शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

अमरावतीत पाचच्या नोटांची अघोषित बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 23:21 IST

शहरात पाच रुपयांच्या अघोषित नोटबंदीने अमरावतीकरांना संभ्रमात पाडले आहे. चलनातील पाच रुपयांच्या नोटा न स्वीकारणे हा फौजदारी गुन्हा ठरत असतानाही अमरावती शहरातील अनेक व्यापारी वर्ग मनमानी कारभार चालवून पाच रुपयांच्या नोटा घेत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पाच रुपयांची नोट न स्वीकारणाऱ्यांविरुद्ध पोलीस तक्रार करण्यासाठी नागरिकांनी पुढे येणे आता गरजेचे आहे.

ठळक मुद्देकसा हा मनमानी कारभार? : कायदा म्हणतो, हा तर फौजदारी गुन्हा; जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख घेणार का दखल?

वैभव बाबरेकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात पाच रुपयांच्या अघोषित नोटबंदीने अमरावतीकरांना संभ्रमात पाडले आहे. चलनातील पाच रुपयांच्या नोटा न स्वीकारणे हा फौजदारी गुन्हा ठरत असतानाही अमरावती शहरातील अनेक व्यापारी वर्ग मनमानी कारभार चालवून पाच रुपयांच्या नोटा घेत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पाच रुपयांची नोट न स्वीकारणाऱ्यांविरुद्ध पोलीस तक्रार करण्यासाठी नागरिकांनी पुढे येणे आता गरजेचे आहे.केंद्र शासनाने पाचशे व हजाराची नोट चलनातून बांद केल्यानंतर देशभरातील नागरिक संभ्रमात पडले होते. त्यावेळी नागरिकांनी पाचशे व एक हजारांच्या सर्व नोटा बँकेत जमा केल्या. त्यानंतर पाचशे व दोन हजारांच्या नवीन नोटा चलनात आणल्या गेल्या. हळूहळू १०० व ५० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या गेल्या. मात्र, पाच, दहा व वीस रुपयांच्या जुन्याच नोटा ठेवण्यात आल्या. त्या नोटांबाबत नवीन नियमावली नसून, त्या आजही चलनात आहेत. गेल्या काही महिन्यांत अमरावतीत शहरातील अनेक छोट्या-मोठ्या व्यापाºयांनी अचानक पाच रुपयांच्या नोटा स्वीकारणेच बंद करून टाकले आहे. हा प्रकार एका व्यापाºयाकडून दुसºया व्यापाºयापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश व्यापारी पाच रुपयांच्या नोटा स्वीकारतच नसल्याचे दिसून येत आहे. या अघोषित नोटबंदीमुळे शहरातील अनेकांकडे पाचच्या नोटांचा खच जमलेला आहे. पाचच्या नोटा स्वीकारणे बंद झाल्यामुळे शहरात चिल्लरचा तुटवडादेखील निर्माण झाला आहे. पाचची नोट घेऊन काही खरेदी करण्यासाठी गेल्यास, ती नोट चालत नसल्याचे थेट व्यापारी सांगत आहे. त्यामुळे अनेक जण पाचची नोट घेऊन या दुकानातून त्या दुकानात चकरा मारतानाही दिसत आहे. पाचची नोट खपविताना तर अनेकांचे व्यापाºयांशी वादसुद्धा झाले आहेत. त्यामुळे गोरगरिबांना तर पाचची नोट खर्च करण्याचा प्रश्नच पडला आहे. याशिवाय अमरावतीकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कायद्यातील तरतुदीत ज्या नोटा चलनात आहे, त्या नोटा स्वीकारणे प्रत्येकालाच बंधनकारक आहे. जर कोणीही चलनातील नोटा स्वीकारत नसेल, तर त्याच्याविरुद्ध पोलीस तक्रार करण्याचा अधिकारी नागरिकांना आहे.पाच रुपयांची नोट देऊ कुणाला?माझे किरकोळ किराणा स्टोअर्स असल्याने सकाळी दूधविक्रीसह आवश्यक साहित्य खरेदीकरिता ग्राहक येतात. काहींनी दिलेल्या पाच रुपयांच्या नोटा मी इतर व्यापाऱ्यांना दिल्या असता, त्या स्वीकारल्या नाहीत. अद्याप माझ्याकडे १४ नोटा जमा झालेल्या असून, काही ग्राहक अद्यापही पाच रुपयांची नोट घेऊन येत असल्याने त्यांना समजावतो आहे. मात्र, शासनाने अधिकृतरीत्या पाच रुपयांच्या नोटा बंद झाल्याचे घोषित केलेले नसल्याने आम्ही स्वीकारतो तुम्हीही स्वीकारा ना, असे ते सांगतात. ग्राहकाला परत पाठवित राहिल्यास धंदा कसा होईल. त्यामुळे उधारी वाढू लागली आहे, असे गजानननगरातील एका किराणा व्यावसायिकांने सांगितले.काय म्हणतो आरबीआयचा नियम?रिझर्व्ह बॅक आॅफ इंडिया अ‍ॅक्टच्या करन्सी रेग्युलेशन अंतर्गत चलनातील नोटांची देवाण-घेवाण करणे गरजेचे आहे. चलनातील नोटा न स्वीकारणे हा आरबीआय अ‍ॅक्टनुसार गुन्हा ठरतो. चलनातील नोटा न स्वीकारणांºयाविरुद्ध कोणी तक्रार केल्यास कलम १८८ नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो.लोकमत प्रतिनिधीचा अनुभवपाच रुपयांची नोट बंद झाली असल्याने आम्ही ती नोट घेत नसल्याचे अनेक व्यापारी वर्ग सांगत आहे. याचा थेट अनुभव घेण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधीने सोमवारी शहरातील काही व्यावसायिकांकडे वस्तू खरेदी करून पाचची नोट दिली असता, ती त्या व्यापाऱ्याने स्वीकारली नाही. यानंतर ‘लोकमत’ने अन्य व्यापाºयांकडे जाऊन शहानिशा करण्याचा प्रयत्न केला असता, मती भ्रमित करणाराच अनुभव प्रतिनिधीला आला. उपाहारगृह, पानटपरी, किराणा दुकान, दूध विक्री केंद्र, भाजीपाल्याच्या हातगाड्या, फेरीवाले अशा दहा ते बारा जणांंना पाच रुपयांची देण्याचे प्रयत्न केला असता, त्यांनी ती नोट बंद झाल्याचे सांगून स्वीकारलीच नाही. या व्यापाऱ्यांना पाचची नोट सुरु असल्याची मुद्दामच जाणून करून दिली. मात्र, तरीही त्यांनी स्वीकारली नाही.पाच रुपयांची नोट चलनात आहे. ती नोट बंद झाल्याचा संभ्रम नागरिकांमध्ये असेल, तर तो त्वरित काढावा. ती नोट नागरिक व व्यापाºयांनी स्वीकारलीच पाहिजे.- मुकेश दलालमुख्य व्यवस्थापकआरबीओ, क्षेत्रीय कार्यालयआरबीआयच्या नियमानुसार पाच रुपयांची नोट चलनात आहे. त्यामुळे ती नोट न स्वीकारणे तर्कसंगत नाही. अशा लोकांविरुद्ध फौजदारी कारवाई होऊ शकते. नोट स्वीकारली जात नसल्यास नागरिकांनी तक्रार करावी.- यशवंत सोळंकेपोलीस उपायुक्तआरबीआयच्या कायद्यातील तरतुदीनुसार पाच रुपये चलनात आहे. या चलनातील नोटा न स्वीकारणे म्हणजे आरबीआयच्या निर्देशांचे उल्लंघन करणे होय. पाच रुपयांची नोट चलनात आहे. ती कोणी स्विकारत नसेल, तर तो गुन्हा ठरतो. याबाबत पोलीस तक्रार झाल्यास कलम १८८ नुसार कारवाई होई शकते.- विश्वास वैद्य, विधी अधिकारी, पोलीस आयुक्तालय