शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

विद्यापीठाचा तलाव उन्हाळ्यापूर्वीच कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 06:00 IST

विद्यापीठाने सिंचनक्षमतेत वाढ, पर्यावरणाचा समतोल, वृक्षांचे संगोपन व संवर्धनासाठी सन १९९३-९४ मध्ये ५०० मीटर लांब भिंतीचा तलाव निर्माण केला होता. एकंदर २० ते २५ वर्षे या तलावातून कमी अधिक प्रमाणात विद्यापीठाला पाणी वापरता आले. तलावातून वाहून जाणारे पाणी पुढे रोखण्यासाठी कोल्हापुरी बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. मात्र, गतवर्षापासून तलावाच्या भिंतीतून लीकेजमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे.

ठळक मुद्देसिंचन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह विद्यापीठात हिरवळ सुरक्षित ठेवताना होणार कसरत

गणेश वासनिक ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील तलाव उन्हाळ्यापूर्वीच कोरडा झाला आहे. यंदा पावसाळ्यात ‘ओव्हर फ्लो’ झालेल्या या तलावाला अलीकडे बूड लागल्याने उन्हाळ्यात हिरवळ कशी सुरक्षित ठेवणार, हा गंभीर प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. सिंचन विभागाच्या देखरेखीत साकारलेल्या या तलावाची गळती रोखण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे वास्तव आहे.विद्यापीठाने सिंचनक्षमतेत वाढ, पर्यावरणाचा समतोल, वृक्षांचे संगोपन व संवर्धनासाठी सन १९९३-९४ मध्ये ५०० मीटर लांब भिंतीचा तलाव निर्माण केला होता. एकंदर २० ते २५ वर्षे या तलावातून कमी अधिक प्रमाणात विद्यापीठाला पाणी वापरता आले. तलावातून वाहून जाणारे पाणी पुढे रोखण्यासाठी कोल्हापुरी बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. मात्र, गतवर्षापासून तलावाच्या भिंतीतून लीकेजमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. यावर्षी लीकेज आणखी वाढल्यामुळे पावसाळ्यात ओव्हर फ्लो झालेला हा तलाव त्यानंतर दीड महिन्यांतच कोरडा झाला आहे. त्यामुळे परिसरातील गावे, खेड्यांतील पशूंना पाणी कसे उपलब्ध होईल, ही चिंता आतापासून पशुपालकांना सतावू लागली आहे. तलाव परिसरातील वन्यजिवांनासुद्धा यंदा पाण्यापासून मुकावे लागणार आहे. हिरवळ अशी सर्वदूर ओळख असलेल्या अमरावती विद्यापीठाला यंदा वृक्ष, फुलझाडे, हिरवळ जोपासताना पाण्याची तीव्र टंचाई जाणवेल, यात तीळमात्र शंका नाही. विद्यापीठ प्रशासनाने वेळेपूर्वीच भिंतीचे लीकेज दुरुस्ती केले असते, तर तलाव कोरडा झालाच नसता, असा सूर उमटू लागला आहे.लीकेज रोखण्यात अपयशसिंचन विभागाचे दुरुस्ती पत्राला उत्तर नाहीतलावाच्या भिंतीतून पाणी लीक होत असल्यामुळे ती दुरुस्त करावी, असे पत्र सिंचन विभागाला विद्यापीठाने पाठविले होते. मात्र, विद्यापीठाच्या या पत्राची सिंचन विभागाने दखल घेतली नाही. परिणामी वर्षभरात तलावाच्या भिंतीतून पाणी वाहून जाण्याचे प्रमाण वाढले. यंदा जोरदार पावसाने तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतरही अवघ्या दीड महिन्यांत तो कोरडा पडला आहे.‘रूसा’ अंतर्गत ५० लाखांतून तलाव खोलीकरणतलाव खोलीकरणाला कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी मान्यता प्रदान करून जलसंधारण समिती गठित केली. आता वित्त समितीसमोर हा प्रस्ताव ठेवला जाईल. यावर्षी उन्हाळ्यात काम युद्धस्तरावर होणार आहे. सिंचन क्षमता वाढविण्यासाठी राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रूसा) अंतर्गत खोलीकरण, भिंतींचे बांधकाम याकरिता ५० लाख रुपये निधी खर्च केला जाणार आहे.मॅकेनिक प्रणालीने पाणी अडविणारतलावातून वाहून जाणारे पाणी विद्यापीठ परिसराच्या बाहेर जाणार नाही, याची दखल नव्या प्रस्तावात घेण्यात आली आहे. कोल्हापुरी पद्धतीने पाणी दुसऱ्या तलावात साठविले जाणार आहे. त्याकरिता भूमिगत जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. तलावातील पाणी साठवणुकीकरिता यांत्रिक प्रणालीचा वापर होणार आहे.तलाव निर्मितीला २५ वर्षे झालीत. भिंतीतून लीकेज असल्याबाबत सिंचन विभागाला कळविले. त्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. मात्र, आता तलावाचे खोलीकरण, भिंत दुरुस्ती, निर्मितीसाठी नव्याने प्रस्ताव तयार केला आहे. उन्हाळ्यात ही कामे पूर्णत्वास जातील.- शशिकांत रोडेकार्यकारी अभियंता

टॅग्स :water shortageपाणीकपात