शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

हवामानाचा वेध केव्हा?: महावेध प्रकल्पाला उद्धाटनाचा मुहूर्त गवसेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 12:10 IST

विदर्भात ८२८ तर राज्यातील दोन हजार ६५ महसूल मंडळात स्वंयचलित हवामान केंद्रे सात महिन्यांपूर्वी कार्यान्वित करण्यात आली. मात्र, अद्याप एकाही केंद्रावरून शेतकऱ्यांना हवामान माहितीचा सल्ला व ‘एसएमएस’ पाठविण्यात आलेला नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

ठळक मुद्देना कृषी सल्ला, ना एसएमएस३७७ हवामान केंद्रे कुचकामी

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकऱ्यांना दर १० मिनिटांनी हवामानाची अचूक माहिती मिळावी, यासाठी विभागात पाच जिल्ह्यांतील ३७७ महसूल मंडळासह विदर्भात ८२८ तर राज्यातील दोन हजार ६५ महसूल मंडळात स्वंयचलित हवामान केंद्रे सात महिन्यांपूर्वी कार्यान्वित करण्यात आली. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या उद्घाटनाअभावी यंत्रणा रखडल्याने अद्याप एकाही केंद्रावरून शेतकऱ्यांना हवामान माहितीचा सल्ला व ‘एसएमएस’ पाठविण्यात आलेला नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांना कायम नैसगीक आपत्तीचा सामना करावा लागतो. यामध्ये पिकांची नासाडी होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. हे टाळण्यासाठी राज्य शासनाने एप्रिल २०१७ मध्ये हवामानाच्या अचूक माहितीचा वेध घेण्यासाठी ‘स्कॉयमेट वेदर सर्व्हिसेसच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक महसूल मंडळात स्वयंचलीत हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला. या केंद्रांमुळे शेतकऱ्यांना पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा या हवामान घटकासह १२ किमी परिघातील हवामानाची अचूक माहिती दर १० मिनिटांनी ‘एसएमएस’द्वारे मिळणार आहे. यासंदर्भात संबंधित कंपनीसोबत कृषी विभागाचा सात वर्षांसाठी करारदेखील झाला. केवळ जागेव्यतिरिक्त शासनाची कोणतीही आर्थिक गुंतवणूक या प्रकल्पात नाही, कृषी विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव विजयकुमार यांच्या पुढाकारामुळे शासनाची किमान १५० कोटींची बचत झाली. राज्यातील पहिले स्वयंचलित हवामान केंद्र नागपूर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ३० एप्रिल २०१७ ला उद्घाटित झाले. त्यानंतर सर्वच महसूल मंडळात ही केंद्रे कार्यान्वित करण्यात आली. यामधून डाटा पुण्याच्या सर्व्हरला पाठविण्यात येत आहे. मात्र, राज्य प्रकल्पाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांच्या तारखेचा मुहूर्त न गवसल्याने योजना कितीही महत्त्वाची असली तरी अंमलबजावणी सहा महिन्यांपासून झालेली नाही.सर्वाधिक केंद्रे यवतमाळ जिल्ह्यातया महावेध प्रकल्यांतर्गत अमरावती विभागात ३७७ केंद्रे राज्यात उभारण्यात आली. यामध्ये सर्वाधिक १०१ केंद्रे यवतमाळ जिल्ह्यात आहेत. याव्यातिरिक्त अमरावती जिल्ह्यात ८९, अकोला ५१, वाशिम ४६, व बुलडाणा जिल्ह्यात ९० केंद्रे कार्र्यान्वित करण्यात आलीत. व्यतिरिक्त दुर्गम व डोंगराळ भागातही केंद्रे सुरू करण्यात आली असली तरी माहिती शेतकऱ्यांना मिळत नसल्याने कुचकामी ठरली आहेत.राज्यभरातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना लॉगइन आयडी व पासवर्ड दिला आहे. त्यांना हवामानाची माहिती पाहता येते. लवकरच शेतकऱ्यांना हवामानाचा सल्लाचा एसएमएस पाठविला जाईल. सध्या अपडटेशनचे काम सुरू आहे.- भूषण रेनके,विदर्भ व्यवस्थापक, महावेध प्रकल्प

टॅग्स :Governmentसरकार