या दरवाजा उघडल्यावर दिसते. 

वेगात असताना अचानक मोठे खड्डे येतात. यावेळी आपण एकतर अचानक ब्रेक दाबतो किंवा गाडी तशीच खड्ड्यातून आदळवत नेण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो. यावेळी एकतर गाडी घसरते किंवा टायरची रिम बेंड होते. अलॉय व्हील असल्यास त्याला तडे जातात. यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होते. अलॉय व्हील असल्यास त्वरित बदलावे. लोखंडी रिम असल्यास तिचा बेंड काढून घ्यावा व व्हील अलाईनमेंटही करून घ्यावे.

टॅग्स :AutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग