शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विदर्भात आठ जागांवर दावा

By admin | Updated: August 19, 2014 23:26 IST

आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यात महायुतीकडे ३८ जागांची मागणी केली आहे. यामध्ये विदर्भातील आठ जागांवर संघटनेने दावा केला

अमरावती : आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यात महायुतीकडे ३८ जागांची मागणी केली आहे. यामध्ये विदर्भातील आठ जागांवर संघटनेने दावा केला असल्याची माहिती स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ता गजानन अमदाबादकर यांनी येथे दिली . स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विदर्भस्तरीय बैठकीसाठी ते अमरावतीत आले असता शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते.स्वाभीमान शेतकरी संघटनेची राजकीय भूमिका अमदाबादकर यांनी मांडतानाच यापूर्वीच्या केंद्रातील व सध्याच्या राज्यातील शासनकर्त्यांवर ताशेरे ओढले. ते म्हणाले देशाची अर्थव्यवस्था ही शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. मात्र देशात शेतकऱ्यांच्याच बाबतीत केंद्र व राज्य शासन उदासीन आहे. दरवर्षी रेल्वेसाठी स्वतंत्र बजेट सादर केले जाते. याशिवाय अर्थसंकल्प सादर करताना यामध्ये शेतीसाठी मात्र केवळ ३ टक्केच तरतुद केली जाते. यामुळे शेतकऱ्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न दुर्लक्षित राहतात. शेत मालाला योग्य भाव मिळत नाही. केंद्र शासनाने कृषीसाठी स्वतंत्र बजेट सादर करावे अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेची असल्याचे त्यांनी सांगितले. शेतमाला भाव मिळावा यादृष्टीने शेतीवर आधारीत उद्योग धंदे सुरू करावे व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीसोबत निवडणुका लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भात स्वाभीमानी शेतकरी संघटनेने विधानसभा निवडणुका लढण्याची तयारी केली आहे. विधानसभा निवडणुकीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेने महायुतीच्या नेत्यांकडे ३८ जागांचा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये विदर्भातील आठ जागा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी मागितल्या आहेत. विदर्भात ज्या जागांवर स्वाभीमानी शेतकरी संघटनेने दावा सांगितला त्यात वरूड-मोर्शी, चिखली, खामगाव, कारंजा, वणी, देवळी, काटोल व बाळापूर या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. दरम्यान विदर्भातील जागांबाबतचा अंतीम निर्णय संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी हेच घेतील. त्यांचा निर्णय संघटनेला मंजुर राहील असेही अमदाबादकर यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ, प्रफुल्ल गजबे, नारायण जांभोळे, सीताराम भुते, विनायक काकडे, कैलास फाटे, प्रवीण मोहोड उपस्थित होते. ( प्रतिनिधी )