शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठात आदिवासींना न्याय केव्हा? अध्यासन केंद्र सुरू करण्याबाबत राज्यपालांना निवेदन 

By गणेश वासनिक | Updated: March 12, 2023 17:31 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आदिवासी अध्यासन केंद्र सुरु करण्याची मागणी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे ट्रायबल फोरमने केली आहे. 

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आदिवासी अध्यासन केंद्र सुरु करण्याची मागणी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे ट्रायबल फोरमने केली आहे. अमरावती विद्यापीठ अंतर्गत यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. अमरावती विद्यापीठात अन्य महापुरुषांच्या विचारधारेवर अध्यासन केंद्र सुरु आहेत. परिणामी आदिवासी अध्यासन केंद्र सुरु करून विद्यार्थी, संशोधकांना न्याय प्रदान करावा, अशी मागणी पुढे आली आहे.

यवतमाळ जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. अमरावती जिल्ह्यात मेळघाट, धारणी, चिखलदरा, तर अकोला जिल्ह्यात अकोट, तेल्हारा, पातूर, बार्शिटाकळी, बुलढाणा जिल्ह्यात संग्रामपूर, जळगाव जामोद, चिखली, खामगाव हे तालुके आदिवासी बहुल असून वाशीम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज बांधव आहेत. काळाच्या ओघात आपली भाषा, कला, संस्कृती नष्ट होऊ नये म्हणून आदिवासी समाज आपली बोलीभाषा, कला व संस्कृती संवर्धन करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. आज महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यापीठात 'आदिवासी साहित्य ' हा विषय अभ्यासक्रमात आहे. अनेक विद्यार्थी, संशोधक प्राध्यापक आदिवासी साहित्य व तत्संबंधीत विषयावर पीएचडी करीत आहे. यासाठी हवे आदिवासी अध्यासन केंद्र

  1. राज्यातील आदिवासी बोलीभाषा व अन्य बोलीभाषा यांचा तौलनिक अभ्यास 
  2. देशामधील अन्य राज्यात बोलल्या जाणाऱ्या आदिवासी बोलीभाषांचा शास्त्रीय, तौलनिक अभ्यास 
  3. आदिवासी संस्कृती आणि मानवी व्यवहार, विकासाच्या संकल्पना आणि आधुनिकता यांचा अभ्यास 
  4. आदिवासी समुदाय यांची भाषा, संस्कृती,साहित्य व विकास यांचा तौलनिक अभ्यास.
  5. आदिवासी मधील स्थापत्यकला, आयुर्वेद, वैद्यकशास्त्र, आभूषणे, काष्ठ शिल्पशास्त्र, धातुकलाशास्त्र, न्रुत्यकला,वाद्यकला यांचा उगम, विकास व सद्यस्थितीत त्यांच्या विकासाची दिशा यांचा अभ्यास.
  6. आदिवासींची जल,जंगल व जमीन विषयक भूमिका आणि त्यासंबंधाने झालेले कायदे यांचाही अभ्यासक व संशोधकांना अभ्यास करता येईल. 

 

देशभरात आदिवासी जमातींची बोलीभाषा व अन्य लोकभाषा संबंधी भाषातज्ञ चिंता व्यक्त करीत आहे. या बोलीभाषा, लोकभाषा टिकविल्या पाहिजेत. त्यांचे जतन व संवर्धन झाले पाहिजे. तुलनात्मक अभ्यास होऊन संशोधन होणे गरजेचे आहे. यामधून राज्यातील नव्हे तर देशभरातील विद्यार्थ्यांना नवी विद्याशाखा मिळेल. याकरिता अमरावती विद्यापीठात आदिवासी अध्यासन, अभ्यास व संशोधन केंद्राची आवश्यकता आहे. - ॲड. प्रमोद घोडाम, संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरम महाराष्ट्र.

 

 

टॅग्स :AmravatiअमरावतीRamesh Baisरमेश बैस