शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

वृक्षलागवडीची रोपे करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:51 IST

राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेंंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ४० लाख रोपे लावण्यात आली आहेत. मात्र, पाऊस गायब झाल्याने यातील बहुतांश रोपे करपली. पाऊसच नसल्याने उर्वरित रोपांचे संगोपन तरी कसे करावे, ही मोठी समस्या वनविभाग, सामाजिक वनीकरण, व्याघ्र प्रकल्पासह अन्य शासन, प्रशासकीय यंत्रणेपुढे उभी ठाकली आहे.

ठळक मुद्देपाण्याअभावी भीषण संक ट : जिल्ह्यात ४० लाख वृक्षलागवडीची नोंद; नर्सरीत रोपे पडून

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेंंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ४० लाख रोपे लावण्यात आली आहेत. मात्र, पाऊस गायब झाल्याने यातील बहुतांश रोपे करपली. पाऊसच नसल्याने उर्वरित रोपांचे संगोपन तरी कसे करावे, ही मोठी समस्या वनविभाग, सामाजिक वनीकरण, व्याघ्र प्रकल्पासह अन्य शासन, प्रशासकीय यंत्रणेपुढे उभी ठाकली आहे. काही ठिकाणी रोपांना टँकरने पाणी पुरविले जात आहे. ही व्यवस्था वृक्षलागवडीतील उद्दिष्टाच्या तुलनेत तोकडी ठरली आहे.१ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविला जात आहे. जिल्ह्यात १ कोटी ११ लाख ६८ हजार रोपांचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेत शासन-प्रशासनाच्या ५४ यंत्रणांनी सहभाग घेतला आहे. वृक्षलागवडीसाठी रोपे, खड्डे, वृक्षरोपण, छायाचित्र आदी बाबी संबंधित यंत्रणेला आॅनलाइन कराव्या लागल्यात. राज्यात ३० टक्के जमीन वृक्षाच्छादनाने हिरवी करायची आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाने चार वर्षांत ५० कोटी वृक्षलागवडीचे लक्ष्य निश्चित केले. वनविभाग, सामाजिक वनीकरण आणि व्याघ्र प्रकल्पाला दिलेले वृक्षलागवडीचे उद्दिष्ट १५ आॅगस्टपर्यत पूर्ण करून तसा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला कळवायचा आहे. मात्र, पावसाने दगा दिला दिल्याने रोपे करपली आहेत. वृक्षलागवड मोहिमेत बहुतांश यंत्रणांनी रोपे नेली. मात्र, पाऊस नसल्याने ही रोपे करपत असून, काही ठिकाणी मरणासन्न अवस्थेला प्राप्त झाली आहेत.वनमंत्र्यांची बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवनमंत्री तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची अमरावती विभाग आणि जिल्ह्यात वृक्षलागवडीबाबत २४ जुलै रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग होणार आहे. येथील विभागीय कार्यालयात विभागीय आयुक्त पीयूष सिंह आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी ते संवाद साधणार आहेत. यात आतापर्यंतची वृक्षलागवड आणि रोपे करपल्याबाबतची माहिती घेतली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.वृक्षलागवडीतील रोपे जगविताना मोठी कसरत करावी लागत आहे. काही रोपे नर्सरीत, तर काही लागवडस्थळी पडून आहेत. या रोपांना जगविण्याचे टार्गेट असले तरी लागवड झालेली रोपे करपत आहेत. पाण्याअभावी ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे.- गरेंद्र नरवणेउपवनसंरक्षक, अमरावती.अमरावती, चांदूर रेल्वे तालुक्यांना फटका३३ कोटी वृक्षलागवडीत रोपे करपल्याचा सर्वाधिक फटका अमरावती, चांदूर रेल्वे, भातकुली तालुक्यांना बसला आहे. या तिन्ही तालुक्यांमध्ये ६० ते ७० टक्के रोपे करपली. पोहरा, वडाळी येथे रोपांना टँकरने पाणी देऊन ती जगविण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, हे पर्याय अपुरे पडत आहेत. चिरोडी, अंजनगाव बारी, भातकुली, परलाम, कु ºहा या भागात रोपे जगविण्याचे वनविभागासमोर भीषण संकट आहे.भाड्याने टँकर मिळेनापाऊस गायब झाल्यामुळे बळीराजा अतिशय त्रस्त आहे, यात दुमत नाही. परंतु, वनविभागाला रोपे जगविण्यासाठी पाणी देण्याकरिता भाड्याने टँकर मिळत नसल्याचे वास्तव आहे. काही शेतकरी पिके जगविण्यासाठी विहिरीत टँकरने पाणी सोडत आहेत. त्यानंतर विहिरीतून स्प्रिंकलरद्वारे पिकांना पाणी सोडून ते जगविण्याची शक्कल शेतकरी करीत आहेत. त्यामुळे हल्ली भाड्याने टँकर मिळत नसल्याची माहिती चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :forest departmentवनविभाग