शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

विद्यापीठाचा तलाव उन्हाळ्यापूर्वीच कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 06:00 IST

विद्यापीठाने सिंचनक्षमतेत वाढ, पर्यावरणाचा समतोल, वृक्षांचे संगोपन व संवर्धनासाठी सन १९९३-९४ मध्ये ५०० मीटर लांब भिंतीचा तलाव निर्माण केला होता. एकंदर २० ते २५ वर्षे या तलावातून कमी अधिक प्रमाणात विद्यापीठाला पाणी वापरता आले. तलावातून वाहून जाणारे पाणी पुढे रोखण्यासाठी कोल्हापुरी बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. मात्र, गतवर्षापासून तलावाच्या भिंतीतून लीकेजमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे.

ठळक मुद्देसिंचन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह विद्यापीठात हिरवळ सुरक्षित ठेवताना होणार कसरत

गणेश वासनिक ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील तलाव उन्हाळ्यापूर्वीच कोरडा झाला आहे. यंदा पावसाळ्यात ‘ओव्हर फ्लो’ झालेल्या या तलावाला अलीकडे बूड लागल्याने उन्हाळ्यात हिरवळ कशी सुरक्षित ठेवणार, हा गंभीर प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. सिंचन विभागाच्या देखरेखीत साकारलेल्या या तलावाची गळती रोखण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे वास्तव आहे.विद्यापीठाने सिंचनक्षमतेत वाढ, पर्यावरणाचा समतोल, वृक्षांचे संगोपन व संवर्धनासाठी सन १९९३-९४ मध्ये ५०० मीटर लांब भिंतीचा तलाव निर्माण केला होता. एकंदर २० ते २५ वर्षे या तलावातून कमी अधिक प्रमाणात विद्यापीठाला पाणी वापरता आले. तलावातून वाहून जाणारे पाणी पुढे रोखण्यासाठी कोल्हापुरी बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. मात्र, गतवर्षापासून तलावाच्या भिंतीतून लीकेजमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. यावर्षी लीकेज आणखी वाढल्यामुळे पावसाळ्यात ओव्हर फ्लो झालेला हा तलाव त्यानंतर दीड महिन्यांतच कोरडा झाला आहे. त्यामुळे परिसरातील गावे, खेड्यांतील पशूंना पाणी कसे उपलब्ध होईल, ही चिंता आतापासून पशुपालकांना सतावू लागली आहे. तलाव परिसरातील वन्यजिवांनासुद्धा यंदा पाण्यापासून मुकावे लागणार आहे. हिरवळ अशी सर्वदूर ओळख असलेल्या अमरावती विद्यापीठाला यंदा वृक्ष, फुलझाडे, हिरवळ जोपासताना पाण्याची तीव्र टंचाई जाणवेल, यात तीळमात्र शंका नाही. विद्यापीठ प्रशासनाने वेळेपूर्वीच भिंतीचे लीकेज दुरुस्ती केले असते, तर तलाव कोरडा झालाच नसता, असा सूर उमटू लागला आहे.लीकेज रोखण्यात अपयशसिंचन विभागाचे दुरुस्ती पत्राला उत्तर नाहीतलावाच्या भिंतीतून पाणी लीक होत असल्यामुळे ती दुरुस्त करावी, असे पत्र सिंचन विभागाला विद्यापीठाने पाठविले होते. मात्र, विद्यापीठाच्या या पत्राची सिंचन विभागाने दखल घेतली नाही. परिणामी वर्षभरात तलावाच्या भिंतीतून पाणी वाहून जाण्याचे प्रमाण वाढले. यंदा जोरदार पावसाने तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतरही अवघ्या दीड महिन्यांत तो कोरडा पडला आहे.‘रूसा’ अंतर्गत ५० लाखांतून तलाव खोलीकरणतलाव खोलीकरणाला कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी मान्यता प्रदान करून जलसंधारण समिती गठित केली. आता वित्त समितीसमोर हा प्रस्ताव ठेवला जाईल. यावर्षी उन्हाळ्यात काम युद्धस्तरावर होणार आहे. सिंचन क्षमता वाढविण्यासाठी राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रूसा) अंतर्गत खोलीकरण, भिंतींचे बांधकाम याकरिता ५० लाख रुपये निधी खर्च केला जाणार आहे.मॅकेनिक प्रणालीने पाणी अडविणारतलावातून वाहून जाणारे पाणी विद्यापीठ परिसराच्या बाहेर जाणार नाही, याची दखल नव्या प्रस्तावात घेण्यात आली आहे. कोल्हापुरी पद्धतीने पाणी दुसऱ्या तलावात साठविले जाणार आहे. त्याकरिता भूमिगत जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. तलावातील पाणी साठवणुकीकरिता यांत्रिक प्रणालीचा वापर होणार आहे.तलाव निर्मितीला २५ वर्षे झालीत. भिंतीतून लीकेज असल्याबाबत सिंचन विभागाला कळविले. त्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. मात्र, आता तलावाचे खोलीकरण, भिंत दुरुस्ती, निर्मितीसाठी नव्याने प्रस्ताव तयार केला आहे. उन्हाळ्यात ही कामे पूर्णत्वास जातील.- शशिकांत रोडेकार्यकारी अभियंता

टॅग्स :water shortageपाणीकपात