शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्र परवाने सुसाट; जिल्ह्यात ७७० परवाने !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:10 IST

असाईनमेंट लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : स्वसंरक्षण आणि शेतीचे संरक्षण या दोन प्रमुख कारणांसाठी शस्त्रास्त्र परवाने देण्यात येतात. ...

असाईनमेंट

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : स्वसंरक्षण आणि शेतीचे संरक्षण या दोन प्रमुख कारणांसाठी शस्त्रास्त्र परवाने देण्यात येतात. यामध्ये शिवारात जंगली श्वापदांपासून वाचण्यासाठी सर्वाधिक परवाने काढण्यात आले आहेत. अमरावती शहर आयुक्तालयासह जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये एकूण ७७० परवाने नागरिकांनी काढले आहेत. यामध्ये लोकप्रतिनिधी, व्यापारी, ठेकेदारांचा समावेश आहे. याशिवाय प्रतिष्ठित व्यक्ती आणि काही शेतकऱ्यांचाही समावेश आहे. अमरावती शहर आयुक्तालयाकडून ३९२ शस्त्र परवाने दिले गेले आहेत.

शस्त्रास्त्र परवाने मिळविणे अवघड आहे. त्याच पद्धतीने त्याचे संरक्षण करणेही तितकेच अवघड आहे. ही शस्त्रे बाळगताना शेती संरक्षणासाठी १२ बोअर बंदुकीला परवाना आहे, तर स्वसंरक्षणासाठी रिव्हाॅल्व्हर आणि पिस्टल यांचे परवाने देण्यात येतात. हे शस्त्र सार्वजनिक ठिकाणी काढता येत नाही. केवळ आत्मसंरक्षणासाठी शेवटचा पर्याय म्हणून या शस्त्रांचा वापर करता येतो.

पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतरच छाननी करून शस्त्रांचे परवाने देण्याबाबत जिल्हाधिकारी निर्णय घेतात. ज्या शस्त्राला परवाना मिळाला आहे, ते हरविता येत नाही. याशिवाय त्याचा दहशत पसरविण्यासाठी उपयोगही करता येत नाही. त्यामुळे अशा शस्त्रास्त्रांना जपून वापरावे लागते. गत पाच वर्षांत अनेक अर्ज आले. मात्र, प्रशासनाने सर्व बाबींची शहानिशा केल्यानंतर यातील बहुतांश अर्ज नाकारले आहेत. स्वसंरक्षण आणि शेतीसंरक्षण यासाठी या शस्त्रांना परवानगी आहे.

बॉक्स

शस्त्र परवाना काढायचा कसा?

परवाना काढताना जिल्हाधिकारी कार्यालयात त्यासंदर्भातील ठोस असे कारण द्यावे लागते. त्यानंतर शस्त्रास्त्र का आवश्यक आहे, यावर सुनावणी होते. त्यानंतर विचारपूर्वकच परवाना दिला जातो.

------------

बाँक्स

धारणीमध्ये सर्वात जास्त परवाने

जिल्ह्यातील अमरावती, चांदूर रेल्वे, अचलपूर, दर्यापूर, मोर्शी, धारणी व भातकुली या सात उपविभागांमध्ये परवान्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केले. यानंतरही सर्व बाबींनी विचार आणि संपूर्ण प्रकरणाचे घटनाक्रम जाणून घेतल्यानंतरच परवाने देण्यात आले आहेत. अलीकडील काही वर्षांत परवाने वाटप थांबले आहे. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक परवाने मिळविणाऱ्या विभागामध्ये धारणी आघाडीवर आहे. त्याखालोखाल अचलपूर विभागात शस्त्रास्त्र बाळगण्याचे परवाने आहे.

------------

कठोर नियमांमुळे नवीन परवाने थांबले

जिवाला धोका असणाऱ्या व्यक्तींना शस्त्रास्त्र बाळगण्याचे परवाने देताना प्रथमत: त्यांच्यावर खरेच हल्ला झाला होता का, याचा अहवाल घेतला जातो. यानंतर पोलीस विभागाकडून त्या प्रकरणात सुनावणी केली जाते. या सर्व बाबी तपासल्यानंतर जिल्हाधिकारी शस्त्रास्त्राचे परवाने दिले जातात.

------------

पाच वर्षांत मोजकेच परवाने

परवाना मागण्याचा अधिकार निवडक प्रकरणांतच देण्यात आला आहे. या अर्जानंतर संबंधित व्यक्तीला परवाना द्यायचा की नाही, याबाबत अधिकार जिल्हा प्रशासनाला आहेत. जिल्ह्यामध्ये त्याअनुषंगाने सुनावण्या झाल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शस्त्रास्त्रांचे परवाने नाकारले. यामुळे पाच वर्षात मोजक्याच परवान्यांना परवागी मिळाली आहे.

------------

शस्त्र सांभाळणे कठीण

१) शस्त्र सांभाळताना त्याचे सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शन होणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. याशिवाय त्याचा गैरवापर होणार नाही, याबाबतही कटाक्ष पाळण्याच्या सूचना देण्यात येतात.

२) परवाना दिलेल्या व्यक्तींना जितक्या बंदुकीच्या गोळ्या दिल्या आहेत, त्यांचा संपूर्ण अहवाल सादर करावा लागतो.

३) दर तीन वर्षांनी शस्त्र परवान्याचे नूतनीकरण करण्यात येते. यावेळी शस्त्राचा गैरवापर केल्याचे आढळल्यास अशा व्यक्तींचा परवाना रद्द करण्यात येतो. त्यांना पुन्हा कधीही शस्त्राचा परवाना मिळत नाही.

------------

विभागनिहाय परवान्यांची संख्या

अमरावती: ४

चांदूर रेल्वे : २०

अचलपूर : ८०

दर्यापूर : ४८

मोर्शी : ७१

धारणी : ११०

भातकुली : १०