शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

- तर भाजप जेलभरो आंदाेलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 05:00 IST

राज्य सरकार १३ नोव्हेंबरच्या घटनेला जास्त फोकस करीत आहे. मात्र, १२ नोव्हेंबर रोजी अल्पसंख्याकांनी शहरात जी ‘ॲक्शन’ केली, त्याची १३ नोव्हेंबर रोजी ‘रिॲक्शन’ होती. भाजपने बंदचे आवाहन केले होते, हे आम्ही कबूल करीत आहे.  कारण हिंदू असुरक्षित असेल तर भाजप त्यांच्या सुरक्षेसाठी कधीही मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. हिंदूत्ववादी संघटनांना दोषी ठरविले जात आहे. बळजबरीने अटकसत्र सुरू आहे. मात्र, हीच तत्परता दोषी अल्पसंख्याकांच्या अटकेसाठी दाखविली जात नाही, असा आरोप त्यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात १२ व १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या दोन गटातील हिंसाचाराला केवळ भाजप व  हिंदू संघटनांना टार्गेट केले जात आहे. राज्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या इशाऱ्यावर पोलीस प्रशासन भाजपचे नेते, कार्यकर्त्यांवर एकाच घटनेसाठी चार ते पाच ठाण्यात गुन्हे दाखल करीत आहेत. काही जणांना बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार थांबला नाही तर, भाजप जेलभरो आंदोलन करणार, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिला. भाजपचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दंगलपीडितांची भेट घेतली. संवेदनशील भागात दौरा केला. त्यानंतर  त्यांनी पत्रपरिषदेला संबोधित केले.राज्य सरकार १३ नोव्हेंबरच्या घटनेला जास्त फोकस करीत आहे. मात्र, १२ नोव्हेंबर रोजी अल्पसंख्याकांनी शहरात जी ‘ॲक्शन’ केली, त्याची १३ नोव्हेंबर रोजी ‘रिॲक्शन’ होती. भाजपने बंदचे आवाहन केले होते, हे आम्ही कबूल करीत आहे.  कारण हिंदू असुरक्षित असेल तर भाजप त्यांच्या सुरक्षेसाठी कधीही मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. हिंदूत्ववादी संघटनांना दोषी ठरविले जात आहे. बळजबरीने अटकसत्र सुरू आहे. मात्र, हीच तत्परता दोषी अल्पसंख्याकांच्या अटकेसाठी दाखविली जात नाही, असा आरोप त्यांनी केला. भाजपवर दडपशाही, एकतर्फी कारवाया थांबविल्या नाहीत, तर भाजप जेलभरो आंदोलन करून राज्य सरकारचे जेलमध्ये पाठविण्याचे मनसुबे आम्ही स्वत: पूर्ण करू, असा टोलादेखील त्यांनी लगावला. पत्रपरिषदेला माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अनिल बोंडे, महापौर चेतन गावंडे, महापालिका गटनेता तुषार भारतीय, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, उपमहापौर कुसूम साहू शहराध्यक्ष किरण पातुरकर, रविराज देशमुख, जयंत डेहनकर, ॲड.  प्रशांत देशपांडे, प्रवीण वैश्य, सुनील साहू आदी उपस्थित होते. 

गृहमंत्र्यांना भेटून वास्तव कळवू१२ व १३ नोव्हेंबर रोजीच्या घटनेचे समर्थन करू शकत नाही. मात्र, १२ तारखेची घटना ‘डिलिट’ करता येत नाही. पोलीस प्रशासन हे कुणाच्या इशाराऱ्यावर कारवाई करीत आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मसानगंज भागात दौरा केला असता, एक महिला भेटली आणि त्यांनी मोटरसायकल घरात लावत असताना त्यांच्या मुलाला पोलीस घेऊन गेले. एवढेच नव्हे तर भादंविच्या ३०७ कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले. भाजप व अन्य हिंदू संघटनांशी संबंधित असलेल्यांना त्रास दिला जात आहे. यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेणार असून, अमरावती येथील वस्तुस्थिती कळविणार असल्याचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी सांगितले.

पालकमंत्री १२ नोव्हेंबरच्या घटनेवर का बोलत नाही?अमरावती शहरात विनापरवानगी १२ नोव्हेंबर रोजी अल्पसंख्याकांच्या माेर्चाला परवानगी होती का?, राज्यात एकाच वेळी मालेगाव, नांदेड  व अमरावती शहरात मोर्चा काढण्यात आला. हे पूर्वनियोजित षडयंत्र होते का?, यामाध्यमातून राज्य किंवा देशात दंगे भडकविण्याचे कटकारस्थान होते का? याबाबत पालकमंत्री यशोमती ठाकूर काहीही बोलत नाही, असा सवाल विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा