शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
6
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
7
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
8
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
9
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
10
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
11
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
12
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
13
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
14
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
15
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
16
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
17
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
18
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
19
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
20
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचे ३० कोटींचे नियोजनही संशयाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: September 26, 2015 00:08 IST

जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत राज्य शासन व जिल्हा नियोजन समितीकडून विविध विकासकामांसाठी ...

पडसाद : व्याजाच्या रकमेनंतर आता बजेटवर लक्ष अमरावती : जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत राज्य शासन व जिल्हा नियोजन समितीकडून विविध विकासकामांसाठी मिळालेल्या सुमारे ३० कोटी रुपयांच्या नियोजनावर सर्वत्र खल होत आहे. मात्र, बजेट बाहेर पडण्यापूर्वीच तेराव्या वित्त आयोगाच्या व्याजाची रक्कम एकाच तालुक्यातील विकासकामांसाठी पळविल्याने आता बजेट नियोजनातही निधीवाटपात गडबड होण्याचा संशय खुद्द सत्ताधारी सदस्यच व्यक्त करीत आहेत.त्यामुळे बजेटकडे सध्या जिल्हा परिषदेतील पदाधिकारी डोळयात तेल घालून लक्ष देत आहेत. त्यामुळे बजेटमध्ये गोंधळ झाल्यास पुन्हा नवीन वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. जि.प.ला जिल्हा नियोजन समितीचे सन २०१५-१६ साठी आर्थिक बजेटकरिता सुमारे १० कोटी रुपये, जनसुविधेसाठी ३ कोटी रुपये, तीर्थक्षेत्रासाठी ३ कोटी, समाज कल्याणसाठी दीड कोटी रुपये व राज्य शासनाकडून आरोग्यासाठी सुमारे १५ कोटी रुपये अनुदान उपलब्ध झाले आहे. या विविध लेखाशिर्षातील विकासकामांचे नियोजन आॅगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत बजेट पूर्ण न झाल्याने आता ३० कोटींच्या निधीतून विकासकामे निहाय नियोजन करण्यात येत आहे. तर दुसरीकडे जिल्हा नियोजन समिती व राज्य शासन यांच्याकडून प्राप्त अनुदानाचे नियोजन करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेतील सत्ताधारी पदाधिकारी सुरात सूर मिसळून सांगत असले तरी सत्ताधारी गटातील काही सदस्य मात्र संशय व्यक्त करीत आहेत. नियोजनात तेराव्या वित्त आयोगातील निधीवर मिळालेल्या २७ लाख रूपयांच्या व्याजाची रक्कम सत्ताधारी पक्षाच्या मुख्य शिलेदाराच्या जवळ असलेल्या एका नेत्याच्या सूचनेवरून एकाच तालुक्यात पळविल्याने सत्तेतील पदाधिकारी असाच प्रकार बजेटमध्येही करण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांनाच बजेटचा निधी वितरण करताना झुकते माप दिल्यास नवा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ३० कोटींच्या बजेटवर मिनी मंत्रालयातील शिलेदार व सदस्य बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. त्यामुळे बजेट निधीचे समसमान वाटप न केल्यास जिल्हा परिषदेत नवा पेचप्रसंग निर्माण होतो की समन्वयातून मार्ग निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. व्याजाच्या रकमेची विल्हेवाट परस्पर लावल्याचा मुद्दा ताजा असल्याने अनेक चर्चांना उत आला आहे.