शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

वन विभाग वगळता अन्य यंत्रणांची वृक्ष लागवड गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:30 IST

सक्ती असतानाही कागदोपत्रीच राबविली मोहीम, बेजाबदार अधिकाऱ्याच्या ’सीआर’मध्ये होणार नोंद अमरावती : गतवर्षी १ जुलै ते ३० सप्टेंबर ...

सक्ती असतानाही कागदोपत्रीच राबविली मोहीम, बेजाबदार अधिकाऱ्याच्या ’सीआर’मध्ये होणार नोंद

अमरावती : गतवर्षी १ जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यान वृक्षलागवड कार्यक्रम राबविण्यात आला. मात्र, वनविभाग, सामाजिक वनीकरण वगळता अन्य ४६ यंत्रणांच्या वृक्षलागवडीतील रोपे गायब झाली आहेत. फोटो सेशनपुरतीच ३३ कोटी वृक्षलागवड करण्यात आली, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. बेजाबदार अधिकाऱ्यांच्या ‘सीआर’मध्ये तशी नोंद होणार असल्याची माहिती आहे.

गत आठवड्यापासून एका जिल्ह्यातील सहायक वनसंरक्षक दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन वृक्षलागवडीत जिवंत रोपांचे मूल्यांकन करीत आहेत. ही मोहीम अमरावती वनवृत्तातील अकोला, बुलडाणा व अमरावती या जिल्ह्यांमध्ये सुरू झाली आहे. वनविभाग, सामाजिक वनीकरण या दोन्ही विभागांनी नैतिक कर्तव्य म्हणून ३३ कोटी वृक्षलागवडीतील ६० ते ७० टक्के जगविली असल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र, वनविभाग वगळता जिल्हा परिषद, महापालिका, सिंचन, पाणीपुरवठा, कारागृह प्रशासन, समाजकल्याण, ग्रामपंचायती, सार्वजनिक बांधकाम, एसटी महामंडळ, शिक्षण विभाग अशा ४६ यंत्रणांनी राबविलेल्या वृक्षलागवडीत जिवंत रोपे शोधूनही सापडणार नाहीत, असे विदारक चित्र आहे. शासनादेशानुसार ३३ कोटी वृक्षलागवडीत सहभागी होण्याची प्रत्येक यंत्रणेला सक्ती करण्यात आली होती. त्याकरिता रोपे वनविभागाने पुरविली, तर लागवडीचा खर्च मनरेगातून देण्यात आला. मात्र, आता ४६ यंत्रणांनी कुठे वृक्षलागवड केली, रोपे जिवंत आहे अथवा नाही, हे गुलदस्त्यात आहे. युती शासनाच्या कार्यकाळात सन २०१६ मध्ये दोन कोटी, सन २०१७ मध्ये चार कोटी, सन २०१८ मध्ये १३ कोटी, तर २०१९ मध्ये ३३ कोटी वृक्षलागवडीचा उपक्रम राज्यभरात राबविला, हे विशेष.

--------------------------

शासनाकडे कागदाेपत्रीच अहवाल

अमरावती जिल्ह्यात वनविभागासह अन्य यंत्रणांनी ३३ काेटी वृक्ष लागवडीतून १ कोटी १२ लाख ३४ हजार रोपे लावण्यात आले. त्यापैकी १ कोटी ९ हजार ६०३ रोपे जिवंत असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने ऑक्टोबर २०१९ मध्ये शासनाकडे पाठविला होता. मात्र, आता १४ महिन्यानंतर वृक्षलागवडीतील रोपे ३० ते ४० टक्के कमी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे जिवंत रोपांच्या अहवालाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.