शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

समाजालाच मुख्य प्रवाहात आणण्याची गरज

By admin | Updated: January 3, 2016 00:41 IST

इतरांना पकडण्यासाठी समंस लागतो. मात्र पारधी समाजातील लोकांना पकडण्यासाठी कुठलाही समंस लागत नाही. येथे संपूर्ण जातीलाच गुन्हेगार ठरविले जाते.

गिरीश प्रभुणे : सामाजिक कार्यकर्त्यांचे मनोगत अमरावती : इतरांना पकडण्यासाठी समंस लागतो. मात्र पारधी समाजातील लोकांना पकडण्यासाठी कुठलाही समंस लागत नाही. येथे संपूर्ण जातीलाच गुन्हेगार ठरविले जाते. त्यामुळे केवळ पारधी बांधवांना नव्हे, तर या समाजालाच घटनेच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे असल्याचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांनी केले. ‘शोध मराठी मनाचा’ या संमेलनाच्या शेवटच्या दिवसातील तिसऱ्या सत्रातील ‘आधारवड’ या संकल्पनेंतर्गत प्रभुणे बोलते झाले. तुळजापूर, सोलापूर, लातूर, मंगळवेढा या भागात पारधी बांधवांवर होणारे अनन्वित छळ सहन न झाल्याने ‘समरसता’ मंचाद्वारे यात स्वत:ला गुंतवून घेतले. आज समाज व्यवस्थाच विकृत झाली आहे. पुण्यातील गुरुकुलमध्ये अशाच गावकुसाबाहेरचे विद्यार्थी निवडले व काम सुरू झाल्याचे प्रभुणे म्हणाले. प्रभुणे यांनी ‘सामाजिक समरसता’ मंचाद्वारे भटक्या विमुक्त जाती, विशेषत: पारधी जमातीसाठी केलेले काम, उपेक्षितांच्या प्रश्नांबद्दल समाजमन जागे करण्यासाठी त्यांनी दिलेल्या प्रयत्नावर निवेदकांनी प्रकाश टाकला. भटक्या विमुक्त समाजातील लहान मुलांवर आताच योग्य संस्कार केले तर पुढच्या पिढीत खूप मोठा बदल घडेल, असे मत प्रभुणे यांनी व्यक्त केले. भटक्या विमुक्तांसारखा समाजातील शेवटचा घटक अद्यापही स्थिर झालेला नाही. उद्ध्वस्त होण्यासाठीच आपला जन्म झाला, अशी भावना त्यांच्या मनात आहे, असेही ते म्हणाले. तुळजापूर येथील पोलीस कोठडीमध्ये १३ वर्षांच्या पारधी समाजातील मुलीवर ८ जणांनी केलेला शारीरिक अत्याचार, चोर ठरवून दोन पारधी बांधवाची हत्या अशा घटना मनात खोलवर रुतून गेल्या, असा अनुभव त्यांनी सांगितला. कोरकू समाज भीक मागत नाही - देशपांडे मेळघाटातील आदिवासी सामर्थ्याच्या आधारे जगतो. तो कधी भीक मागत नाही, चोरी करीत नाही आणि खोटं बोलत नाही, तो आजही मूल्याधारित जीवन जगत असल्याचे मेळघाटातील सामाजिक कार्यकर्ते सुनील देशपांडे यांनी सांगितले. मेळघाटातील बहादा येथे बांबू केंद्र चालवून आदिवासी, त्यांच्या संस्कृतीशी समरस झालेल्या देशपांडेंनी आदिवासी संस्कृतीचे अंतरंग उलगडले. तेथे जातपंचायत नाही तर गाव पंचायत आहे. तेथे कुपोषणाची समस्या नाही तर आहाराची आवश्यकता आहे. समाजात समस्या नसते. केवळ सुविधेची वानवा असते, असेही देशपांडेंनी नमूद केले. देशपांडे दांपत्य अनेक वर्षांपासून बांबूपासून कलाकुसरीच्या वस्तुंची निर्मिती करून त्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत आहेत. घटस्फोटाचा सल्ला पत्नीला ‘स्क्रि झेफिनिया’ या मानसिक आजाराने ग्रासल्याचे सांगत संबंधित डॉक्टराने थेट घटस्फोटाचा सल्ला दिला व तेथून सामाजिक कार्याला सुरूवात झाली अशी आठवण कॅनडा येथील जगनाथवाणी यांनी अमरावतीकरांसाठी उलगडली. कॅनडामध्ये राहणारे जगन्नाथवाणी यांनी तेथील सरकारच्या मदतीने ‘मॅजिक फंड’च्या स्वरुपात दोन देशांना जोडणारे कार्य सुरू केले. कॅनडा सरकारच्या मदतीने भारतात ‘स्क्रि झोपेनिया’वर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी शिष्यवृत्ती सुरू केली.