शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

वैधानिक मंडळाशिवाय विदर्भाला न्याय नाही- देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 18:19 IST

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी फडणवीस जिल्हा दौऱ्यावर आले होते.

अमरावती : वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ द्यावी. मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्यानंतर मुदतवाढ मिळालेली नाही. सध्या हे मंडळच अस्तित्वात नसल्याची माहिती आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एका मंत्र्याने मंत्रिमंडळ बैठकीत याला विरोध केला. या मंडळाशिवाय विदर्भ व मराठवाड्याला न्याय मिळू शकत नाही. विदर्भ  व मराठवाड्यातील मंत्र्यांनी याविषयी कॅबिनेटमध्ये आवाज उठविण्याचे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केले.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी फडणवीस जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी क्वारंटाईन सेंटरला भेटी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. अनलॉक म्हणजे काय, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे. जबाबदारी टाळून प्रशासनावर सर्व काही सोपविले जात आहे. जनतेला याविषयीची स्पष्टता समजली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.

कापूस खरेदीमध्ये शासनाला अपयश आल्याचा आरोप त्यांनी केला. दोन वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही कापसाची खरेदी झालेली नाही. यासाठी व्यवस्था वाढवा. या मुद्द्याशिवाय बोगस बियाण्यांमुळेही शेतकरी अडचणीत आलेला आहे. बियाणे कंपन्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

ऊर्जामंत्र्यांनी १०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचे घोषित केले आहे. प्रत्यक्षात भरमसाट बिल येत असल्याने अ‍ॅव्हरेज बिलात सूट मिळाली पाहिजे. शेतकºयांची कर्जमाफी झालेली नाही. बँकांसोबत करारनामे झालेले नाहीत. यामध्ये बँकांनाही अनेक अडचणी आल्याने थकबाकीदार शेतकºयांना कर्ज मिळाले नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

पत्रपरिषदेला शहराध्यक्ष किरण पातूरकर, जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, महापौर चेतन गावंडे, खासदार रामदास तडस, आमदार प्रवीण पोटे, आमदार प्रताप अडसड, आमदार रवि राणा, माजी आमदार अनिल बोंडे, सुनील देशमुख, शिवराय कुळकर्णी आदी उपस्थित होते.

क्वारंटाईन कक्षात पाणी, भोजनाची गैरसोय

देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथील क्वारंटाईन सेंटरला भेटी दिल्यात. याठिकाणी पाण्याची गैरसोय आहे, स्वच्छता नाही तसेच जेवणाचा दर्जा सुमार असल्याचे विभागीय आयुक्तांना सांगितल्याचे ते म्हणाले. मुंबई व अन्य हॉटस्पॉटमधून परतलेल्या व्यक्तींमुळे संक्रमितांची संख्यावाढ झालेली आहे. संसर्ग जास्त असल्याने स्वॅब टेस्टिंग वाढवायला पाहिजे. हायरिस्कच्या नागरिकांना आयसोलेट करायला पाहिजे. यासाठी रॅपिड टेस्ट किट मागविल्याचे विभागीय आयुक्तांनी माहिती दिल्याचे फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAmravatiअमरावती