शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
10
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
11
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
12
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
13
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
14
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
15
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
16
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

पश्चिम विदर्भातील प्रकल्पांचा पाणीसाठा सरासरी ८० टक्क्यांवर स्थिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 12:10 PM

यंदा मान्सूनचा पाऊस ३० सप्टेंबर रोजी संपला आहे. पावसाळा जरी संपला असला तरी अकाली पावसाची शक्यता नाकारता येत नाही. त्याकारणाने लघु, मध्यम व मोठ्या अशा एकूण ५०२ प्रकल्पांचा पाणीसाठा सरासरी ८० टक्क्यांवर स्थिरावला आहे.

ठळक मुद्देसात प्रकल्पांची दारे उघडीच

संदीप मानकरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा मान्सूनचा पाऊस ३० सप्टेंबर रोजी संपला आहे. पावसाळा जरी संपला असला तरी अकाली पावसाची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, अकाली पावसाने प्रकल्पातील पाणीसाठा फारसा वाढण्याची शक्यता नाही. त्याकारणाने लघु, मध्यम व मोठ्या अशा एकूण ५०२ प्रकल्पांचा पाणीसाठा सरासरी ८० टक्क्यांवर स्थिरावला आहे.विभागातील नऊ मोठ्या प्रकल्पांत ८३.८६ टक्के आहे. २४ मध्यम प्रकल्पांत सरासरी ९०.३३ टक्के पाणीसाठा आहे. ४७३ लघु प्रकल्पांत ६९.८१ टक्के पाणीसाठा आहे. मात्र, यापुढे पाणीसाठा वाढण्याची शक्यता नसल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले. अद्यापही सात प्रकल्पांची दारे उघडीच आहेत. पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला असून, किमान पाच ते दोन सेंमीपर्यंत अद्याप अनेक प्रकल्पांचे गेट उघडेच आहेत.मोठ्या प्रकल्पांमध्ये अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा प्रकल्प शंभर टक्के भरला. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्प ६९.८० टक्के, अरुणावती १५.८८ टक्के, बेंबळा १०० टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा ५९.५४ टक्के, वान प्रकल्प १०० टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ७१.३६ टक्के, पेनटाकळी १०० टक्के, खडकपूर्णा ९९.७ टक्के पाणीसाठा साचला आहे. यामध्ये उर्ध्व वर्धा, बेंबळा, वान व पेनटाकळी प्रकल्पांचे अद्यापही गेट उघडेच आहेत. त्यातून नदीपात्रात पाणीसाठा होत आहे. मात्र, विसर्गाचे प्रमाण घमी प्रतिसेकंदानें कमी करण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.२४ मध्यम प्रकल्पांची स्थितीअमरावती जिल्ह्यतील शहानूर मध्यम प्रकल्पात ९९.३७ टक्के पाणीसाठा आहे. चंद्रभागा ९९.२२ टक्के, पूर्णा ९६.२७ टक्के, सपन १०० टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस १०० टक्के, सायखेडा १०० टक्के, गोकी ५८.२८ टक्के, वाघाडी ९५.५३ टक्के, बोरगाव १०० टक्के, नवरगाव १०० टक्के, अकोला जिल्ह्यातील निर्गुणा १०० टक्के, मोर्णा ७२.५५ टक्के, उमा ६२.६७ टक्के, घुंगशी बॅरेज ९०.३३ टक्के, अडाण ८४.१९ टक्के, वाशीम जिल्ह्यातील सोनल ८८.१८ टक्के, एकबुर्जी ७६.२७ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा १०० टक्के, पलढग १०० टक्के, मस १०० टक्के, कोेराडी ३३.२० टक्के, मन ९६.९३ टक्के तोरणा १०० टक्के, उतावळी १०० टक्के पाणीसाठा साचला आहे. त्याकारणाने आणखीन पाणी वाढण्याची शक्यता कमी आहे. पण परतीच्या किंवा अकाली पावसाने काही प्रमाणात पाणीसाठा वाढू शकते, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.तीन मध्यम प्रकल्पांची अद्यापही द्वारे उघडीचअमरावती जिल्ह्यातील तीन मध्यम प्रकल्पांचे गेट अद्यापही उघडेच आहेत. ९ आॅक्टोंबर सकाळी सात पर्यंत घेतलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यातील शहानूर प्रकल्पाचे एक गेट २.५ सेंमीने उघडे आहे. ३ घमी प्रतिसकंदाने विसर्ग होत आहे. चंद्रभागा प्रकल्पाचे दोन गेट उघडे आहे. पाच सेंमीने ९.०० घमी प्रतिसेकंदाने विसर्ग होत आहे. सपन प्रकल्पाचे दोन गेट तीन सेंमीने उघडे असून ५.४८ घमीप्रसेकंदाने विसर्ग होत आहे.

टॅग्स :Waterपाणी