शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

राज्यातील २९०० पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट पूर्ण, ११२३ पुलांची तातडीने दुरुस्ती करण्याचा कालबद्ध कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2018 8:48 PM

अमरावती : गतवर्षी रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीचा पूल वाहून गेल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने राज्यभरातील साठ मीटरपेक्षा अधिक लांबीच्या जुन्या व ब्रिटिशकालीन अशा २९०० पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट केले.

अमरावती : गतवर्षी रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीचा पूल वाहून गेल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने राज्यभरातील साठ मीटरपेक्षा अधिक लांबीच्या जुन्या व ब्रिटिशकालीन अशा २९०० पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट केले. यापैकी ११२३ पुलांची तातडीने दुरुस्ती करण्याचा एक वर्षाचा कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. यासाठी १७९२ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. जिल्ह्यातील ४७ पुलांचे आॅडिट करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक साळवे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.गतवर्षी सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग असो की राज्य महामार्ग, सर्वच धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. सावित्रीच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्वच पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर गेल्या वर्षभरात या पुलाचे आॅडिट करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. अमरावती जिल्ह्याचा विचार करता राष्ट्रीय महामार्गावर ब्रिटिशकालीन पूल आहेत, तर काही पूल स्वातंत्र्योत्तर काळातील आहेत; परंतु तेही आता धोकादायक झाले आहेत. महामार्गाच्या चौपदरीकरण अंतर्गत आता नवीन पूल बांधले जाणार आहेत.राज्य शासनाने राज्यातील पुलांच्या दुरुस्तीसाठी प्रथमच १८४ कोटी इतक्या भरीव रकमेची तरतूद केली आहे. वर्षभरात १६ पुलांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. दुरुस्तीची अचानक गरज भासल्यास ५० लाखांपर्यंत खर्चाचे अधिकार मुख्य अभियंत्यांना दिले आहेत. ५० लाखांपेक्षा अधिक खर्च असल्यास ४८ तासांत मंत्रालयातून मंजुरी व आठ दिवसांत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे नवीन धोरण आखण्यात आले आहे. नाबार्ड अंतर्गत तीन वर्षांत ग्रामीण भागात ७४२ पुलांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.पुलाचा धोका टाळण्यासाठी सेन्सर प्रणालीपावसाळ्यात पुराचा धोका टाळण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाच्या पुलांना सेन्सर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील महत्त्वाच्या दोनशेपेक्षा जास्त पुलांना इलेक्ट्रॉनिक्स सेन्सर बसविण्यात आले आहेत. पुराच्या पाण्याने धोकादायक पातळी ओलांडल्यास ही बाब जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्कालीन यंत्रणेस धोक्याचा अलार्म वाजवून सूचित केले जाते.

टॅग्स :Amravatiअमरावती