शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

भारतातील कारच्या रचना, सुविधा, सौंदर्य यासाठी हवा भारतीय वातावरणाला साजेसा दृष्टिकोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 15:20 IST

गेल्या काही वर्षांमध्ये कारच्या सौंदर्याबाबत, अंतर्गत सुविधा व आरेखन याबाबत विशेष दक्षता घेतली जात आहे. वास्तविक कारमधील कारचे मूळ गुण मात्र कमी करण्याचा प्रयत्न करताना, कारच्या ताकदीमध्ये, सुरक्षिततेबाबत काहीशी नव्हे तर चांगलीच तडजोड होऊ लागली आहे.

ठळक मुद्दे ग्राहकांच्या मतांची पाहाणी, तपासणी केली जाऊन कारच्या रचनेत, सुविधांमध्ये बदल होऊ लागले. आपल्या देशात नेमकी कोणती सुविधा व अंतर्गत रचना, सौंदर्य हे योग्य आहे, याचा अंदाज ग्राहकाला येत नाही

गेल्या काही वर्षांमध्ये कारच्या सौंदर्याबाबत, अंतर्गत सुविधा व आरेखन याबाबत विशेष दक्षता घेतली जात आहे. वास्तविक कारमधील कारचे मूळ गुण मात्र कमी करण्याचा प्रयत्न करताना, कारच्या ताकदीमध्ये, सुरक्षिततेबाबत काहीशी नव्हे तर चांगलीच तडजोड होऊ लागली आहे. याला कारण उत्पादक कंपनीचे कॉस्ट कटिंग जसे कारणीभूत आहे तसेच कारच्या ग्राहकांची मागणीही तितकीच कारणीभूत आहे. साधारणपणे भारतातील मोटारींमध्ये २००० सालापासून विविध बदलांना, स्पर्धेला सुरुवात झाली. ग्राहकांची संख्याही वाढू लागली व त्यामुळे ग्राहकांच्या मतांची पाहाणी, तपासणी केली जाऊन कारच्या रचनेत, सुविधांमध्ये बदल होऊ लागले. परदेशातील कार्स, त्यांचा वेग, त्यामधील सुविधा याबाबत लोकांना वाढत्या इंटरनेट सुविधांमधून माहितीही मिळत गेली. साहजिकच कारमध्ये काय काय सुविधा असतात, ते समजत गेले व ग्राहक विशेष करून नव्या पिढीतील तरुण मोटारींबाबत विशेष चोखंदळपणे पाहू लागले. परदेशी कार, त्यांच्यामधील सुविधा, त्या कंपन्या यासाठी भर देणारा नव्या पिढीतील भारतीय ग्राहक आकर्षित झाला. आयटी कंपन्यांच्या चलतीमुळे खिशात चांगले पैसेही खुळखुळत होते. यामुळे कारमध्ये नवनव्या परदेशी सुविधांचा समावेश केला गेला. पुढे पुढे त्या सुविधा कारच्या श्रेणीनिहाय दिल्या जाऊन त्यातून चांगलेच अतिरिक्त उत्पन्न कार उत्पादक कंपन्यांनी कमावले.परदेशातील कारप्रमाणेच आपल्यालाही तशीच सुविधा मिळावी, त्याप्रमाणेच सोयी कारमध्ये असाव्यात असा सर्वसाधारण ग्राहकांचा ओढा असतो. कार उत्पादक कंपन्यांनाही तसे पाहिजे असते, त्याद्वारे त्यांना अतिरिक्त सुविधा देत ग्राहकांची संख्या वाढवता येते व तशी किंमतही. परंतु भारतीय परिस्थितीचा, येथील ग्राहकाच्या असलेल्या वापर पद्धतीचा विचार झाला नाही. ग्राहकांना दिल्या गेलेल्या अनेक सुविधांचा वापर करायला आवडतो पण त्या सुविधांचा दर्जा, त्यांचा टिकावूपणा, त्या सुविधांना आवश्यक असलेल्या भारतीय रस्ते, वाहतूक यातील पायाभूत रचना, सुविधा यांचा अभाव असल्याने अशा प्रकारच्या कारमध्ये दिलेल्या उच्च सुविधा काही काळातच खऱाब होऊ लागतात. त्या जपण्यासाठी मात्र अधिक पैसे खर्च करावे लागतात. कसे आहे की परदेशात असलेल्या खाद्यपदार्थांची निर्मिती ही तेथील वातावरणाला अनुसरून असते. परंतु, ते खाद्य भारतातील वातावरणाला अनुकूल असेलच असे नाही. तसेच कारच्या बाबतीतही म्हणता येते. कारसाठी ग्राहकांची मागणी आहे असे दिसल्यानंतर ग्राहकांसाठी परदेशातील कारप्रमाणे विविध सुविधा दिल्या जातात. पण त्या सुविधा येथील खराब रस्ते, ग्राहकांच्या वापरण्याच्या पद्धती, येथील हवामान, येथील वाहतूक रचना यामुळे फार काळ नीटपणे टिकत नाही, काहीवेळा त्यांचा वापर कुचकामी असल्याचेही ग्राहकाला वाटू लागते. खरे म्हणजे कंपन्यांच्या कडून काहीही सादर केले गेले तरी ग्राहकांनीच सजगपणे व डोळसपणे आपल्या कारसाठी नेमके काय हवे आहे, ते लक्षात घेतले पाहिजे. कार हे अद्यापही प्रेस्टिजचे वा अन्य काही उद्दिष्टाचे साधन समजले जात आहे. हे जोपर्यंत चालू राहील, तोपर्यंत आपल्या देशात नेमकी कोणती सुविधा व अंतर्गत रचना, सौंदर्य हे योग्य आहे, याचा अंदाज ग्राहकाला येत नाही, तोपर्यंत कारच्या बाबत असणारे सौंदर्य, सुविधांचे निकष हे कार उत्पादकालाही ठरवता येणार नाहीत. मात्र ग्राहकांच्या या मानसिकतेचा फायदा मात्र कार उत्पादक, अॅक्सेसरीज उत्पादक घेत राहातील. त्यासाठीच कार ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे साधन आहे, हे मूलभूत तत्त्व ग्राहकाला समजेल, तेव्हा भारतीय ग्राहकाच्या कल्पनाही पार बदललेल्या असतील, कदाचित भारतीय वातावरणाप्रमाणे सुविधा व सौंदर्य याबद्दलचा, दर्जा, सुरक्षितता, रस्ते, विविध भागांमध्ये असणारे हवामान यानुसार अवलंबून असलेले आवश्यकतेनुसार कार उत्पादकांनाही आपला दृष्टिकोन बदलावा लागेल. नजीकच्या भिवष्यात विद्युत ऊर्जेवर चालणारी वाहने भारतात कशी असावीत, याचाही दृष्टीकोन परदेशातील त्या प्रकारच्या वाहनांच्या तुलनेत बदललेला असेल.

टॅग्स :carकारAutomobileवाहन