शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

बाल स्वच्छता अभियानात अध्यापन बुडणार

By admin | Updated: November 15, 2014 01:18 IST

स्वच्छ भारत मिशनद्वारे बाल स्वच्छता उपक्रम कालपासून राबविल्या जात आहे. हा अभियान प्रशासनाने व मूळ पातळीवर...

मोहाडी : स्वच्छ भारत मिशनद्वारे बाल स्वच्छता उपक्रम कालपासून राबविल्या जात आहे. हा अभियान प्रशासनाने व मूळ पातळीवर अंमलबजावणी करणाऱ्या शाळांनी गंभीरतेने घेतल्याने बऱ्याच शाळांमध्ये अध्यापन बुडणार असल्याची बाब समोर आली आहे.बाल स्वच्छता अभियान उपक्रम १४ नोव्हेंबर पासून राबविणे सुरू झाले. बाल स्वच्छता कार्यक्रमाला उसंत दिली गेली नाही. सातत्याने हा कार्यक्रम सहा दिवस चालणार आहे. या सहा दिवसात शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ करायचा आहे. विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व पटवून द्यायचे आहेत. रांगोळी, निबंध, पोस्टर स्पर्धा आदी कार्यक्रमाचे आयोजन शाळा-शाळांमध्ये केले जाणार आहे. एकूणच सहा दिवस स्वच्छता या विषयावर पूर्ण शाळा केंद्रीत झाल्या आहेत. तसेच कोणत्या शाळा बाल स्वच्छता कार्यक्रमात गांभिर्याने सहभागी होत नाही त्यांची निगरानी विविध पथकाद्वारे होणार आहे. बालस्वच्छता हा भाग केवळ शाळांपूरता मर्यादित केला नसल्याने गावात स्वच्छतेची जागृती, समाजाचा गावातील प्रत्येक घटकांचा सहभाग करून घेण्याची जबाबदारी मुख्याध्यापक व शिक्षकांवर येवून पडली आहे. त्यामुळे एकूणच शाळा प्रमुखावर तसेच अध्यापकावर अप्रत्यक्षपणे स्वच्छता मिशनचा दडपण आलेला आहे. या स्वच्छता अभियानातून सुटण्याचा कुठेच मार्ग शिल्लक राहिला नाही. त्यामुळे शाळा प्रमुख व शिक्षक आधी स्वच्छता अभियानाच्या कार्यक्रमाला प्रथम प्राधान्य देवू लागली आहे. पथकाच्या निरीक्षणात कमी जास्त आढळले त्याचा ठपका आपल्या शाळेवर येवू नये यासाठी बाल स्वच्छता अभियान अतिशय काळजीपूर्वक राबविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व बाबीमुळे बऱ्याच शाळांमध्ये खडू-फळा बंद राहण्याची शक्यता असल्याची प्रचिती दिसून आली. या सहा दिवसात अध्यापन निटपणे होईल याची शाश्वती अधिकारी देण्यास पुढे मागे बघत आहेत. आम्ही तरी काय सांगणार, शासनाचा उपक्रम राबविलाच पाहिजे, तुमच्या सारखीच आमची स्थिती आहे. एवढाच फरक की आम्ही अधिकारी म्हणून निरीक्षण करणार तुम्ही राबणार ही प्रतिक्रिया बालस्वच्छता अभियानात निरीक्षण पथकात असणाऱ्या अधिकाऱ्यांची आहे.शाळांना रविवार हा दिवस सुटीचा असला तरी त्या दिवशी शाळा स्तरावर आरोग्य विभागाच्या चमूकडून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यासाठी शाळा सकाळपाळीत भरविण्यात येणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री व शालेय सचिव यांनी वेगवेगळे पत्र काढले आहे. त्या पत्रात १६ नोव्हेंबरला कोणताच उपक्रम दिला नाही. त्यांनी शाळांना रविवारी सुटी असल्याची जाणिव ठेवून कोणताच शाळांसाठी कार्यक्रम ठेवला नाही. तथापि, प्रशासनाने रविवारीही शाळांच्या शिक्षकांना वेठीस पकडले आहे. रविवार असल्याने त्या दिवशी पूर्ण उपस्थित राहणार नाही जाणीव मंत्र्यांना आहे, शालेय सचिवांना आहे, मात्र प्रशासनाने अधिकचा शहणपणा केला असल्याचे दिसून येते. जे विद्यार्थी अनुपस्थित राहणार त्यांची आरोग्य तपासणी परत होणार नाही. यापूर्वीही शाळांमध्ये आरोग्य तपासणीचा कार्यक्रम झाला. या उपक्रमात विशेष काही आरोग्य तपासणी होणार आहे, असे दिसत नाही. सकाळच्या ८ ते १२ पर्यंत रविवारी आरोग्य तपासणीचा कार्यक्रम आहे. त्या निर्माण केलेल्या आरोग्य पथकांना आरोग्य तपासणीचा दिलेला उद्दीष्ट धावपळीतच पार पाडावा लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)