शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील सौर कृषिपंप राहिले कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 05:00 IST

अतिदुर्गम असलेल्या हतरू परिसरात वीज, पाणी, रस्ता, शिक्षण आरोग्य या मूलभूत सुविधा आजही नाहीत. विकासापासून कोसोदूर असलेल्या या भागात निसर्ग आणि अधिकारी दोन्ही आदिवासींची परीक्षा पाहत असल्याचे सत्य आहे. हतरू परिसराच्या भांडूम, सलिता, सुमिता शिवारातील आदिवासी शेतकर्यांनी महावितरणकडे सौर कृषिपंपासाठी अर्ज केले होते. दीड वर्षांपूर्वी रक्कम भरली.

ठळक मुद्देआदिवासींची बोळवण : सांगाडे केलेत उभे, सौर प्लेट लागल्या नाहीत, फसवणुकीचे शल्य

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : महावितरणच्यावतीने आलेल्या विविध कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी गोरगरीब आदिवासी शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतात सोलर कृषिपंप देण्याची योजना सांगितली. आदिवासींना दिवास्वप्न दिसले. घरातील भांडीकुंडी मोडून आवश्यक रक्कम भरली. एकदाचे पंप लागले की, दुहेरी पीक घेऊ, हाच त्यांचा उद्देश होता. परंतु, दीड वर्षे झाली तरी अधिकारी फिरकले नाहीत. पूर्वी काही शेतांमध्ये लोखंडी पाईपचे सांगाडे लागले. पुन्हा महिन्यांपूर्वी उर्वरित काही शेतात लोखंडी पाइप उभे केले गेले. सौर कृषिपंप मात्र शेतकऱ्यांना अद्याप प्राप्त झाले नाही.अतिदुर्गम असलेल्या हतरू परिसरात वीज, पाणी, रस्ता, शिक्षण आरोग्य या मूलभूत सुविधा आजही नाहीत. विकासापासून कोसोदूर असलेल्या या भागात निसर्ग आणि अधिकारी दोन्ही आदिवासींची परीक्षा पाहत असल्याचे सत्य आहे. हतरू परिसराच्या भांडूम, सलिता, सुमिता शिवारातील आदिवासी शेतकर्यांनी महावितरणकडे सौर कृषिपंपासाठी अर्ज केले होते. दीड वर्षांपूर्वी रक्कम भरली. त्यानंतर केवळ शेतात लोखंडी पाईपचे सांगाडे उभे करून विविध कंपन्यांचे अधिकारी निघून गेले. त्यामुळे आदिवासींनी जावे तरी कुणाकडे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.पुन्हा सांगाडे उभे करून गेलेआदिवासींच्या शेतात उभे करण्यात आलेल्या लोखंडी सांगाड्यांबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर संबंधित कंपन्यांचे अधिकारी सामान घेऊन परिसरात फिरकले. आतादेखील कृषिपंप लागण्याच्या आशेवर असलेल्या आदिवासींच्या भांडुम रस्त्यावरील शेतांमध्ये तसेच सांगाडे उभे करून संबंधित कंपन्यांचे अधिकारी बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी पालकमंत्री यशोमती ठाकूर व स्थानिक आमदारांनी दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.मेळघाटात शेतकरी आत्महत्या हव्यात का?आदिवासी पोटासाठी रात्रंदिवस अंगमेहनतीची कामे करतो. मजुरीसाठी हजारो किलोमीटर दूर जाऊन कुटुंबाचे पालनपोषण करतो. त्याच्याकडील शेतजमीन कोरडवाहू आहे. पावसाळ्यात पिकवलेला सोयाबीन पूर्णत: सडल्याने गहू, चणा, मसूर या रबीतील पिकांकडे नजर आहे. मात्र, त्यासाठी ओलिताची सोय नसल्याने आदिवासी हवालदिल झाला आहे. जवळची पुंजी, भांडीकुंडी मोडून शेतात सौर कृषिपंप मिळण्यासाठी रक्कम भरली. परंतु, लोखंडी पाईपशिवाय काहीच मिळाले नाही. शासन आणि अधिकारी आदिवासी शेतकर्यांच्या आत्महत्यांची वाट पाहत आहेत का, असा खडा सवाल करीत पंचायत समितीचे सदस्य नानकराम ठाकरे यांनी आदिवासींची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.सौर कृषिपंपासाठी केवळ लोखंडी आले. सौर प्लेट आणि कृषिपंप मात्र देण्यात आले नाही. कोरडवाहू शेती असलेल्या आदिवासींना गहू, चणा, मसूर आदी पिके घेता येणार नाहीत. संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाईची मागणी करण्यात आली आहे.नानकराम ठाकरेपंचायत समिती सदस्य, चिखलदरा

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प