शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

वाहन चालकांनो...15 लाखांचा अपघात विमाही बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 3:53 PM

अपघातामध्ये मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना पैशांची मदत मिळणार असली तरीही कारचा विमाही महागणार आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने नव्या वाहनांना खरेदीवेळीच तीन वर्षांचा थर्ड पार्टी इन्शुरन्स बंधनकारक केलेला असताना आता मालक-चालकाचा 15 लाखांचा अपघात विमा काढणेही बंधनकारक केले आहे. यासाठी वार्षिक 750 रुपये आकारले जाणार आहेत. यामुळे अपघातामध्ये मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना पैशांची मदत मिळणार असली तरीही कारचा विमाही महागणार आहे.

विमा क्षेत्रावर नियंत्रण ठेवणारी संस्था इरडाने गुरुवारी हा निर्णय घेतला आहे. यानुसार नव्या आणि जुन्या अशा दोन्ही वाहनांच्या चालकांचा आणि मालकांना 15 लाखांचा अपघात विमा काढावा लागणार आहे. यासाठी प्रारंभी 750 रुपये ठरविण्यात आले आहेत. इरडा काही काळाने यामध्ये वाढही करू शकते. 

इरडाने सर्व विमा कंपन्यांना याबाबतचे आदेश दिले असून त्यांच्या पॉलिसींमध्ये तशी तरतूद करण्यास सांगितले आहे. अधासूचना काढल्यानंतर लगेचच किंवा 25 ऑक्टोबरपर्यंत अपघात विमा लागू करणे कंपन्यांना बंधनकारक राहणार आहे. 

मद्रास उच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वीच वाहन चालकांचा अपघात विमा 1 लाखांवरून 15 लाख करण्याच्या सुचना केल्या होत्या. इरडाच्या या निर्णयावर कंपन्यांनी असा विमा देण्याचे मान्य केले आहे. मात्र, त्यासाठी वेगळी रक्कम आकारण्याची मागणी केली आहे. 

सध्या भारतात दुचाकी चालविणाऱ्यांसाठी 1 लाख आणि चार चाकी चालविणाऱ्यांसाठी 2 लाखांचा अपघात विमा असतो. विमा कंपन्या चालकाला जादाचा अपघात विमा देण्यासाठी मोठी रक्कम आकारतात. इरडाच्या या निर्णयामुळे वाहन चालकांचा फायदाच होणार आहे. 

टॅग्स :carकारAccidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षा