शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

१००‘कोरोना’ पॉझिटिव्ह पैकी पाच जणांनाच धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 05:00 IST

पाच रुग्णांमध्ये तीव्र स्वरुपाची लक्षणे आढळत असल्याने त्यांना तातडीने उपचार घेणे गरजेचे असते. जिल्ह्यात अद्याप एकही रुग्ण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळलेला नाही, हे विशेष. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

ठळक मुद्देजिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही : श्यामसुंदर निकम यांची माहिती

संदीप मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘कोरोना’ व्हायरसचा संसर्ग झालेल्या १०० पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ८१ रुग्ण साधारण असतात, त्याचा कुठलाही धोका नसतोे. १४ जणांमध्ये त्याची सोम्य लक्ष्णे आढळतात. मात्र, काळजी घ्यावी लागते. परंतु पाच रुग्णांमध्ये तीव्र स्वरुपाची लक्षणे आढळत असल्याने त्यांना तातडीने उपचार घेणे गरजेचे असते. जिल्ह्यात अद्याप एकही रुग्ण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळलेला नाही, हे विशेष. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी ‘लोकमत’ला सांगितले.एखादी व्यक्ती जर ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आली असेल व त्यानंतर त्याला ताप, सर्दी, खोकला, अशी लक्षणे आढळून येत असतील तर त्याने तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांकडे तपासणी करावी. अशा रुग्णांचे ‘थ्रोट स्वॅब’ तपासणीकरिता नागपूर येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात येतात. परंतु कुठलाही व्यक्ती जर ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात नसेल व त्याला साधारण ताप सर्दी, खोकला, अशी लक्षणे असतील तर त्यांनी घाबरू नये. आतापर्यंत चारजण विदेशातून परतले. त्यापैकी तीन जण चीनमधून, तर एक हाँगकाँगहून आले आहे. पैकी दोघांना सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे आढळल्याने त्यांचे ‘थ्रोट स्वॅब’ पुणे व नागपूर येथे पाठविले होते. मात्र, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. २९ जानेवारीचा स्वॅब पुणे येथे, तर १० फेब्रुवारीचा स्वॅब नागपूर येथे पाठविले होते. चारही नागरिकांना १४ दिवस त्यांच्या घरी वैद्यकीय निगराणीत ठेवले होते. ‘कोरोना’ संशयित रुग्णांकरिता इर्विनमध्ये आयसोलेशन कक्ष स्थापन करण्यात आला आहे.गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळाजिल्ह्यात जरी एकही ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नसला तरी खबरदारी म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. शिंकताना किंवा खोकलताना तोंडावर रुमाल ठेवावा. खुर्ची, टेबल किंवा इतर वस्तुनांना हात लागत असल्याने हात नेहमी स्वच्छ धुवावे. ताप, सर्दी, खोकला असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांकडे तपासणी करून घ्यावी. यामध्ये नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे असून, शक्यतोवर हस्तांदोलन करण्याचे टाळावे.संशयितांची लक्षणेएखादी व्यक्ती जर ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आली असेल व त्याला ताप, खोकला, किंवा सर्दी अशी लक्षणे असतील तर ती ‘कोरोना’ संशयित रुग्णांची लक्षणे मानली जातात. त्यांनी तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांकडे जावून थ्रोट स्वॅप तपासणी करणे गरजेचे आहे. त्यामध्ये संशयित असला तरी पण पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हे स्वॅप तपासणी नंतरच ठरते.‘कोरोना’ व्हायरस आठ तास राहतो वातावरणात‘कोरोना’ हा व्हायरस साधारणत: आठ तास वातावरणात जिवंत राहतो. त्यामुळे त्याचा संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक असतो. पॉझिटिव्ह रुग्ण शिंकताना त्याने रुमालाला हात लावल्या तो हात तो ज्या ठिकाणी लागेल, उदा. खुर्ची, बायोमेट्रिक, टेबल, इतर वस्तूला दुसऱ्याने हात लावल्यास त्यालासुद्धा संसर्गाचा धोका असतो. याचा प्रादुर्भाव हवेतून सुद्धा होतो, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.जिल्ह्यात एकही ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. चार नागरिक विदेशातून जिल्ह्यात आले होते. त्यापैकी दोन संशयितांचे थ्रोट स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या आजारात १०० पॉझिटिव्ह रुग्णांपैैकी फक्त पाच जणांनाच तीव्र स्वरुपाचा धोका राहू शकतो. जिल्ह्यात कुठलाही रुग्ण नसल्याने नागरिकांनी घाबरू नये, पण खबरदारी व सतर्कता बाळगली पाहिजे.- श्यामसुंदर निकम, जिल्हाशल्यचिकित्स अमरावती

टॅग्स :corona virusकोरोना