शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
3
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
4
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
5
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
6
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
7
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
8
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
9
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
10
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
11
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
20
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठात आदिवासींना न्याय केव्हा? अध्यासन केंद्र सुरू करण्याबाबत राज्यपालांना निवेदन 

By गणेश वासनिक | Updated: March 12, 2023 17:31 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आदिवासी अध्यासन केंद्र सुरु करण्याची मागणी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे ट्रायबल फोरमने केली आहे. 

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आदिवासी अध्यासन केंद्र सुरु करण्याची मागणी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे ट्रायबल फोरमने केली आहे. अमरावती विद्यापीठ अंतर्गत यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. अमरावती विद्यापीठात अन्य महापुरुषांच्या विचारधारेवर अध्यासन केंद्र सुरु आहेत. परिणामी आदिवासी अध्यासन केंद्र सुरु करून विद्यार्थी, संशोधकांना न्याय प्रदान करावा, अशी मागणी पुढे आली आहे.

यवतमाळ जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. अमरावती जिल्ह्यात मेळघाट, धारणी, चिखलदरा, तर अकोला जिल्ह्यात अकोट, तेल्हारा, पातूर, बार्शिटाकळी, बुलढाणा जिल्ह्यात संग्रामपूर, जळगाव जामोद, चिखली, खामगाव हे तालुके आदिवासी बहुल असून वाशीम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज बांधव आहेत. काळाच्या ओघात आपली भाषा, कला, संस्कृती नष्ट होऊ नये म्हणून आदिवासी समाज आपली बोलीभाषा, कला व संस्कृती संवर्धन करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. आज महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यापीठात 'आदिवासी साहित्य ' हा विषय अभ्यासक्रमात आहे. अनेक विद्यार्थी, संशोधक प्राध्यापक आदिवासी साहित्य व तत्संबंधीत विषयावर पीएचडी करीत आहे. यासाठी हवे आदिवासी अध्यासन केंद्र

  1. राज्यातील आदिवासी बोलीभाषा व अन्य बोलीभाषा यांचा तौलनिक अभ्यास 
  2. देशामधील अन्य राज्यात बोलल्या जाणाऱ्या आदिवासी बोलीभाषांचा शास्त्रीय, तौलनिक अभ्यास 
  3. आदिवासी संस्कृती आणि मानवी व्यवहार, विकासाच्या संकल्पना आणि आधुनिकता यांचा अभ्यास 
  4. आदिवासी समुदाय यांची भाषा, संस्कृती,साहित्य व विकास यांचा तौलनिक अभ्यास.
  5. आदिवासी मधील स्थापत्यकला, आयुर्वेद, वैद्यकशास्त्र, आभूषणे, काष्ठ शिल्पशास्त्र, धातुकलाशास्त्र, न्रुत्यकला,वाद्यकला यांचा उगम, विकास व सद्यस्थितीत त्यांच्या विकासाची दिशा यांचा अभ्यास.
  6. आदिवासींची जल,जंगल व जमीन विषयक भूमिका आणि त्यासंबंधाने झालेले कायदे यांचाही अभ्यासक व संशोधकांना अभ्यास करता येईल. 

 

देशभरात आदिवासी जमातींची बोलीभाषा व अन्य लोकभाषा संबंधी भाषातज्ञ चिंता व्यक्त करीत आहे. या बोलीभाषा, लोकभाषा टिकविल्या पाहिजेत. त्यांचे जतन व संवर्धन झाले पाहिजे. तुलनात्मक अभ्यास होऊन संशोधन होणे गरजेचे आहे. यामधून राज्यातील नव्हे तर देशभरातील विद्यार्थ्यांना नवी विद्याशाखा मिळेल. याकरिता अमरावती विद्यापीठात आदिवासी अध्यासन, अभ्यास व संशोधन केंद्राची आवश्यकता आहे. - ॲड. प्रमोद घोडाम, संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरम महाराष्ट्र.

 

 

टॅग्स :AmravatiअमरावतीRamesh Baisरमेश बैस