शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

पश्चिम विदर्भात ३२ लाख हेक्टरमध्ये खरीप, पेरणीपूर्व मशागतींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 5:29 PM

रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे यंदा खरिपाच्या पेरणी शनिवारपासून सुरू होणाºया आर्द्रा नक्षत्रात होणार आहे.

अमरावती - रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे यंदा खरिपाच्या पेरणी शनिवारपासून सुरू होणाºया आर्द्रा नक्षत्रात होणार आहे. या नक्षत्राचे वाहन हत्ती पाण्यात जलविहार करणार, असा शेतक-यांचा अंदाज आहे. हवामानतज्ज्ञांनीही २५ जूनपासून मान्सून व-हाडात सक्रिय होण्याची शक्यता वर्तविली आहे. सध्या शिवारात पेरणीपूर्व मशागतींना वेग आलेला आहे. यंदा ३१ लाख ६४ हजार ४१८ हेक्टरमध्ये खरिपाची पेरणी होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.गतवर्षीचा खरीप सरासरीपेक्षा २४ टक्के कमी पावसामुळे बाधित झाला. यंदा १२ ते १५ जून दरम्यान मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. मात्र, अरबी समुद्रात आलेल्या ‘वायू’ चक्रीवादळामुळे मान्सूनची गती मंदावली, आता तो राज्यात प्रवेशित झाल्यामुळे शेतकºयांमध्ये उत्साह संचारला असून, शेतशिवारात कामांची लगबग सुरू झालेली आहे. यंदाच्या खरिपासाठी अमरावती जिल्ह्यात ७,२८,११२ हेक्टर, बुलडाणा ६,६५,५९६, अकोला ४,८२,६२०, वाशिम ३,९९,६६९ व यवतमाळ जिल्ह्यात ८,८८,४२१ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. पावसाने आणखी १० ते १५ दिवस दांडी मारल्यास मूग व उडदाचे पेरणीक्षेत्र सोयाबीन व कपाशीत रूपांतरित होणार आहे.यंदा सर्वाधिक १३,६४,८०४ हेक्टरमध्ये सोयाबीनचे क्षेत्र राहणार आहे. यामध्ये सर्वाधिक ३,७५०४६ हेक्टर क्षेत्र बुलडाणा जिल्ह्यात राहील, अकोला १,११,६१०, वाशीम २,८३,१३७, अमरावती ३,२३,३०० व यवतमाळ जिल्ह्यात २,७२,७११ हेक्टर राहणार आहे. संकरित कपाशीचे यंदा ९,६९,०५७ हेक्टर  व सुधारित कपाशीचे १७,५३१ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. संकरित ज्वार १,४४,५१८ हेक्टर, संकरित बाजरा २,००८ हेक्टर, मका १९,३०३ हेक्टर, तूर ४,२९,८९८ हेक्टर, मूग १,३३,८२७, उडीद ६४,५३६ हेक्टर, भुईमूग १,६४८ हेक्टर, सूर्यफूल ६,७२९ हेक्टर, तीळ ४८७३ हेक्टर तसेच धान व इतर पिकांचे ५,५८९ हेक्टर क्षेत्र राहणार आहे.

यंदा ६,४०,४६० क्विंटल बियाण्यांची मागणी खरिपासाठी यंदा ६,४०,४६० क्विंटल बियाण्यांची मागणी कृषी विभागाने नोंदविली आहे. यामध्ये ३,४८५ क्विंटल संकरित ज्वार, बाजरा २ क्विंटल, मका १००, तूर १०,५११, मूग २,२६९, उडीद ३,८९०, सूर्यफूल २, तीळ १३, सोयाबीन २,७८,७३०, संकरित कापूस २,७८,७३० व सुधारित कापसाचे १३ क्विंटल बियाणे लागणार आहेत. यंदा सार्वजनिक क्षेत्रातून ३,१८,०८९ क्विंटल खासगी ३,२२,३७१ क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहेत. महाबीजद्वारा २,९९,५८९ क्विंटल बियाणे उपलब्ध होणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

खरिपासाठी ६,७४,१४० मे.टन खतांची मागणी यंदाच्या खरीप हंगामासाठी ६,७४,१४० मे.टन रासायनिक खतांची मागणी कृषी विभागाने नोंदविली आहे. यामध्ये युरिया २,१४,५०९ मे.टन, डीएपी १,०७,५३७, एमओपी ३९,४७१, एसएसपी १,०३,७९३ व कॉप्लेक्समध्ये २,०८,८२९ मे.टन खतांचा समावेश आहे. सद्यस्थितीत ५,५२,४७५ मे.टन खतांचे आवंटन आहे. यामध्ये युरिया १,८६,००० मे.टन, डीएपी ८०४१०, एमओपी ३४,४३५, एसएसपी ९१,२१० व कॉप्लेक्सेसमध्ये १,६०२४० मे.टन खतांचा समावेश आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAmravatiअमरावती