शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

विदर्भातील शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 6:55 PM

पीक नुकसानीमुळे हवालदिल : मदतीला विलंब, लालफितशाहीत अडकल्या फाईली

- गणेश वासनिकअमरावती : विदर्भात हरीण, नीलगाय, सांबर, चितळ व रानडुकरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, जंगलात हिरवळ, चारा, पाणी नसल्याने या वन्यप्राण्यांनी आपला मोर्चा शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये वळविला आहे. हे वन्यप्राणी शेती पिके बेसुमारपणे नष्ट करतात. मात्र,  शेतकऱ्यांना पिक नुकसान भरपाई थातुरमातुर  मिळत आहे.

 अमरावती, वर्धा, यवतमाळ, अकोला, वाशीम, बुलडाणा व नागपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांनी दोन वर्षांपासून आपला मोर्चा शेतीकडे वळविला आहे. कळपाने वास्तव्य करणाºया या वन्यप्राण्यांनी शेतीतील गहू, हरभरा, कपाशी, तूर व सोयाबीन या पिकांवर हल्ला केलेला आहे. विदर्भातजंगलातील गवत, चारा नष्टप्राय झालेले असून तृष्णा भागविण्यासाठी पाण्याची बिकट अवस्था आहे. परिणामी वन्यजीव जंगलाशेजारच्या शेतीत घुसून पिकांची धुळधान करीत असल्याचे वास्तव आहे. वन्यप्राण्यांच्या या संकटामुळे विदर्भातील शेतकरी पुरता हैराण झालेला आहे. सतत चार वर्षांपासून सतत नापिकी आणि यंदा दुष्काळ स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच वन्यप्राण्यांच्या हैदासाने यात भर पडली आहे. शेतातील उभे पिक वन्यप्राणी नष्ट करीत असल्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास विदर्भात शेतकºयांच्या विंवचनेत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

कुंपनाला वीजप्रवाहवन्यप्राण्यांपासून शेतीतील पिकांचे नुकसान रोखण्याकरिता शेतकरी शेतीच्या कुंपनाला रात्रीच्या सुमारास वीज प्रवाह सोडतात. परिणामी यात वन्यजीवांचा जीव जातो तर शेतकºयास तुरुंगवारी होते. दोन वर्षांत वीज प्रवाहामुळे ३ वाघ, ५ बिबट व इतर वन्यजीवांना प्राण गमवावा लागला. उंच कुंपण ओलांडून वन्यप्राणी शेतात शिरतात अन् पिके फस्त करतात. 

पीक नुकसानीची मदत अपुरीरात्रीतून वन्यजीव कमी अधिक प्रमाणात ५ ते ७ हेक्टर क्षेत्रातील पिकांची नासाडी करतात. अशावेळी प्रसिद्ध समिती शेतकºयांच्या शेती पीकनुकसानीचा अहवाल तयार करतात. मात्र, शेतकºयांना शेत पीक नुकसानीच्या केवळ ४० टक्के मदत वनविभाग देते. ही मदत एक वर्षानंतर शेतकºयांना मिळत असल्याने शेतकºयांमध्ये रोष निर्माण झाला आहे. हेक्टर होणाºया नुकसानीच्या तुलनेत टप्पा-टप्प्याच्या नुकसानीचे गणित काढून शेतकºयास प्रतिएकर ५ ते ७ हजार रुपये नुकसान भरपाई मिळते. परंतु, त्यासाठी वर्षभर प्रतीक्षा करावी लागते.

निधीचा अभाव शेती पीक नुकसानीचे विदर्भात १० हजारांच्यावर प्रकरणे वनविभागाकडे आलेली असून निधीचा वानवा असल्याने शेतकºयांना गेल्या सहा महिन्यांपासून आर्थिक मदत देण्यात आली नाही. शेत पिक नुकसानीचे प्रकरणे वाढीस लागलेली असताना निधी मिळत नसल्याने शेतकरी संकटात आलेला आहे. परिणामी विदर्भातील वन्यजीवसुद्धा धोक्यात आलेले आहे. कारण निलगायी, हरिण, चितळ, चिंगारा, रानडुक्कर या वन्यप्राण्यांची संख्या जंगल नसलेल्या भागात दुपटीने वाढ झालेली आहे. 

 

वन्यप्राण्यांनी शेती पिकाचे नुकसान केल्यास त्याची नुकसान भरपाईसाठी नियमावली ठरली आहे. त्यानुसारच वनविभाग कार्यवाही करते. नुकसान भरपाईची काही प्रकरणे प्रलंबित असतील तर त्याचा मागोवा घेत संबंधित शेतकºयांना न्याय दिला जाईल.  - गजेंद्र नरवणे,   उपवनसंरक्षक, अमरावती

टॅग्स :Vidarbhaविदर्भforestजंगल