शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

आता जूनअखेरपर्यंत सुरक्षा कवच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:12 IST

अमरावती : कोविड-१९ शी संबंधित कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू होणार या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना ५० लाख रुपयांचे सानुग्रह लागू ...

अमरावती : कोविड-१९ शी संबंधित कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू होणार या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना ५० लाख रुपयांचे सानुग्रह लागू करण्याच्या योजनेला आता ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जानेवारी २०२१ पासून मृत्यू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांनाही हे अर्थसहाय्य मिळू शकणार आहे.

हे सानुग्रह सहाय्य लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने २९ मे २०२० च्या अध्यादेशाद्वारे घेतला होता. ३० सप्टेंबरपर्यंत लागू असलेल्या या निर्णयाला नंतर ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर घडलेल्या मृत्यूची प्रकरणे वित्त विभागाच्या संमतीने विशेष बाब म्हणून निकाली काढली जात होती. मात्र, राज्यात फेब्रुवारीच्या मध्यापासून कोविड-१९चा प्रादुर्भाव अधिकच वाढला असून, मृत्यूची संख्या वाढली आहेत. यात नागरिकांसह शासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती विचारात घेऊन शासनाने या सानुग्रह योजनेला १ जानेवारी २०२१ पासून ३० जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे वित्त विभागाने १४ मे रोजी या संदर्भात आदेश जारी केला आहे. कोरोना काळात सर्वेक्षण शोध, चाचणी, उपचार व मदतकार्य यांच्याशी संबंधित कर्तव्य बजावताना शासनाच्या विविध विभांगातील विविध प्रवर्गातील कर्मचाऱ्यायांचा जवळून संबंध येतो. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्राच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ८ मार्च २०२० रोजी काढलेल्या आदेशानुसार आरोग्य कर्मचाऱ्यांना कवच लागू केला आहे. मात्र, आरोग्य कर्मचारी अतिरिक्त जिल्हा प्रशासन, पोलीस होमगार्ड, अंगणवाडी कर्मचारी लेखा व कोषागार, अन्न व नागरी पुरवठा पाणी पुरवठा व स्वच्छता घरोघरी जाऊन सर्वेक्षण यासाठी नेमलेल्या विभागाचे कर्मचारीही संबंधित कर्तव्य पार पाडतात. अशा कर्मचाऱ्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठाम राहिले, यासाठी राज्य शासनाने यांनाही ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य देण्याचा निर्णय घेतला.