शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

नशीब बलवत्तर म्हणून 'तो' बचावला; 'त्या' भीषण अपघाताने पंचक्रोशीत स्मशानशांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2022 16:59 IST

रस्त्यावर पडलेल्या सीट कव्हरवरून पोलिसांना शंका आल्याने या अपघाताचा उलगडा झाला.

ठळक मुद्देसहा कुटुंबांवर आधात

अमरावती : नेहमी गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या समयसूचकतेने अपघात उघडकीस आला, परंतु या भीषण अपघातात सहाजणांचा जीव गेला, नशीब बलवत्तर म्हणून अपघाताची चाहूल लागली की काय म्हणून एकजण आधीच खरपी येथे उतरला आणि काही क्षणात वाहन पुढे गेले आणि हा सहा परिवारांवर आक्रोश आणणारा अपघात घडला... रवि मसराम (२८), असे बचावलेल्या तरुणाचे नाव आहे.

रविवारची मध्यरात्र सहा कुटुंबीयांवर काळरात्र ठरली, खरपी, बहिरम कारंजा, बोदड या मेळघाटच्या पायथ्याशी वजा मध्यप्रदेश सीमारेषेवरील, परतवाडा बैतूल मार्गावर भीषण असा अपघात निंभोरा फाटा येथे घडला. मृतांमध्ये पांडुरंग रघुनाथ शनवारे (वय ३०, रा. बोदड, ता. चांदूर बाजार), सतीश सुखदेव शनवारे (३०, रा. बहिरम कारंजा), सुरेश विठ्ठल निर्मळे (२५, रा. खरपी), चारचाकीचा चालक रमेश धुर्वे (३०, रा. सालेपूर, ता. अचलपूर) या चौघांसह दुचाकीवरील प्रतीक दिनेशराव मांडवकर (२६), अक्षय सुभाष देशकर (२६, रा. बोदड, ता. चांदूर बाजार) यांचा समावेश आहे. अपघातानंतर महामार्ग परिवहन विभाग पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

परतवाडा-बैतूल मार्गावर कारची दुचाकीला जबर धडक; सहा ठार, एक गंभीर

तिघे विवाहित, अक्षय परिवारात एकटाच

मृतांमध्ये प्रतीक मांडवकर त्याला एक लहान भाऊ असून अक्षय देशकर एकटाच होता. मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे, पांडुरंग शनिवारी याला दोन मुले आहेत. हे तिघेही मृतक बोदळ येथील असून सतीश शनवारे कारंजा बहिरम येथील असून त्याला एक मुलगा तर पत्नी गर्भवती आहे. चारचाकीचा चालक रमेश धुर्वे याला पत्नी व दोन मुले आहेत. संपूर्ण सहा मृतदेहांवर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर तेजस कनाके व डॉ. दीपाली जाधव यांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.

एक उतरला आणि दुसरा बसला

परतवाड्यावरुन चारचाकीत पाच जण बसले, त्यापैकी एक सालेपूरचा असल्याने खरपी येथे उतरला. परंतु खरपी चौकात आलेला सुरेश निर्मळे याला लवकर बोदडवरून यांना सोडून येऊ असे म्हणत बसविले आणि जातानाच हा घात झाला. यात त्याचा नाहक बळी गेला. एक उत्तरला आणि दुसरा बसला, त्यात त्याचा जीव गेला असा प्रकार पुढे आला आहे.

टॅग्स :SocialसामाजिकAccidentअपघातAmravatiअमरावती