शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
2
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
3
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
4
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
5
शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी; "आनंदराव अडसूळांनी नको त्या विषयात हात घालू नये, अन्यथा..."
6
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
7
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
8
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
9
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
10
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
11
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
12
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
13
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
14
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
15
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
16
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 
17
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
18
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
20
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग

वन्यजीवांची तस्करी रोखण्यासाठी आता ‘ऑपरेशन बिरबल-२’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2022 7:00 AM

Amravati News यंदा वन्यजीव शिकारींच्या पार्श्वभूमीवर वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बोर्ड (डब्ल्यूसीसीबी)ने ‘ऑपरेशन बिरबल-२’ राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याअनुषंगाने राज्याच्या वनविभागात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ठळक मुद्देवनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ॲक्शन प्लॅन

गणेश वासनिक

अमरावती : उन्हाळ्याच्या हंगामात वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाघ, बिबट व इतर वन्यजीवांच्या शिकारीच्या घटना घडतात. मात्र, यंदा वन्यजीव शिकारींच्या पार्श्वभूमीवर वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बोर्ड (डब्ल्यूसीसीबी)ने ‘ऑपरेशन बिरबल-२’ राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याअनुषंगाने राज्याच्या वनविभागात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बोर्ड कार्यरत आहे. देशात वाघ, बिबट व इतर अनुसूचीनिहाय वन्यजीवांच्या शिकारी, हत्या, अवयवांच्या तस्करीवर नियंत्रण मिळविण्यासाठी डब्ल्यूसीसीबी वेळोवेळी गाईडलाईन तयार करते. ज्या राज्यात वाघ, बिबट्यांच्या शिकारी होण्याचे प्रमाण वाढीस लागते, अशा राज्यांवर सक्ती करण्याचे अधिकारसुद्धा डब्ल्यूसीसीबीला बहाल करण्यात आले आहेत. याशिवाय, वन्यजीवांच्या शिकारी, हत्या, अवयवांच्या तस्करीप्रकरणी चौकशीदेखील ही संस्था करू शकते. तथापि, गत दोन वर्षांत राज्यात वनविभागाची कामगिरी सुधारली आहे.

काय आहे ‘ऑपरेशन बिरबल-२’

उन्हाळ्यात वनक्षेत्रांना आगी लावून वन्यजीवांची हत्या, शिकार आणि अवयवांची तस्करी केली जाते, असा निष्कर्ष डब्ल्यूसीसीबीने काढला आहे. वन्यजीवांची तस्करी करणारे मास्टर माइंड सक्रिय होतात. त्यामुळे ‘ऑपरेशन बिरबल-२’नुसार गावपातळीवर स्वत: तपास करणे, शिकाऱ्यांवर पाळत ठेवणे, शिकाऱ्यांची गोपनीय माहिती मिळविणे, स्थानिकांची मदत घेत शिकाऱ्यांवर सापळा रचणे आदी कामे वनकर्मचारी, अधिकाऱ्यांना करावी लागणार आहेत.

वनतस्करांचे रेकॉर्ड तपासणार

वनपरिक्षेत्रनिहाय वन्यजीवांच्या शिकारप्रकरणी जुन्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवणे, तो हल्ली नेमका काय करतो, याचा शोध घेणे, त्या गुन्हेगाराला कोणी बाहेरील व्यक्ती भेटते अथवा संपर्क आहे का? याविषयी चाचपणी करणे, जंगलात ती व्यक्ती दिसल्यास पोलिसांना माहिती देणे, गुन्हेगारांविषयी बारीकसारीक माहिती गोळा करणे, गावस्तरावर पोलीस पाटलांची मदत घेणे, वन्यजीव शिकारीचे आर्टिकल्स तयार करून त्याचे गावस्तरावर मार्गदर्शन करणे आणि पूर्वाश्रमीच्या वनगुन्हेगारांची माहिती गोळा करण्यात येणार आहे.

 

‘ऑपरेशन बिरबल-२’ची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. वन्यजीवांच्या शिकारी यातून नक्कीच रोखता येईल. राज्यभर ही मोहीम राबवू. जंगल क्षेत्रानजीकच्या गावात बारकाईने लक्ष दिले जाईल.

- सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र

टॅग्स :wildlifeवन्यजीव