शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
2
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
3
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
4
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
5
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
6
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
7
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
8
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
9
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
10
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
11
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
12
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
13
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
14
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
15
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
16
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा, ‘लिंक’पासून सावधान; खात्री करून गुंतवणूक करा
17
विधान भवनातील मारहाण प्रकरण तपासाला स्थगिती; मरिन लाइन्स पोलिसांना उच्च न्यायालयाचे आदेश
18
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
19
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
20
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात

भारतातील कारच्या रचना, सुविधा, सौंदर्य यासाठी हवा भारतीय वातावरणाला साजेसा दृष्टिकोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 15:20 IST

गेल्या काही वर्षांमध्ये कारच्या सौंदर्याबाबत, अंतर्गत सुविधा व आरेखन याबाबत विशेष दक्षता घेतली जात आहे. वास्तविक कारमधील कारचे मूळ गुण मात्र कमी करण्याचा प्रयत्न करताना, कारच्या ताकदीमध्ये, सुरक्षिततेबाबत काहीशी नव्हे तर चांगलीच तडजोड होऊ लागली आहे.

ठळक मुद्दे ग्राहकांच्या मतांची पाहाणी, तपासणी केली जाऊन कारच्या रचनेत, सुविधांमध्ये बदल होऊ लागले. आपल्या देशात नेमकी कोणती सुविधा व अंतर्गत रचना, सौंदर्य हे योग्य आहे, याचा अंदाज ग्राहकाला येत नाही

गेल्या काही वर्षांमध्ये कारच्या सौंदर्याबाबत, अंतर्गत सुविधा व आरेखन याबाबत विशेष दक्षता घेतली जात आहे. वास्तविक कारमधील कारचे मूळ गुण मात्र कमी करण्याचा प्रयत्न करताना, कारच्या ताकदीमध्ये, सुरक्षिततेबाबत काहीशी नव्हे तर चांगलीच तडजोड होऊ लागली आहे. याला कारण उत्पादक कंपनीचे कॉस्ट कटिंग जसे कारणीभूत आहे तसेच कारच्या ग्राहकांची मागणीही तितकीच कारणीभूत आहे. साधारणपणे भारतातील मोटारींमध्ये २००० सालापासून विविध बदलांना, स्पर्धेला सुरुवात झाली. ग्राहकांची संख्याही वाढू लागली व त्यामुळे ग्राहकांच्या मतांची पाहाणी, तपासणी केली जाऊन कारच्या रचनेत, सुविधांमध्ये बदल होऊ लागले. परदेशातील कार्स, त्यांचा वेग, त्यामधील सुविधा याबाबत लोकांना वाढत्या इंटरनेट सुविधांमधून माहितीही मिळत गेली. साहजिकच कारमध्ये काय काय सुविधा असतात, ते समजत गेले व ग्राहक विशेष करून नव्या पिढीतील तरुण मोटारींबाबत विशेष चोखंदळपणे पाहू लागले. परदेशी कार, त्यांच्यामधील सुविधा, त्या कंपन्या यासाठी भर देणारा नव्या पिढीतील भारतीय ग्राहक आकर्षित झाला. आयटी कंपन्यांच्या चलतीमुळे खिशात चांगले पैसेही खुळखुळत होते. यामुळे कारमध्ये नवनव्या परदेशी सुविधांचा समावेश केला गेला. पुढे पुढे त्या सुविधा कारच्या श्रेणीनिहाय दिल्या जाऊन त्यातून चांगलेच अतिरिक्त उत्पन्न कार उत्पादक कंपन्यांनी कमावले.परदेशातील कारप्रमाणेच आपल्यालाही तशीच सुविधा मिळावी, त्याप्रमाणेच सोयी कारमध्ये असाव्यात असा सर्वसाधारण ग्राहकांचा ओढा असतो. कार उत्पादक कंपन्यांनाही तसे पाहिजे असते, त्याद्वारे त्यांना अतिरिक्त सुविधा देत ग्राहकांची संख्या वाढवता येते व तशी किंमतही. परंतु भारतीय परिस्थितीचा, येथील ग्राहकाच्या असलेल्या वापर पद्धतीचा विचार झाला नाही. ग्राहकांना दिल्या गेलेल्या अनेक सुविधांचा वापर करायला आवडतो पण त्या सुविधांचा दर्जा, त्यांचा टिकावूपणा, त्या सुविधांना आवश्यक असलेल्या भारतीय रस्ते, वाहतूक यातील पायाभूत रचना, सुविधा यांचा अभाव असल्याने अशा प्रकारच्या कारमध्ये दिलेल्या उच्च सुविधा काही काळातच खऱाब होऊ लागतात. त्या जपण्यासाठी मात्र अधिक पैसे खर्च करावे लागतात. कसे आहे की परदेशात असलेल्या खाद्यपदार्थांची निर्मिती ही तेथील वातावरणाला अनुसरून असते. परंतु, ते खाद्य भारतातील वातावरणाला अनुकूल असेलच असे नाही. तसेच कारच्या बाबतीतही म्हणता येते. कारसाठी ग्राहकांची मागणी आहे असे दिसल्यानंतर ग्राहकांसाठी परदेशातील कारप्रमाणे विविध सुविधा दिल्या जातात. पण त्या सुविधा येथील खराब रस्ते, ग्राहकांच्या वापरण्याच्या पद्धती, येथील हवामान, येथील वाहतूक रचना यामुळे फार काळ नीटपणे टिकत नाही, काहीवेळा त्यांचा वापर कुचकामी असल्याचेही ग्राहकाला वाटू लागते. खरे म्हणजे कंपन्यांच्या कडून काहीही सादर केले गेले तरी ग्राहकांनीच सजगपणे व डोळसपणे आपल्या कारसाठी नेमके काय हवे आहे, ते लक्षात घेतले पाहिजे. कार हे अद्यापही प्रेस्टिजचे वा अन्य काही उद्दिष्टाचे साधन समजले जात आहे. हे जोपर्यंत चालू राहील, तोपर्यंत आपल्या देशात नेमकी कोणती सुविधा व अंतर्गत रचना, सौंदर्य हे योग्य आहे, याचा अंदाज ग्राहकाला येत नाही, तोपर्यंत कारच्या बाबत असणारे सौंदर्य, सुविधांचे निकष हे कार उत्पादकालाही ठरवता येणार नाहीत. मात्र ग्राहकांच्या या मानसिकतेचा फायदा मात्र कार उत्पादक, अॅक्सेसरीज उत्पादक घेत राहातील. त्यासाठीच कार ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे साधन आहे, हे मूलभूत तत्त्व ग्राहकाला समजेल, तेव्हा भारतीय ग्राहकाच्या कल्पनाही पार बदललेल्या असतील, कदाचित भारतीय वातावरणाप्रमाणे सुविधा व सौंदर्य याबद्दलचा, दर्जा, सुरक्षितता, रस्ते, विविध भागांमध्ये असणारे हवामान यानुसार अवलंबून असलेले आवश्यकतेनुसार कार उत्पादकांनाही आपला दृष्टिकोन बदलावा लागेल. नजीकच्या भिवष्यात विद्युत ऊर्जेवर चालणारी वाहने भारतात कशी असावीत, याचाही दृष्टीकोन परदेशातील त्या प्रकारच्या वाहनांच्या तुलनेत बदललेला असेल.

टॅग्स :carकारAutomobileवाहन