शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

विद्यापीठाचा तलाव उन्हाळ्यापूर्वीच कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 06:00 IST

विद्यापीठाने सिंचनक्षमतेत वाढ, पर्यावरणाचा समतोल, वृक्षांचे संगोपन व संवर्धनासाठी सन १९९३-९४ मध्ये ५०० मीटर लांब भिंतीचा तलाव निर्माण केला होता. एकंदर २० ते २५ वर्षे या तलावातून कमी अधिक प्रमाणात विद्यापीठाला पाणी वापरता आले. तलावातून वाहून जाणारे पाणी पुढे रोखण्यासाठी कोल्हापुरी बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. मात्र, गतवर्षापासून तलावाच्या भिंतीतून लीकेजमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे.

ठळक मुद्देसिंचन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह विद्यापीठात हिरवळ सुरक्षित ठेवताना होणार कसरत

गणेश वासनिक ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील तलाव उन्हाळ्यापूर्वीच कोरडा झाला आहे. यंदा पावसाळ्यात ‘ओव्हर फ्लो’ झालेल्या या तलावाला अलीकडे बूड लागल्याने उन्हाळ्यात हिरवळ कशी सुरक्षित ठेवणार, हा गंभीर प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. सिंचन विभागाच्या देखरेखीत साकारलेल्या या तलावाची गळती रोखण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे वास्तव आहे.विद्यापीठाने सिंचनक्षमतेत वाढ, पर्यावरणाचा समतोल, वृक्षांचे संगोपन व संवर्धनासाठी सन १९९३-९४ मध्ये ५०० मीटर लांब भिंतीचा तलाव निर्माण केला होता. एकंदर २० ते २५ वर्षे या तलावातून कमी अधिक प्रमाणात विद्यापीठाला पाणी वापरता आले. तलावातून वाहून जाणारे पाणी पुढे रोखण्यासाठी कोल्हापुरी बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. मात्र, गतवर्षापासून तलावाच्या भिंतीतून लीकेजमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. यावर्षी लीकेज आणखी वाढल्यामुळे पावसाळ्यात ओव्हर फ्लो झालेला हा तलाव त्यानंतर दीड महिन्यांतच कोरडा झाला आहे. त्यामुळे परिसरातील गावे, खेड्यांतील पशूंना पाणी कसे उपलब्ध होईल, ही चिंता आतापासून पशुपालकांना सतावू लागली आहे. तलाव परिसरातील वन्यजिवांनासुद्धा यंदा पाण्यापासून मुकावे लागणार आहे. हिरवळ अशी सर्वदूर ओळख असलेल्या अमरावती विद्यापीठाला यंदा वृक्ष, फुलझाडे, हिरवळ जोपासताना पाण्याची तीव्र टंचाई जाणवेल, यात तीळमात्र शंका नाही. विद्यापीठ प्रशासनाने वेळेपूर्वीच भिंतीचे लीकेज दुरुस्ती केले असते, तर तलाव कोरडा झालाच नसता, असा सूर उमटू लागला आहे.लीकेज रोखण्यात अपयशसिंचन विभागाचे दुरुस्ती पत्राला उत्तर नाहीतलावाच्या भिंतीतून पाणी लीक होत असल्यामुळे ती दुरुस्त करावी, असे पत्र सिंचन विभागाला विद्यापीठाने पाठविले होते. मात्र, विद्यापीठाच्या या पत्राची सिंचन विभागाने दखल घेतली नाही. परिणामी वर्षभरात तलावाच्या भिंतीतून पाणी वाहून जाण्याचे प्रमाण वाढले. यंदा जोरदार पावसाने तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतरही अवघ्या दीड महिन्यांत तो कोरडा पडला आहे.‘रूसा’ अंतर्गत ५० लाखांतून तलाव खोलीकरणतलाव खोलीकरणाला कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी मान्यता प्रदान करून जलसंधारण समिती गठित केली. आता वित्त समितीसमोर हा प्रस्ताव ठेवला जाईल. यावर्षी उन्हाळ्यात काम युद्धस्तरावर होणार आहे. सिंचन क्षमता वाढविण्यासाठी राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रूसा) अंतर्गत खोलीकरण, भिंतींचे बांधकाम याकरिता ५० लाख रुपये निधी खर्च केला जाणार आहे.मॅकेनिक प्रणालीने पाणी अडविणारतलावातून वाहून जाणारे पाणी विद्यापीठ परिसराच्या बाहेर जाणार नाही, याची दखल नव्या प्रस्तावात घेण्यात आली आहे. कोल्हापुरी पद्धतीने पाणी दुसऱ्या तलावात साठविले जाणार आहे. त्याकरिता भूमिगत जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. तलावातील पाणी साठवणुकीकरिता यांत्रिक प्रणालीचा वापर होणार आहे.तलाव निर्मितीला २५ वर्षे झालीत. भिंतीतून लीकेज असल्याबाबत सिंचन विभागाला कळविले. त्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. मात्र, आता तलावाचे खोलीकरण, भिंत दुरुस्ती, निर्मितीसाठी नव्याने प्रस्ताव तयार केला आहे. उन्हाळ्यात ही कामे पूर्णत्वास जातील.- शशिकांत रोडेकार्यकारी अभियंता

टॅग्स :water shortageपाणीकपात