शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनेचे कृषी कार्यालयाला घेराव आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:17 IST

वनोजा बाग/अंजनगाव सुर्जी : तालुक्यात अतिवृष्टीने सोयाबीन, कपाशी व संत्रा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी सदर पिकाचा ...

वनोजा बाग/अंजनगाव सुर्जी : तालुक्यात अतिवृष्टीने सोयाबीन, कपाशी व संत्रा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी सदर पिकाचा विमा भरूनही आजपर्यंत शेतकऱ्यांना सरकार व विमा कंपनीकडून लाभ मिळाला नाही. यामुळे शेतकरी संघटनेने १४ सप्टेंबर रोजी कृषी कार्यालयाला घेराव घातला होता. या आंदोलनात शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

विम्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने देण्यात आली. रास्ता रोको आंदोलनसुद्धा करण्यात आले. परंतु, या मागणीला सरकारने व विमा कंपनीने वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम केले. त्यामुळे शेतकरी संघटनेच्या अंजनगाव सुर्जी शाखेच्यावतीने १४ सप्टेंबर रोजी मोठ्या संख्येने दुपारी १ ते ५ या वेळेत कृषी कार्यालयाला घेराव घालण्यात आला. या घेराव सभेत कृषी अधिकारी व विमा कंपनीच्या प्रतिनिधींनीही मार्गदर्शन करताना विमा परतावा देताना लावण्यात येणारे निकष याबाबत माहिती दिली. सात वर्षांचे उंबरठा उत्पन्न, सरासरी व वातावरण बदल या सर्व बाबी गृहीत धरून निकष लावले जातात. त्यामुळे शक्यतो शेतकऱ्यांना विमा मिळूच नये, अशाच निकषावर जोर दिला जातो. संघटनेकडून यावर आक्षेप घेण्यात आला.

गतवर्षी सोयाबीन पिकाचे शंभर टक्के नुकसान होऊनसुद्धा विम्याचा लाभ मिळाला नाही. यामुळे प्रत्येक मौजाचे पंचनामे कृषी विभागाकडून मागण्यात आले आहेत. पंचनामे खोटे आढळल्यास न्यायालयीन कारवाई करण्याचे संकेत शेतकरी संघटनेने दिले. मोबाइल कंपन्यांच्या सेवेमुळे ठिकाणी रेंज मिळत नाही. त्यामुळे ई-पीक पाहणीसह ऑनलाईन कामे शेतकऱ्यांवर लादू नये, असे जिल्हाध्यक्ष माधवराव गावंडे म्हणाले.

घेराव आंदोलनात तालुकाध्यक्ष संजय हाडोळे, स्वभापचे तालुकाध्यक्ष गजानन पाटील दुधाट , विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील साबळे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद दाळू, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सागर हुरबडे, ग्रामगीताचार्य मनोहर रेचे, हभप सुरेश मानकर, माजी तालुकाप्रमुख अशोक गिते यांनी पीक विम्यावर शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. किशोर काळमेघ, देविदास ढोक, संजय हिंगे, बाबूराव साबळे, ओमप्रकाश मुरतकर, अच्युतराव गोबरे, विलास धुमाळे, जगदीश पोटे, वामनराव पवार, प्रभाकर अण्णा गावनेर, भाऊराव साबळे, भास्करराव मोरे, ज्ञानेश्वर वानखडे, गणेश चिंचोळकर, हरिभाऊ गोळे, अरुण गोंडचोर, शरद बहादुरे, नितीन खडसे, मधुकर मोरे, प्रसिद्धी प्रमुख अभिजित गोबरे यांनी परिश्रम घेतले.