शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

समाजालाच मुख्य प्रवाहात आणण्याची गरज

By admin | Updated: January 3, 2016 00:41 IST

इतरांना पकडण्यासाठी समंस लागतो. मात्र पारधी समाजातील लोकांना पकडण्यासाठी कुठलाही समंस लागत नाही. येथे संपूर्ण जातीलाच गुन्हेगार ठरविले जाते.

गिरीश प्रभुणे : सामाजिक कार्यकर्त्यांचे मनोगत अमरावती : इतरांना पकडण्यासाठी समंस लागतो. मात्र पारधी समाजातील लोकांना पकडण्यासाठी कुठलाही समंस लागत नाही. येथे संपूर्ण जातीलाच गुन्हेगार ठरविले जाते. त्यामुळे केवळ पारधी बांधवांना नव्हे, तर या समाजालाच घटनेच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे असल्याचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांनी केले. ‘शोध मराठी मनाचा’ या संमेलनाच्या शेवटच्या दिवसातील तिसऱ्या सत्रातील ‘आधारवड’ या संकल्पनेंतर्गत प्रभुणे बोलते झाले. तुळजापूर, सोलापूर, लातूर, मंगळवेढा या भागात पारधी बांधवांवर होणारे अनन्वित छळ सहन न झाल्याने ‘समरसता’ मंचाद्वारे यात स्वत:ला गुंतवून घेतले. आज समाज व्यवस्थाच विकृत झाली आहे. पुण्यातील गुरुकुलमध्ये अशाच गावकुसाबाहेरचे विद्यार्थी निवडले व काम सुरू झाल्याचे प्रभुणे म्हणाले. प्रभुणे यांनी ‘सामाजिक समरसता’ मंचाद्वारे भटक्या विमुक्त जाती, विशेषत: पारधी जमातीसाठी केलेले काम, उपेक्षितांच्या प्रश्नांबद्दल समाजमन जागे करण्यासाठी त्यांनी दिलेल्या प्रयत्नावर निवेदकांनी प्रकाश टाकला. भटक्या विमुक्त समाजातील लहान मुलांवर आताच योग्य संस्कार केले तर पुढच्या पिढीत खूप मोठा बदल घडेल, असे मत प्रभुणे यांनी व्यक्त केले. भटक्या विमुक्तांसारखा समाजातील शेवटचा घटक अद्यापही स्थिर झालेला नाही. उद्ध्वस्त होण्यासाठीच आपला जन्म झाला, अशी भावना त्यांच्या मनात आहे, असेही ते म्हणाले. तुळजापूर येथील पोलीस कोठडीमध्ये १३ वर्षांच्या पारधी समाजातील मुलीवर ८ जणांनी केलेला शारीरिक अत्याचार, चोर ठरवून दोन पारधी बांधवाची हत्या अशा घटना मनात खोलवर रुतून गेल्या, असा अनुभव त्यांनी सांगितला. कोरकू समाज भीक मागत नाही - देशपांडे मेळघाटातील आदिवासी सामर्थ्याच्या आधारे जगतो. तो कधी भीक मागत नाही, चोरी करीत नाही आणि खोटं बोलत नाही, तो आजही मूल्याधारित जीवन जगत असल्याचे मेळघाटातील सामाजिक कार्यकर्ते सुनील देशपांडे यांनी सांगितले. मेळघाटातील बहादा येथे बांबू केंद्र चालवून आदिवासी, त्यांच्या संस्कृतीशी समरस झालेल्या देशपांडेंनी आदिवासी संस्कृतीचे अंतरंग उलगडले. तेथे जातपंचायत नाही तर गाव पंचायत आहे. तेथे कुपोषणाची समस्या नाही तर आहाराची आवश्यकता आहे. समाजात समस्या नसते. केवळ सुविधेची वानवा असते, असेही देशपांडेंनी नमूद केले. देशपांडे दांपत्य अनेक वर्षांपासून बांबूपासून कलाकुसरीच्या वस्तुंची निर्मिती करून त्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत आहेत. घटस्फोटाचा सल्ला पत्नीला ‘स्क्रि झेफिनिया’ या मानसिक आजाराने ग्रासल्याचे सांगत संबंधित डॉक्टराने थेट घटस्फोटाचा सल्ला दिला व तेथून सामाजिक कार्याला सुरूवात झाली अशी आठवण कॅनडा येथील जगनाथवाणी यांनी अमरावतीकरांसाठी उलगडली. कॅनडामध्ये राहणारे जगन्नाथवाणी यांनी तेथील सरकारच्या मदतीने ‘मॅजिक फंड’च्या स्वरुपात दोन देशांना जोडणारे कार्य सुरू केले. कॅनडा सरकारच्या मदतीने भारतात ‘स्क्रि झोपेनिया’वर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी शिष्यवृत्ती सुरू केली.