जिल्ह्यात संततधार पावसाने पाचव्याही दिवशी सूर्यदर्शन झालेले नाही. मेळघाटसह चांदूरबाजार तालुक्यात पावसाचा कहर अद्याप सुरू आहे. सर्व तालुक्यांमध्ये सरासरी २७.२ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये धारणी तालुक्यासह सहा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. ...
अचलपूर तालुक्यातील सपन नदी प्रकल्पात ८२ टक्के जलसंचय झाला आहे. धरणात पाण्याची आवक ५०.७२ घनमीटर प्रतिसेकंद सुरू आहे. धरणातील पाण्याची पातळी ५११.०५ मीटर झाल्यामुळे ३० जुलैला सपन धरणाचे चारही दरवाजे १० सेमीने दुपारी १ वाजता उघडण्यात आले. ...
जिल्ह्यात चार दिवसांपासून पावसाची झड आहे. शनिवारी सात मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर गेल्या २४ तासांत पुन्हा सार्वत्रिक दमदार पाऊस झाला. यामध्ये चिखलदरा व धारणी तालुक्यात दशकातला रेकार्ड तुटला. तब्बल १२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाल्याने न ...
महिला व पुरुषांच्या सामुदायिक बाथरूमचा फायदा घेत महिलांची आक्षेपार्ह छायाचित्रे घेतल्याच्या संशयावरून राजापेठ पोलिसांनी हॉटेलच्या एका रूमबॉयला रविवारी रात्री अटक केली. या घटनेमुळे हॉटेलमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. पंकज नारायण खडसे (१९, रा.वड ...
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सपन, पूर्णा, चंद्रभागा, शहानूर, चारघड नदी प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ झाली. सपन नदी प्रकल्प ८० टक्के भरला आहे. त्यामुळे प्रकल्पाचा पहिला व चौथा दरवाजा सायंकाळी सहाच्या सुमारास पाच सेमीने उघडला. प्रकल्प अधिकाऱ्या ...
शहरात चार दिवसांपासून पावसाची रिपरीप सुरू आसल्याने रस्ते अन् चौकाचौकांची दैना झाली आहे. काँक्रीटचे रस्ते तयार करताना प्रमुख चौकांत काँक्रीटीकरण न झाल्यामुळे या खोलगट भागात पाणी साचले. परिणामी वाहनचालकांची त्रेधा उडाली. काही ठिकाणी रस्त्यात खड्डे की ख ...
मुंबईत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. परिणामी मुंबईहून हावडा, नागपूरकडे येणाऱ्या गाड्यांना दोन दिवसांपूर्वी जोरदार फटका बसला. मात्र, सोमवारपासून रेल्वे गाड्या पूर्ववत झाल्या. हावडा-गीतांजली एक्स्प्रेस मात्र आठ तास विलंबाने धावली. अर्धा ता ...