शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! कंधार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
3
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
4
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
5
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
6
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!
7
Swami Samartha: स्वामींची निरपेक्ष सेवा केलीत तर 'या' दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळणारच!
8
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
9
पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप! कराची बाजारातील व्यवहार अचानक बंद; नेमकं काय घडलं?
10
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
11
२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास
12
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
13
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
14
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
15
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
16
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
17
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
18
Rohit Sharma Retires: 'आई, माझं स्वप्न भंगलं' रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर ढसाढसा रडली तरुणी, व्हिडीओ व्हायरल
19
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
20
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई

वैधानिक मंडळाशिवाय विदर्भाला न्याय नाही- देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 18:19 IST

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी फडणवीस जिल्हा दौऱ्यावर आले होते.

अमरावती : वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ द्यावी. मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्यानंतर मुदतवाढ मिळालेली नाही. सध्या हे मंडळच अस्तित्वात नसल्याची माहिती आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एका मंत्र्याने मंत्रिमंडळ बैठकीत याला विरोध केला. या मंडळाशिवाय विदर्भ व मराठवाड्याला न्याय मिळू शकत नाही. विदर्भ  व मराठवाड्यातील मंत्र्यांनी याविषयी कॅबिनेटमध्ये आवाज उठविण्याचे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केले.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी फडणवीस जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी क्वारंटाईन सेंटरला भेटी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. अनलॉक म्हणजे काय, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे. जबाबदारी टाळून प्रशासनावर सर्व काही सोपविले जात आहे. जनतेला याविषयीची स्पष्टता समजली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.

कापूस खरेदीमध्ये शासनाला अपयश आल्याचा आरोप त्यांनी केला. दोन वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही कापसाची खरेदी झालेली नाही. यासाठी व्यवस्था वाढवा. या मुद्द्याशिवाय बोगस बियाण्यांमुळेही शेतकरी अडचणीत आलेला आहे. बियाणे कंपन्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

ऊर्जामंत्र्यांनी १०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचे घोषित केले आहे. प्रत्यक्षात भरमसाट बिल येत असल्याने अ‍ॅव्हरेज बिलात सूट मिळाली पाहिजे. शेतकºयांची कर्जमाफी झालेली नाही. बँकांसोबत करारनामे झालेले नाहीत. यामध्ये बँकांनाही अनेक अडचणी आल्याने थकबाकीदार शेतकºयांना कर्ज मिळाले नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

पत्रपरिषदेला शहराध्यक्ष किरण पातूरकर, जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, महापौर चेतन गावंडे, खासदार रामदास तडस, आमदार प्रवीण पोटे, आमदार प्रताप अडसड, आमदार रवि राणा, माजी आमदार अनिल बोंडे, सुनील देशमुख, शिवराय कुळकर्णी आदी उपस्थित होते.

क्वारंटाईन कक्षात पाणी, भोजनाची गैरसोय

देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथील क्वारंटाईन सेंटरला भेटी दिल्यात. याठिकाणी पाण्याची गैरसोय आहे, स्वच्छता नाही तसेच जेवणाचा दर्जा सुमार असल्याचे विभागीय आयुक्तांना सांगितल्याचे ते म्हणाले. मुंबई व अन्य हॉटस्पॉटमधून परतलेल्या व्यक्तींमुळे संक्रमितांची संख्यावाढ झालेली आहे. संसर्ग जास्त असल्याने स्वॅब टेस्टिंग वाढवायला पाहिजे. हायरिस्कच्या नागरिकांना आयसोलेट करायला पाहिजे. यासाठी रॅपिड टेस्ट किट मागविल्याचे विभागीय आयुक्तांनी माहिती दिल्याचे फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAmravatiअमरावती