मेळघाटातील ब्रिटिशकालीन ११८ पुलांचे अस्तित्व धोक्यात ; शंभरीपार पुलांचे 'स्ट्रक्चरल ऑडिट' केव्हा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:37 IST2025-06-18T16:37:26+5:302025-06-18T16:37:59+5:30

Amravati : सुरक्षा फलक लावल्याने थांबतील का अपघात?, दोन्ही तालुक्यातील दुर्गम भागातही आहेत ते पूल

The existence of 118 British-era bridges in Melghat is in danger; When will the 'structural audit' of century-old bridges be conducted? | मेळघाटातील ब्रिटिशकालीन ११८ पुलांचे अस्तित्व धोक्यात ; शंभरीपार पुलांचे 'स्ट्रक्चरल ऑडिट' केव्हा?

The existence of 118 British-era bridges in Melghat is in danger; When will the 'structural audit' of century-old bridges be conducted?

नरेंद्र जावरे 
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा :
मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात ब्रिटिशकालीन ११८ पुलांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. १०० वर्षापेक्षा अधिकचा काळ या पुलांच्या निर्मितीला झालेला आहे. त्यामुळे पुनर्बाधणी नूतनीकरण करणे गरजेचे आहे. त्यातील ३२ पुलांचे पुनर्बाधणीसह दुरुस्तीला ७० कोटी रुपये आवश्यक आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाला प्रस्ताव पाठविला आहे.


या जीवघेण्या पुलांच्या सुरक्षा कठडवावर दिशानिर्देश देणारे फलक लावून वाहतूक सुरू आहे. व्याघ्र प्रकल्पाचे जाचक नियम, या टेबलापासून तर त्या टेबलावर अटकणाऱ्या फाइल. यातच पुलांचे अस्तित्व संपले असून, नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.  


जिल्ह्यातील बामणी, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, बडनेरा, अचलपूर, धारणी, बुन्हानपूर आंतरराज्य महामार्ग-१४ आहे. रस्त्यावरील ब्रिटिशकालीन अरुंद असलेल्या पुलाच्या ठिकाणी स्थापत्य उपाययोजना आणि पुनर्बाधणी करण्यासाठी ३२ पुलांच्या कामासाठी जवळपास ७० कोटींचा प्रस्ताव २०२७च्या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यासाठी शासनाला पाठविण्यात आलेला आहे. मेळघाटातील मोठी दुर्घटना टाळण्यासाठी जवळपास सर्वच रस्ते आणि पूल तयार करण्याची गरज आहे. दळणवळणासाठी आदिवासींचा आरोग्याचा प्रश्न घेऊन कोट्यवधी रुपयांचा निधी पाठविला जात असला तरी रस्ते विकासासाठी मात्र शासनाच्या तिजोरीत दुष्काळ असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. 


प्रवासी बस, पर्यटकांची वाहने दरीत
मेळघाटात रस्त्याच्या कडेला सुरक्षा कठडेसुद्धा आवश्यक आहे. एसटी बस, मध्य प्रदेशातून येणारे मालवाहू ट्रक आणि एक खासगी बस पुलाखाली कोसळल्याने कित्येक अपघात होऊन जीवितहानी झालेली आहे.


सुरक्षा फलकावर जीवघेणा प्रवास
या पुलांवरून प्रवास करणे जीवावर बेतणारे ठरले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ठिकठिकाणी सूचनाफलक लावण्यात आले असले तरी. व्याघ्र प्रकल्पाची जाचक नियम पाहता मेळघाटातील रस्ते विकासाकरिता परवानगीची गरज आहे.


"मेळघाटातील पूल जुने झाल्याने निर्मिती व दुरुस्तीची गरज आहे. त्यासाठी व्याघ्र प्रकल्पाला पत्र दिले आहे."
- नीलेश चौधरी, उपविभागीय अभियंता

Web Title: The existence of 118 British-era bridges in Melghat is in danger; When will the 'structural audit' of century-old bridges be conducted?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.