शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

पावसाळ्यात टायर पंक्चर किंवा वाहने का घसरतात? कशी काळजी घ्यावी...

By हेमंत बावकर | Updated: September 4, 2018 16:21 IST

उन्हाळ्यात टायर फुटतात तर पावसाळ्यात निसरडे रस्ते किंवा खड्ड्यांमुळे रिम बेंड होण्याच्या घटनाही वाढतात. यामुळे वाहनाच्या टायरचे आरोग्य चांगले ठेवणे आपल्या हातात आणि फायद्याचे आहे. 

मुंबई : उन्हाळा किंवा हिवाळ्याच्या तुलनेत कार किंवा बाईक घसरण्याच्या  घटना पावसाळ्यात जास्त घडतात. याचसोबत टायर पंक्चर होण्याचा धोकाही वाढतो. उन्हाळ्यात टायर फुटतात तर पावसाळ्यात निसरडे रस्ते किंवा खड्ड्यांमुळे रिम बेंड होण्याच्या घटनाही वाढतात. यामुळे वाहनाच्या टायरचे आरोग्य चांगले ठेवणे आपल्या हातात आणि फायद्याचे आहे. 

महाराष्ट्रात सरासरी 60 ते 70 दिवस पाऊस असतो. कोकणात तर जवळपास १०० दिवस पावसाचेच असतात. काहीवेळा दलदलीची जमीन किंवा रस्त्यांची निकृष्ट कामे यामुळे रस्त्यांवर भलेमोठे खड्डे पडलेले असतात. या खड्डयांमुळे आधीच वेग मंदावलेला असल्याने त्रस्त असलेले वाहनचालक टायर पंक्चर किंवा वाहन घसरल्यास आणखी अडचणीत सापडतात. प्रवासावेळी प्रत्येकदा पंक्चर काढणारा भेटेलच असे नाही. या प्रकारांपासून वाचण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत काही टीप्स...

पावसाचे पाणी जेव्हा रस्त्यावर साचलेले असते, तेव्हा खडी निखळलेली असते. यावेळी वरून टायर जात असताना खडीचे छोटे छोटे अनुकुचिदार तुकडे टायरमध्ये घुसतात. यामुळे टायर पंक्चर होण्याची शक्यता असते. पाणी साचलेल्या रस्त्यावर टायरची ग्रिप कमी होते. यावेळी वेगात असल्यास व अचानक ब्रेक दाबल्यास टायर घसरतात. यामुळे बऱ्याचदा अपघातही होतात. 

यामुळे अशा प्रसंगांपासून बचावासाठी काय करायला हवे. असे प्रसंग तर नेहमीच उद्भवतात. आपण काय चुका करतो माहितीये, कारचे किंवा बाईकच्या टायरची ग्रीप संपेपर्यंत वापरतो. टायर गुळगुळीत झाल्याने वाहने घसरतात. यासाठी टायरवर 3 एमएम रबर असणे गरजेचे असते. एवढा रबर (ग्रीप) नसल्यास टायर त्वरीत बदलने आवश्यक ठरते. 

 भारतीय रस्त्यांनुसार जास्तीत जास्त 80 किमीचा वेग असणे कायदेशीर आहे. तर एक्सप्रेस हायवेवर तो नुकताच १२० किमी करण्यात आला आहे. या वेगात गाडी नियंत्रणात राहते. यामुळे गाडी घसरण्याची किंवा टायर फुटण्याची शक्यता कमी होते. 

टायरमध्ये हवा कमी-जास्त असल्यासही गाडी घसरू शकते. कार कंपनी जेवढा दाब सांगते तेवढा दाब ठेवल्यास आपण सुरक्षित राहतो. टायरचे प्रेशर पॅसेंजर, सामानानुसार बदलत असते. याबाबतची माहीती चालकाच्या दरवाजा उघडल्यावर दिसते. 

वेगात असताना अचानक मोठे खड्डे येतात. यावेळी आपण एकतर अचानक ब्रेक दाबतो किंवा गाडी तशीच खड्ड्यातून आदळवत नेण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो. यावेळी एकतर गाडी घसरते किंवा टायरची रिम बेंड होते. अलॉय व्हील असल्यास त्याला तडे जातात. यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होते. अलॉय व्हील असल्यास त्वरित बदलावे. लोखंडी रिम असल्यास तिचा बेंड काढून घ्यावा व व्हील अलाईनमेंटही करून घ्यावे.

टॅग्स :AutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग