शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

-तर माणसांनाही द्यावे लागेल मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:03 IST

‘ग्लँडर्स’चा संसर्ग रोखण्यासाठी पशूवैद्यक शास्त्रात कोणतीच लस अथवा औषधी उपलब्ध नसल्याने हा आजार असाध्य मानला गेला आहे.

ठळक मुद्देलस, औषधीही नाही : वेगाने होते आजाराचे संक्रमण

प्रदीप भाकरे।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘ग्लँडर्स’चा संसर्ग रोखण्यासाठी पशूवैद्यक शास्त्रात कोणतीच लस अथवा औषधी उपलब्ध नसल्याने हा आजार असाध्य मानला गेला आहे. ज्याप्रकारे अडुळा बाजार येथिल ‘ग्लँडर्स’बाधित घोड्याला ठार मारण्यात आले. त्याचप्रमाणे यासंसर्गाची लागण झालेल्या मानवालाही वेदनारहित मृत्यू देण्याशिवाय पर्याय नाही. ‘ग्लँडर्स’बाधित माणसांनाही मरणच द्यावे लागेल. मात्र, तसा प्रकार अद्याप भारतात झाला नसल्याचा दावा पशूवैद्यकतज्ज्ञ आणि पशूसंवर्धन विभागाने केला आहे. मानवांमध्ये हा आजार दुर्लभ असला तरी त्याला प्रतिबंध घालण्यासाठी आणि त्याचा संसर्ग होऊ नये, यासाठी संक्रमिताला ठार मारण्याशिवाय पर्याय नाही, यावर मात्र तज्ज्ञांचे एकमत आहे. ‘ग्लँडर्स’चा संसर्ग इतक्या झपाट्याने पसरतो की बाधित मनुष्यप्राण्यावर उपचार करण्याऐवजी त्याला वेदनारहित मृत्यू देऊनच या रोगाला अटकाव घालता येऊ शकतो. असा कायदा सन १८९९ पासून भारतात अस्तिवात आहे. ‘ग्लँडर्स’ याप्राणघातक संसर्गाची लागण झालेल्या अडुळा बाजार येथिल एका घोड्याला ठार मारण्यात आल्याने जिल्ह्यातील सर्व अश्ववर्गिय जनावरांच्या रक्तजल नमुन्यांची तपासणी करण्याचे आदेश पशूसंवर्धन विभागाने दिले आहेत.‘ग्लँडर्स’या जीवाणूजन्य आजाराचा फैलाव अत्यंत वेगाने होतो. त्यामुळे तज्ञांच्या मते बाधितांवर उपचारापेक्षा त्याचा फैलाव रोखण्यास प्राधान्य दिले जाते. ‘ग्लँडर्स’वर परिणामकारक लस वा औषधी उपलब्ध नाही. बाधित प्राण्याच्या संपर्कात येणाºयास हा आजार संभवतो.- सुधीर गावंडे,पशूशल्यचिकित्सक‘ग्लँडर्स’मानवासाठी घातक असून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अश्ववर्गिय जनावरांच्या वाहतुकीस मनाई केली आहे. अडुळा बाजारच्या‘ग्लँडर्स’ बाधित घोड्याला ३० जुलैला वेदनारहित मृत्यू देण्यात आला. संसर्ग रोखण्यासाठी अन्य पर्याय नसल्याने शासनही परवानगी देते.- डॉ. मोहन गोहत्रे, उपायुक्त ,जिल्हा पशुसंवर्धन विभाग‘ग्लँडर्स’बाधित मनुष्यात आढळणारी लक्षणेरक्तप्रवाहात संक्रमण, जुनाट पुरळातून संक्रमण, ताप, स्रायू वेदना, छाती दुखणे, स्रायू तणाव, डोकेदुखी, अतीजोरदार प्रकाश संवेदनशिलता, अतिसार, त्वचा संक्रमण, फुफ्फुसाचा संसर्ग, रक्त संक्रमण, त्वचेची विकृती, यकृताला फोडे, त्वचा व्रण, त्वचा जळू लागणे, अंगावर गाठी येणे.नवरदेवांनो सावधान !अडुळाबाजार येथिल ‘ग्लँडर्स’बाधित घोड्याला ठार मारण्यात आल्यानंतर त्याचा मानवालाही धोका होऊ शकतो,यासाठी अश्ववर्गिय जनावरांची रक्तजलनमुने तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी घोडे,गाढव आणि खेचरांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यात लग्नाच्या वेळी नवरदेवाची घोड्यावरुन वरात काढली जाते.याशिवाय अंजनगावसह अन्य काही गावांमध्ये प्रवासी वाहतुकीसाठी घोडागाडी वापरली जाते. त्यामुळे लग्नप्रसंगी नवरदेव आणि घोडागाडीतून प्रवास करणाºयांना ‘ग्लँडर्स’चा संसर्ग होण्याची शक्यता आहे.