शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

पावसाळ्यात टायर पंक्चर किंवा वाहने का घसरतात? कशी काळजी घ्यावी...

By हेमंत बावकर | Updated: September 4, 2018 16:21 IST

उन्हाळ्यात टायर फुटतात तर पावसाळ्यात निसरडे रस्ते किंवा खड्ड्यांमुळे रिम बेंड होण्याच्या घटनाही वाढतात. यामुळे वाहनाच्या टायरचे आरोग्य चांगले ठेवणे आपल्या हातात आणि फायद्याचे आहे. 

मुंबई : उन्हाळा किंवा हिवाळ्याच्या तुलनेत कार किंवा बाईक घसरण्याच्या  घटना पावसाळ्यात जास्त घडतात. याचसोबत टायर पंक्चर होण्याचा धोकाही वाढतो. उन्हाळ्यात टायर फुटतात तर पावसाळ्यात निसरडे रस्ते किंवा खड्ड्यांमुळे रिम बेंड होण्याच्या घटनाही वाढतात. यामुळे वाहनाच्या टायरचे आरोग्य चांगले ठेवणे आपल्या हातात आणि फायद्याचे आहे. 

महाराष्ट्रात सरासरी 60 ते 70 दिवस पाऊस असतो. कोकणात तर जवळपास १०० दिवस पावसाचेच असतात. काहीवेळा दलदलीची जमीन किंवा रस्त्यांची निकृष्ट कामे यामुळे रस्त्यांवर भलेमोठे खड्डे पडलेले असतात. या खड्डयांमुळे आधीच वेग मंदावलेला असल्याने त्रस्त असलेले वाहनचालक टायर पंक्चर किंवा वाहन घसरल्यास आणखी अडचणीत सापडतात. प्रवासावेळी प्रत्येकदा पंक्चर काढणारा भेटेलच असे नाही. या प्रकारांपासून वाचण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत काही टीप्स...

पावसाचे पाणी जेव्हा रस्त्यावर साचलेले असते, तेव्हा खडी निखळलेली असते. यावेळी वरून टायर जात असताना खडीचे छोटे छोटे अनुकुचिदार तुकडे टायरमध्ये घुसतात. यामुळे टायर पंक्चर होण्याची शक्यता असते. पाणी साचलेल्या रस्त्यावर टायरची ग्रिप कमी होते. यावेळी वेगात असल्यास व अचानक ब्रेक दाबल्यास टायर घसरतात. यामुळे बऱ्याचदा अपघातही होतात. 

यामुळे अशा प्रसंगांपासून बचावासाठी काय करायला हवे. असे प्रसंग तर नेहमीच उद्भवतात. आपण काय चुका करतो माहितीये, कारचे किंवा बाईकच्या टायरची ग्रीप संपेपर्यंत वापरतो. टायर गुळगुळीत झाल्याने वाहने घसरतात. यासाठी टायरवर 3 एमएम रबर असणे गरजेचे असते. एवढा रबर (ग्रीप) नसल्यास टायर त्वरीत बदलने आवश्यक ठरते. 

 भारतीय रस्त्यांनुसार जास्तीत जास्त 80 किमीचा वेग असणे कायदेशीर आहे. तर एक्सप्रेस हायवेवर तो नुकताच १२० किमी करण्यात आला आहे. या वेगात गाडी नियंत्रणात राहते. यामुळे गाडी घसरण्याची किंवा टायर फुटण्याची शक्यता कमी होते. 

टायरमध्ये हवा कमी-जास्त असल्यासही गाडी घसरू शकते. कार कंपनी जेवढा दाब सांगते तेवढा दाब ठेवल्यास आपण सुरक्षित राहतो. टायरचे प्रेशर पॅसेंजर, सामानानुसार बदलत असते. याबाबतची माहीती चालकाच्या दरवाजा उघडल्यावर दिसते. 

वेगात असताना अचानक मोठे खड्डे येतात. यावेळी आपण एकतर अचानक ब्रेक दाबतो किंवा गाडी तशीच खड्ड्यातून आदळवत नेण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो. यावेळी एकतर गाडी घसरते किंवा टायरची रिम बेंड होते. अलॉय व्हील असल्यास त्याला तडे जातात. यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होते. अलॉय व्हील असल्यास त्वरित बदलावे. लोखंडी रिम असल्यास तिचा बेंड काढून घ्यावा व व्हील अलाईनमेंटही करून घ्यावे.

टॅग्स :AutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग