शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

अमरावती विद्यापीठात आदिवासींना न्याय केव्हा? अध्यासन केंद्र सुरू करण्याबाबत राज्यपालांना निवेदन 

By गणेश वासनिक | Updated: March 12, 2023 17:31 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आदिवासी अध्यासन केंद्र सुरु करण्याची मागणी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे ट्रायबल फोरमने केली आहे. 

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आदिवासी अध्यासन केंद्र सुरु करण्याची मागणी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे ट्रायबल फोरमने केली आहे. अमरावती विद्यापीठ अंतर्गत यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. अमरावती विद्यापीठात अन्य महापुरुषांच्या विचारधारेवर अध्यासन केंद्र सुरु आहेत. परिणामी आदिवासी अध्यासन केंद्र सुरु करून विद्यार्थी, संशोधकांना न्याय प्रदान करावा, अशी मागणी पुढे आली आहे.

यवतमाळ जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. अमरावती जिल्ह्यात मेळघाट, धारणी, चिखलदरा, तर अकोला जिल्ह्यात अकोट, तेल्हारा, पातूर, बार्शिटाकळी, बुलढाणा जिल्ह्यात संग्रामपूर, जळगाव जामोद, चिखली, खामगाव हे तालुके आदिवासी बहुल असून वाशीम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज बांधव आहेत. काळाच्या ओघात आपली भाषा, कला, संस्कृती नष्ट होऊ नये म्हणून आदिवासी समाज आपली बोलीभाषा, कला व संस्कृती संवर्धन करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. आज महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यापीठात 'आदिवासी साहित्य ' हा विषय अभ्यासक्रमात आहे. अनेक विद्यार्थी, संशोधक प्राध्यापक आदिवासी साहित्य व तत्संबंधीत विषयावर पीएचडी करीत आहे. यासाठी हवे आदिवासी अध्यासन केंद्र

  1. राज्यातील आदिवासी बोलीभाषा व अन्य बोलीभाषा यांचा तौलनिक अभ्यास 
  2. देशामधील अन्य राज्यात बोलल्या जाणाऱ्या आदिवासी बोलीभाषांचा शास्त्रीय, तौलनिक अभ्यास 
  3. आदिवासी संस्कृती आणि मानवी व्यवहार, विकासाच्या संकल्पना आणि आधुनिकता यांचा अभ्यास 
  4. आदिवासी समुदाय यांची भाषा, संस्कृती,साहित्य व विकास यांचा तौलनिक अभ्यास.
  5. आदिवासी मधील स्थापत्यकला, आयुर्वेद, वैद्यकशास्त्र, आभूषणे, काष्ठ शिल्पशास्त्र, धातुकलाशास्त्र, न्रुत्यकला,वाद्यकला यांचा उगम, विकास व सद्यस्थितीत त्यांच्या विकासाची दिशा यांचा अभ्यास.
  6. आदिवासींची जल,जंगल व जमीन विषयक भूमिका आणि त्यासंबंधाने झालेले कायदे यांचाही अभ्यासक व संशोधकांना अभ्यास करता येईल. 

 

देशभरात आदिवासी जमातींची बोलीभाषा व अन्य लोकभाषा संबंधी भाषातज्ञ चिंता व्यक्त करीत आहे. या बोलीभाषा, लोकभाषा टिकविल्या पाहिजेत. त्यांचे जतन व संवर्धन झाले पाहिजे. तुलनात्मक अभ्यास होऊन संशोधन होणे गरजेचे आहे. यामधून राज्यातील नव्हे तर देशभरातील विद्यार्थ्यांना नवी विद्याशाखा मिळेल. याकरिता अमरावती विद्यापीठात आदिवासी अध्यासन, अभ्यास व संशोधन केंद्राची आवश्यकता आहे. - ॲड. प्रमोद घोडाम, संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरम महाराष्ट्र.

 

 

टॅग्स :AmravatiअमरावतीRamesh Baisरमेश बैस