शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

वन विभाग वगळता अन्य यंत्रणांची वृक्ष लागवड गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:30 IST

सक्ती असतानाही कागदोपत्रीच राबविली मोहीम, बेजाबदार अधिकाऱ्याच्या ’सीआर’मध्ये होणार नोंद अमरावती : गतवर्षी १ जुलै ते ३० सप्टेंबर ...

सक्ती असतानाही कागदोपत्रीच राबविली मोहीम, बेजाबदार अधिकाऱ्याच्या ’सीआर’मध्ये होणार नोंद

अमरावती : गतवर्षी १ जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यान वृक्षलागवड कार्यक्रम राबविण्यात आला. मात्र, वनविभाग, सामाजिक वनीकरण वगळता अन्य ४६ यंत्रणांच्या वृक्षलागवडीतील रोपे गायब झाली आहेत. फोटो सेशनपुरतीच ३३ कोटी वृक्षलागवड करण्यात आली, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. बेजाबदार अधिकाऱ्यांच्या ‘सीआर’मध्ये तशी नोंद होणार असल्याची माहिती आहे.

गत आठवड्यापासून एका जिल्ह्यातील सहायक वनसंरक्षक दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन वृक्षलागवडीत जिवंत रोपांचे मूल्यांकन करीत आहेत. ही मोहीम अमरावती वनवृत्तातील अकोला, बुलडाणा व अमरावती या जिल्ह्यांमध्ये सुरू झाली आहे. वनविभाग, सामाजिक वनीकरण या दोन्ही विभागांनी नैतिक कर्तव्य म्हणून ३३ कोटी वृक्षलागवडीतील ६० ते ७० टक्के जगविली असल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र, वनविभाग वगळता जिल्हा परिषद, महापालिका, सिंचन, पाणीपुरवठा, कारागृह प्रशासन, समाजकल्याण, ग्रामपंचायती, सार्वजनिक बांधकाम, एसटी महामंडळ, शिक्षण विभाग अशा ४६ यंत्रणांनी राबविलेल्या वृक्षलागवडीत जिवंत रोपे शोधूनही सापडणार नाहीत, असे विदारक चित्र आहे. शासनादेशानुसार ३३ कोटी वृक्षलागवडीत सहभागी होण्याची प्रत्येक यंत्रणेला सक्ती करण्यात आली होती. त्याकरिता रोपे वनविभागाने पुरविली, तर लागवडीचा खर्च मनरेगातून देण्यात आला. मात्र, आता ४६ यंत्रणांनी कुठे वृक्षलागवड केली, रोपे जिवंत आहे अथवा नाही, हे गुलदस्त्यात आहे. युती शासनाच्या कार्यकाळात सन २०१६ मध्ये दोन कोटी, सन २०१७ मध्ये चार कोटी, सन २०१८ मध्ये १३ कोटी, तर २०१९ मध्ये ३३ कोटी वृक्षलागवडीचा उपक्रम राज्यभरात राबविला, हे विशेष.

--------------------------

शासनाकडे कागदाेपत्रीच अहवाल

अमरावती जिल्ह्यात वनविभागासह अन्य यंत्रणांनी ३३ काेटी वृक्ष लागवडीतून १ कोटी १२ लाख ३४ हजार रोपे लावण्यात आले. त्यापैकी १ कोटी ९ हजार ६०३ रोपे जिवंत असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने ऑक्टोबर २०१९ मध्ये शासनाकडे पाठविला होता. मात्र, आता १४ महिन्यानंतर वृक्षलागवडीतील रोपे ३० ते ४० टक्के कमी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे जिवंत रोपांच्या अहवालाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.