शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

१३ कोटी वृक्ष लागवडीबाबत अन्य यंत्रणा सुस्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 4:53 PM

राज्यात १ ते ३० जुलै २०१८ या कालावधीत वनविभागासह ३९ शासकीय यंत्रणा, १० महामंडळांना १३ कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट असताना वनविभाग वगळता अन्य यंत्रणांनी या मोहिमेत कमालीची अनास्था दाखविली आहे.

ठळक मुद्देवनमंत्र्यांचे जम्बो दौरे खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्षांसह सरपंचांना भावनात्मक पत्र

गणेश वासनिक।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात १ ते ३० जुलै २०१८ या कालावधीत वनविभागासह ३९ शासकीय यंत्रणा, १० महामंडळांना १३ कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट असताना वनविभाग वगळता अन्य यंत्रणांनी या मोहिमेत कमालीची अनास्था दाखविली आहे. त्यामुळे दस्तुरखुद्द वनमंत्री तथा अर्थमंत्री राज्यभर दौरे करून वृक्ष लागवडीबाबत इतर यंत्रणांचा आढावा घेत आहेत.महाराष्ट्राला ३३ टक्के वृक्ष आच्छादनाने वलयांकित करण्याचा ध्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. त्याकरिता १३ कोटी वृक्ष लागवड हा उपक्रम ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून नावारूपास आणला जात असताना वनविभाग वगळता इतर शासकीय यंत्रणा याकडे पाठ फिरवित असल्याचे दिसून येत आहे. १ ते ३० जुुुलै या कालावधीत वनविभाग लोकसहभागातून स्वत:च्या जमिनीवर आठ कोटी वृक्ष लागवड करणार आहे. त्याअनुषंगाने वनविभागाने तयारीदेखील चालविली असून, पूर्व पावसाच्या कामाची अंमलबजावणी जलद गतीने केली जात आहे. मात्र, जिल्हा परिषदांकडे दोन कोटींच्यावर वृक्ष लागवडीचे टार्गेट असताना त्या तुलनेत या यंत्रणेने उपापयोजना केल्या नाहीत, असे यापूर्वी प्रधान वनसचिव विकास खारगे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीतून स्पष्ट झाले आहे.राज्य शासनाचे ३९ विभाग, १० महामंडळांनीसुद्धा १३ कोटी वृक्ष लागवडीबाबत ध्येयपूर्तीकडे वाटचाल केली नाही. वनविभाग वगळता अन्य शासकीय यंत्रणांचे वृक्ष लागवडीबाबत प्रधान वनसचिव खारगे यांनी आढावा घेतला असता, ३५ जिल्ह्यांमध्ये कामे समाधानकारक नसल्याची धक्कादायक बाब त्यांच्या निदर्शनास आली. शासकीय यंत्रणा वृक्ष लागवडीबाबत कागदोपत्रीच माहिती नाचवित असल्याचे खारगे यांना दिसून आले आहे. त्यामुळे त्यांनी अन्य यंत्रणांच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून १३ कोटी वृक्ष लागवडबाबतची वस्तुस्थिती कळविली. परिणामी वनविभाग व्यतिरिक्त अन्य यंत्रणांनी या मोहिमेत हिरीरीने सहभागी होण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रधान वनसचिव विकास खारगे यांनी जिल्हानिहाय जलद गती दौऱ्याचे नियोजन केले असून, वनमंत्री मुनगंटीवार हे २८ मे रोजी अमरावतीच्या दौऱ्यावर असून, ते वृक्ष लागवडीबाबतचा आढावा घेणार आहेत.वनविभागाला अन्य यंत्रणा जुमानेना१३ कोटी वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत, तर उपवनसंरक्षक सचिव असलेली प्रत्येक जिल्ह्यात शासनाने समिती गठित केली आहे. परंतु, राज्यात २० जिल्हाधिकाऱ्यांना वृक्ष लागवड आढाव्यासाठी वेळ मिळत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे इतर विभागाचे अधिकारी वृक्ष लागवड आढावा बैठकीला दांडी मारत आहेत. त्यामुळे वनविभागाला इतर यंत्रणा जुमानेना, असे दिसून येत आहे.प्रधान वनसचिवांकडून आढावा बैठकीचे ‘ब्रिफींग’राज्य शासनाच्या संकल्पनेतून वनक्षेत्र ३३ टक्क्यांवर न्यायचे असल्याने प्रधान वनसचिव विकास खारगे यांनी यापूर्वी विभागनिहाय वृक्ष लागवडीबाबत दोन बैठकांतून आढावा घेतला. वनसचिवांनी या बैठकीचे ‘ब्रिफींग’ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे. मे महिना अर्ध्यावर आला असताना वनविभाग वगळता अन्य यंत्रणा नियोजनात माघारल्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे.वनमंत्र्यांनी लिहिले भावनात्मक पत्रवृक्ष लागवड ही मोहीम असून, यात खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्षांसह सरपंचांनी स्वत: झोकून द्यावे. वृक्ष लागवडीच्या नियोजनासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. राज्याचे वनक्षेत्र ३३ टक्क्यांवर पोहचविण्यासाठी खारीचा वाटा उचलावा, असे भावनात्मक आवाहन वजा पत्र वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या स्वस्वाक्षरीने राज्यभरातील लोकप्रतिनिधींना पाठविले आहे.

टॅग्स :forestजंगल