शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

पश्चिम विदर्भातील तीन मोठ्या प्रकल्पांत ९१ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा, पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न सुटला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 18:47 IST

आठवडाभरात झालेल्या दमदार पावसामुळे पश्चिम विदर्भातील मोठ्या प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

 - संदीप मानकर

अमरावती - आठवडाभरात झालेल्या दमदार पावसामुळे पश्चिम विदर्भातील मोठ्या प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. अमरावती, यवतमाळ व बुलडाणा असे प्रत्येकी एक अशा तीन प्रकल्पांमध्ये ९१ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा संचयित झाला आहे. अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारा अप्पर वर्धा प्रकल्प १०० टक्के भरला असून, १० सेंमीने तीन द्वारे उघडण्यात आली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून वर्धा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा या मोठ्या प्रकल्पात ९१.७२ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे गेलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पात ९४.९८ टक्के पाणीसाठा आहे. लवकरच हा प्रकल्प शंभरी पार करेल, असा विश्वास जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला आहे.  ११ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत जलसंपदा विभागाने घेतलेल्या पाणीसाठ्याच्या नोंदीनुसार मोठे, मध्यम व लघु अशा पश्चिम विदर्भातील एकूण ५०२ प्रकल्पांमध्ये सरासरी ५९.७३ टक्के पाणीसाठा झालेला आहे. नऊ मोठ्या प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात आठ दिवसांत चांगली वाढ झाली असून, सरासरी ६८.२७ टक्के पाणीसाठा आहे. २४ मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ६४.७३ टक्के पाणीसाठा साचला आहे. ४६९ लघु प्रकल्पांतीलही पाणीसाठ्यात वाढत असून, ४५.७५ टक्के पाणीसाठा झाला आहे. ५०२ प्रकल्पांची प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ३१७४.११ दलघमी एवढा आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा १८९५.८७ आहे.  यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ४२.५५ टक्के पाणीसाठा साचला आहे. अरुणावती प्रकल्पात फक्त १२.५४ टक्के पाणीसाठा आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात अद्यापही अपेक्षित पाणीसाठा झालेला नसून, फक्त १६.७२ टक्के पाणीसाठा आहे. वान प्रकल्पात मात्र चांगला पाणीसाठा झाला आहे, त्याची टक्केवारी ८६.१५ टक्के आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात फक्त ३०.१८ टक्के पाणीसाठा आहे. खडकपूर्णा प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे. प्रत्येक जिल्ह्यातील महत्त्वाच्या मोठ्या प्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणीसाठा साचल्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचाही प्रश्न सुटला आहे. २४ मध्यम प्रकल्पांची स्थिती अमरावती जिल्ह्यातील शहानूर मध्यम प्रकल्पात ९२.७० टक्के पाणीसाठा आहे. उघडलेले प्रकल्पाचे दरवाजे सध्या बंद करण्यात आले आहेत. चंद्रभागा प्रकल्पात ९१.७६  टक्के पाणीसाठा आहे. पूर्णा प्रकल्पात ८९. २६ टक्के पाणीसाठा असून, पाच सेंमीने दोन गेट उघडण्यात आले आहे. सपन प्रकल्पात ९३.७६ टक्के  पाणीसाठा असून पाच सेंमीने दोन द्वारे उघडण्यात आली आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस प्रकल्पात ९४.२० टक्के  पाणीसाठा आहे. सायखेडा १०० टक्के, गोकी ५२.५९ टक्के, वाघाडी ७२.५४ टक्के, बोरगांव ८०.०३ टक्के, नवरगांव १०० टक्के, अकोला जिल्ह्यातील निर्गुणा २४.५१ टक्के, मोेर्णा ३६.१६  टक्के, घुंगशी बॅरेज शुन्य टक्के, वाशिम जिल्ह्यातील अडाण प्रकल्पात १२.८७ टक्के, सोनल २३.५३ टक्के, एकबुर्जी ४५.७८ टक्के, बुलडाणा जिल्ह्यतील ज्ञानगंगा १०० टक्के, पलढग १०० टक्के, मस १०० टक्के, कोराडी शून्य टक्के, मन ५७.८६ टक्के, तोरणा ९३.२८ टक्के, उतावळी ५४.६७ टक्के पाणीसाठा साचला आहे.

टॅग्स :WaterपाणीVidarbhaविदर्भDamधरण