शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

नगरविकास मंत्रालयात अडकली स्वच्छ प्रभागांची पारितोषिके 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2018 6:29 PM

स्वच्छ वॉर्ड स्पर्धा संपुष्टात आल्याच्या साडेतीन महिन्यानंतरही या स्पर्धांचे निकाल नगरविकास विभागाकडे रखडले आहेत. विजेते वॉर्ड कोणते, पुरस्काराची रक्कम कुणी द्यायची, कुठल्या शीर्षातून ती खर्च करायची, याबाबत या खात्याकडून स्पष्ट निर्देश नसल्याने नपा- महापालिकांचीही गोची झाली आहे.

 अमरावती -  स्वच्छ वॉर्ड स्पर्धा संपुष्टात आल्याच्या साडेतीन महिन्यानंतरही या स्पर्धांचे निकाल नगरविकास विभागाकडे रखडले आहेत. विजेते वॉर्ड कोणते, पुरस्काराची रक्कम कुणी द्यायची, कुठल्या शीर्षातून ती खर्च करायची, याबाबत या खात्याकडून स्पष्ट निर्देश नसल्याने नपा- महापालिकांचीही गोची झाली आहे. शासनाच्या नगरविकास मंत्रालयाकडे या स्पर्धेतील विजेत्या प्रभागांची नावे, पारितोषिक रक्कम व ती पारितोषिके कुठून द्यायची, असा साराच मामला प्रलंबित आहे. 

स्वच्छ महाराष्टÑ अभियानामध्ये सहभागी होण्यास लोकांना उद्युक्त कारणे, हगणदारीमुक्त व स्वच्छतेबाबत शहरांचे कायमस्वरूपी क्षमता वाढविणे, स्वच्छ महाराष्ट्राच्या दिशेने जो प्रवास चालला आहे - त्यामध्ये समाजातील सर्व घटकांतील लोकांचा सांघिक सहभाग वाढविण्यासाठी जनजागृती करणे, यासाठी सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत स्वच्छ वॉर्ड स्पर्धा घेण्यात आली. याच काळात स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ची अंमलबजावणी सुरू असल्याने या स्पर्धेलाही व्यापक प्रतिसाद मिळाला. मार्च महिन्यात प्रत्येक नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेतील या स्पर्धेची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करावी व २० मार्च २०१८ पर्यंत गुणानुक्रमानुसार पहिली तीन बक्षिसे देण्यात यावी, असे निर्देश नगरविकासने दिले होते. या स्पर्धेची तपासणी त्रयस्थ संस्थेमार्फत करून घेण्यात आल्यावर त्याबाबतचा अहवाल २५ मार्चपर्यंत राज्य शासनास पाठवावा; तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर या बक्षीस योजनेसाठी कोणाला निधीमधून खर्च करावा, याबाबतचे आदेश शासन देईल, असे मंत्रालयातील उपसचिव सुधाकर बोबडे यांनी म्हटले होते. त्यानुसार बहुतांश सर्व महापालिका, नगरपालिकांनी त्याबाबतचे अहवाल नगरविकास मंत्रालयाकडे पाठविले. मात्र, एप्रिल आणि त्यापाठोपाठ जून संपत असताना या बक्षीस योजनेसाठी कोणत्या निधीमधून खर्च करावा, याबाबतचे स्पष्ट आदेश नगरविकास विभागाने दिलेले नाहीत. महापालिका प्रशासनाने याबाबत बोबडे यांच्याही संपर्कही साधला. मात्र, २४ जूनपर्यंत तरी निकाल आणि पारितोषिकाबाबत नगरविकास विभागाने कोणतेही आदेश पारित केले नाहीत.

पालिका स्तरावर सामसूम अमरावती महापालिका क्षेत्रात कोणत्या प्रभागात प्रभावीपणे स्वच्छ वॉर्ड स्पर्धा राबविण्यात आली, पहिले तीन स्वच्छ प्रभाग कोणते, याबाबतचा अहवाल त्रयस्थ संस्थेने महापालिकेला दिला आहे. मात्र, ती रक्कम कोणत्या निधीतून खर्च करायची, याबाबतचे निर्देश नसल्याने पालिकेने निकाल गुलदस्त्यात ठेवले आहेत. 

असे आहेत पारितोषिकेअ व ब वर्ग महापालिकांमध्ये प्रथम क्रमांकासाठी ५० लाख, द्वितीयसाठी ३५ लाख व तृतीयसाठी २० लाख, तर क व ड महापालिकांतील पहिल्या तीन स्वच्छ प्रभागांना अनुक्रमे ३०, २० व १५ लाख रुपये बक्षिसे देण्यात येतील. अ वर्ग नगरपालिकांमधील स्वच्छ प्रभागांना अनुक्रमे ३०, २० व १५ लाख, ब वर्ग नगर परिषदांना २०, १५ व १० लाख, तर क वर्ग नगर परिषदांमधील प्रथम, द्वितीय व तृतीय स्वच्छ प्रभागाला अनुक्रमे १५ लाख, १० लाख व ५ लाख मिळतील.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानAmravatiअमरावती