शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

आता जूनअखेरपर्यंत सुरक्षा कवच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:12 IST

अमरावती : कोविड-१९ शी संबंधित कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू होणार या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना ५० लाख रुपयांचे सानुग्रह लागू ...

अमरावती : कोविड-१९ शी संबंधित कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू होणार या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना ५० लाख रुपयांचे सानुग्रह लागू करण्याच्या योजनेला आता ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जानेवारी २०२१ पासून मृत्यू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांनाही हे अर्थसहाय्य मिळू शकणार आहे.

हे सानुग्रह सहाय्य लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने २९ मे २०२० च्या अध्यादेशाद्वारे घेतला होता. ३० सप्टेंबरपर्यंत लागू असलेल्या या निर्णयाला नंतर ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर घडलेल्या मृत्यूची प्रकरणे वित्त विभागाच्या संमतीने विशेष बाब म्हणून निकाली काढली जात होती. मात्र, राज्यात फेब्रुवारीच्या मध्यापासून कोविड-१९चा प्रादुर्भाव अधिकच वाढला असून, मृत्यूची संख्या वाढली आहेत. यात नागरिकांसह शासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती विचारात घेऊन शासनाने या सानुग्रह योजनेला १ जानेवारी २०२१ पासून ३० जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे वित्त विभागाने १४ मे रोजी या संदर्भात आदेश जारी केला आहे. कोरोना काळात सर्वेक्षण शोध, चाचणी, उपचार व मदतकार्य यांच्याशी संबंधित कर्तव्य बजावताना शासनाच्या विविध विभांगातील विविध प्रवर्गातील कर्मचाऱ्यायांचा जवळून संबंध येतो. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्राच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ८ मार्च २०२० रोजी काढलेल्या आदेशानुसार आरोग्य कर्मचाऱ्यांना कवच लागू केला आहे. मात्र, आरोग्य कर्मचारी अतिरिक्त जिल्हा प्रशासन, पोलीस होमगार्ड, अंगणवाडी कर्मचारी लेखा व कोषागार, अन्न व नागरी पुरवठा पाणी पुरवठा व स्वच्छता घरोघरी जाऊन सर्वेक्षण यासाठी नेमलेल्या विभागाचे कर्मचारीही संबंधित कर्तव्य पार पाडतात. अशा कर्मचाऱ्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठाम राहिले, यासाठी राज्य शासनाने यांनाही ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य देण्याचा निर्णय घेतला.