शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

- तर भाजप जेलभरो आंदाेलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 05:00 IST

राज्य सरकार १३ नोव्हेंबरच्या घटनेला जास्त फोकस करीत आहे. मात्र, १२ नोव्हेंबर रोजी अल्पसंख्याकांनी शहरात जी ‘ॲक्शन’ केली, त्याची १३ नोव्हेंबर रोजी ‘रिॲक्शन’ होती. भाजपने बंदचे आवाहन केले होते, हे आम्ही कबूल करीत आहे.  कारण हिंदू असुरक्षित असेल तर भाजप त्यांच्या सुरक्षेसाठी कधीही मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. हिंदूत्ववादी संघटनांना दोषी ठरविले जात आहे. बळजबरीने अटकसत्र सुरू आहे. मात्र, हीच तत्परता दोषी अल्पसंख्याकांच्या अटकेसाठी दाखविली जात नाही, असा आरोप त्यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात १२ व १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या दोन गटातील हिंसाचाराला केवळ भाजप व  हिंदू संघटनांना टार्गेट केले जात आहे. राज्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या इशाऱ्यावर पोलीस प्रशासन भाजपचे नेते, कार्यकर्त्यांवर एकाच घटनेसाठी चार ते पाच ठाण्यात गुन्हे दाखल करीत आहेत. काही जणांना बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार थांबला नाही तर, भाजप जेलभरो आंदोलन करणार, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिला. भाजपचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दंगलपीडितांची भेट घेतली. संवेदनशील भागात दौरा केला. त्यानंतर  त्यांनी पत्रपरिषदेला संबोधित केले.राज्य सरकार १३ नोव्हेंबरच्या घटनेला जास्त फोकस करीत आहे. मात्र, १२ नोव्हेंबर रोजी अल्पसंख्याकांनी शहरात जी ‘ॲक्शन’ केली, त्याची १३ नोव्हेंबर रोजी ‘रिॲक्शन’ होती. भाजपने बंदचे आवाहन केले होते, हे आम्ही कबूल करीत आहे.  कारण हिंदू असुरक्षित असेल तर भाजप त्यांच्या सुरक्षेसाठी कधीही मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. हिंदूत्ववादी संघटनांना दोषी ठरविले जात आहे. बळजबरीने अटकसत्र सुरू आहे. मात्र, हीच तत्परता दोषी अल्पसंख्याकांच्या अटकेसाठी दाखविली जात नाही, असा आरोप त्यांनी केला. भाजपवर दडपशाही, एकतर्फी कारवाया थांबविल्या नाहीत, तर भाजप जेलभरो आंदोलन करून राज्य सरकारचे जेलमध्ये पाठविण्याचे मनसुबे आम्ही स्वत: पूर्ण करू, असा टोलादेखील त्यांनी लगावला. पत्रपरिषदेला माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अनिल बोंडे, महापौर चेतन गावंडे, महापालिका गटनेता तुषार भारतीय, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, उपमहापौर कुसूम साहू शहराध्यक्ष किरण पातुरकर, रविराज देशमुख, जयंत डेहनकर, ॲड.  प्रशांत देशपांडे, प्रवीण वैश्य, सुनील साहू आदी उपस्थित होते. 

गृहमंत्र्यांना भेटून वास्तव कळवू१२ व १३ नोव्हेंबर रोजीच्या घटनेचे समर्थन करू शकत नाही. मात्र, १२ तारखेची घटना ‘डिलिट’ करता येत नाही. पोलीस प्रशासन हे कुणाच्या इशाराऱ्यावर कारवाई करीत आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मसानगंज भागात दौरा केला असता, एक महिला भेटली आणि त्यांनी मोटरसायकल घरात लावत असताना त्यांच्या मुलाला पोलीस घेऊन गेले. एवढेच नव्हे तर भादंविच्या ३०७ कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले. भाजप व अन्य हिंदू संघटनांशी संबंधित असलेल्यांना त्रास दिला जात आहे. यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेणार असून, अमरावती येथील वस्तुस्थिती कळविणार असल्याचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी सांगितले.

पालकमंत्री १२ नोव्हेंबरच्या घटनेवर का बोलत नाही?अमरावती शहरात विनापरवानगी १२ नोव्हेंबर रोजी अल्पसंख्याकांच्या माेर्चाला परवानगी होती का?, राज्यात एकाच वेळी मालेगाव, नांदेड  व अमरावती शहरात मोर्चा काढण्यात आला. हे पूर्वनियोजित षडयंत्र होते का?, यामाध्यमातून राज्य किंवा देशात दंगे भडकविण्याचे कटकारस्थान होते का? याबाबत पालकमंत्री यशोमती ठाकूर काहीही बोलत नाही, असा सवाल विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा