शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण राज्यमंत्र्यांची पाठ फिरताच शाळेला टाळे; सांगा साहेब, आमची मुलं शिकवायची तरी कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2021 12:29 IST

१ डिसेंबरपासून इयत्ता पहिलीपासून शाळा उघडण्याचे आदेश जारी झाले. परंतु, हतरू जिल्हा परिषद गटामध्ये पंधरा दिवसांपासून जिल्हा परिषद शाळा पूर्णपणे बंद आहे.

ठळक मुद्दे सिमोरीची शाळा बंदचव्यथा मेळघाटची

अमरावती : ‘साहेब, गेल्या आठवड्यापासून शाळेला कुलूप आहे. आम्ही आमची मुलं कुठे शिकवायची? मुख्याध्यापक, शिक्षक बेपत्ता आहेत. मुलांच्या शैक्षणिक नुकसानाला जबाबदार कोण’, असा प्रश्न थेट आदिवासींनी जिल्हा प्रशासन व नेत्यांना केला आहे. त्यामुळे कालपर्यंत शिक्षणाचा गंध नसल्याची ओरड असलेल्या मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांनाही शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे गंभीर चित्र तालुक्यातील अतिदुर्गम सिमोरी येथील शाळेच्यानिमित्ताने पुढे आले आहे.

तालुक्यातील सिमोरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला आठवडाभरापासून कुलूप लागले आहे. आदिवासी विद्यार्थी दररोज शाळेला कुलूप असल्याचे पाहून परत जात असल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्यांसह शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी केली आहे. आठवड्यापूर्वी या परिसरात शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू व मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांची कर्तव्यपूर्ती यात्रा हतरू येथे झाली. त्यानंतर शाळेला कुलूप लागले. दोन वर्षांपासून सर्व शाळा कोरोनाकाळात बंद होत्या. दि. १ डिसेंबरपासून इयत्ता पहिलीपासून शाळा उघडण्याचे आदेश जारी झाले. परंतु, हतरू जिल्हा परिषद गटामध्ये पंधरा दिवसांपासून जिल्हा परिषद शाळा पूर्णपणे बंद आहे.

कोरोनाकाळात शाळा बंद असताना पन्नास टक्के शिक्षकसुद्धा बेपत्ता होते. आता शाळा सुरू झाल्या तरी कुलूपबंद आहेत. शनिवारी चिखलदरा पंचायत समितीचे उपसभापती अविनाश मेटकर यांनी हतरू सर्कलमधील शाळांना भेट दिली. त्यात सिमोरीसह काही शाळा बंद होत्या. याबाबत आता जिल्हाधिकारी वा शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.

मुलांच्या शैक्षणिक ताणाला जबाबदार कोण?

अतिदुर्गम हतरू परिसरामध्ये आठवडाभरापासून शिक्षक, मुख्याध्यापक आलेले नाहीत. आमच्या मुलांच्या अभ्यासाचे नुकसान होत आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न सिमोरी गावातील पालक शांताराम चिमोटे, विनोद बचले, महाजन बेठेकर, सुरेशपाल बेलकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष प्यारी महाजन बेठेकर व ग्रामपंचायत सदस्यांनी तक्रारीत विचारला आहे.

कर्तव्यपूर्ती झाली शिक्षक कर्तव्य विसरले

शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी नुकतीच आदिवासींना विविध दाखले, शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी अतिदुर्गम भागापर्यंत कर्तव्यपूर्ती यात्रा काढली. त्याला प्रशासनातील अधिकारी ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांची उपस्थिती होती आणि आठवडा होत नाही तोच शाळांना कुलूप लागले. क्षेत्रीय स्तरावरील कर्मचारी गायब झाल्याचे चित्र आहे. त्याची गंभीर दखल घेण्याची मागणी आदिवासींनी केली.

सीमोरी येथील शाळेला कुलूप असल्याची माहिती मिळाली. त्यासंदर्भात सोमवारी केंद्रप्रमुखांना तत्काळ चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

संदीप बोडके, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, चिखलदरा

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थीTeacherशिक्षकMelghatमेळघाटChikhaldaraचिखलदरा