शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

आता अखर्चित निधीवर केंद्र सरकारचे अंकुश, राज्यातील लेखापालांची पुण्यात कार्यशाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 17:05 IST

केंद्र सरकारकडून विविध योजना, उपक्रमांसाठी मिळणारा निधी खर्च झाल्याचे भासवून ते अखर्चित ठेवण्याचा प्रकार राज्य शासनाच्या विविध विभागात उघडकीस आला आहे. त्यामुळे आता केंद्रांच्या निधीची इत्थंभूत माहिती पब्लिक फायन्सियल मॅनेजमेंट सर्व्हिस (पीएमफएस) या नव्या सॉफ्टवेअरमध्ये केंद्र सरकारला कळवावी लागेल.

-  गणेश वासनिक

अमरावती : केंद्र सरकारकडून विविध योजना, उपक्रमांसाठी मिळणारा निधी खर्च झाल्याचे भासवून ते अखर्चित ठेवण्याचा प्रकार राज्य शासनाच्या विविध विभागात उघडकीस आला आहे. त्यामुळे आता केंद्रांच्या निधीची इत्थंभूत माहिती पब्लिक फायन्सियल मॅनेजमेंट सर्व्हिस (पीएमफएस) या नव्या सॉफ्टवेअरमध्ये केंद्र सरकारला कळवावी लागेल. त्या अनुषंगाने राज्यभरातील लेखापालांचे पुणे येथील कार्यशाळेत प्रशिक्षण झाले. आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, सर्वशिक्षा अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, पंतप्रधान ग्राम सडक योजना, आवास योजना, सौभाग्य योजना, बेटी बचाओ योजना, जनऔषधी योजना, कृषिविमा योजना, संसद ग्राम आदी योजनांच्या अंमलबजावणीसाठी केंद्रांकडून राज्य शासनाला निधी प्राप्त होते. मात्र, केंद्रांकडून आलेला निधी वेळेपूर्वीच योजना, उपक्रमांवर खर्च न करता तो खर्च झाल्याचे प्रमाणपत्र काही विभागाकडून राज्य शासनाला पाठविले जाते. तथापि, महालेखागार कार्यालयाने केलेल्या आकस्किक तपासणीत केंद्राचा निधी अखर्चित ठेवला जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. राज्य शासनाच्या एकट्या आदिवासी विकास विभागात केंद्रीय सहाय्य अनुदान एक हजार कोटी रूपये अखर्चित ठेवल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या निधीतून विकास कामे, शैक्षणिक सुविधा, आरोग्याचा लाभ मिळावा, यासाठी ‘पीएफएमएस’ या नव्या सॉफ्टवेअरमधून राज्याच्या विविध विभागांना निधीबाबत माहिती कळवावी लागणार आहे. परिणामी केंद्र सरकारला एका क्लिकवर राज्य सरकारला दिलेल्या निधीचा प्रवास कळेल, असे नव्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आला आहे. केंद्र सरकारचा प्राप्त निधी, योजनांचे नाव, निविदा प्रक्रिया, कार्यारंभ, विकास कामांची स्थिती, काम करणारी एजन्सी आदी माहिती याच सॉफ्टवेअरमध्ये अपलोड करावी लागणार आहे. केंद्र सरकारने पाठविलेला निधी, अनुदान त्याच वर्षी खर्च व्हावे, ते अखर्चित राहू नये, अशी नवे सॉफ्टवेअर विकसित करण्यामागील भूमिका पुणे येथे पार पडलेल्या कार्यशाळेतून स्पष्ट करण्यात आले आहे.

एटीसी, पीओ कार्यालयातील लेखापालांची हजेरीकेंद्र सरकारच्या अखर्चित निधीबाबत पुणे येथे आदिवासी विकास विभागाच्या लेखापालांची दोन दिवसीय कार्यशाळा २७ व २८ नोव्हेंबर रोजी पार पडली. या कार्यशाळेत आदिवासी विकास विभाग अपर आयुक्त (एटीसी) आणि प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे (पीओ) लेखापाल प्रामुख्याने हजर होते. आदिवासी विकास विभागाचे सहसचिव सुनील पाटील यांनी निधी अखर्चित राहू नये, याबाबत मार्गदर्शन केले.

केंद्र सरकारकडून प्राप्त होणा-या निधीबाबतची माहिती आता ‘पीएमएफएस’ सॉफ्टवेअरद्वारे थेट दिल्ली येथे आॅनलाईन कळवावी लागेल. त्यामुळे निधीचा प्रवास कुठे, कसा सुरू आहे, हे क्षणात केंद्र सरकारला कळेल.- किशोर गुल्हाने,उपायुक्त, (लेखा) आदिवासी विकास विभाग, अमरावती

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र