शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

Lok Sabha Election 2019; नवनीत यांचे चिन्ह गोठवले ऐनवेळी अडचणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 23:09 IST

नवनीत राणा यांनी ज्या ‘टीव्ही’ चिन्हाचा निवडणुकीपूर्वीच कौशल्यपूर्ण प्रचार केला, ते त्यांना अपेक्षित असलेले चिन्ह अखेर निवडणूक आयोगाने शुक्रवारी गोठविले. मतदानाला दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना अनपेक्षितपणे बसलेल्या या झटक्यामुळे नवनीत राणा यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

ठळक मुद्देआयोगाचा निर्णय : बसणार फटका, प्रतिस्पर्ध्याला लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: नवनीत राणा यांनी ज्या ‘टीव्ही’ चिन्हाचा निवडणुकीपूर्वीच कौशल्यपूर्ण प्रचार केला, ते त्यांना अपेक्षित असलेले चिन्ह अखेर निवडणूक आयोगाने शुक्रवारी गोठविले. मतदानाला दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना अनपेक्षितपणे बसलेल्या या झटक्यामुळे नवनीत राणा यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.नवनीत राणा या लोकसभेच्या उमेदवार आहेत. निवडणूक चिन्हांचे वाटप होण्यापूर्वीच त्यांनी अनेक ठिकाणी जाहीरपणे या चिन्हाचा वापर केला, अशी तक्रारदेखील या अनुषंगाने निवडणूक आयोगाला करण्यात आली होती. मावळते खासदार आनंदराव अडसूळ यांनी स्वत: जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जाऊन चिन्हाच्या या मुद्याबाबत तक्रार नोंदविली होती.नवनीत राणा यांचा युवा स्वाभिमान हा पक्ष राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत आहे. परंतु,तो केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदविण्यात आलेला नाही. निवडणूक ही लोकसभेची असल्यामुळे टीव्ही हे चिन्ह गोठविण्याचादेखील मुद्दा समोर आला.ऐनवेळीची अडचण, वेळही अपुरानवनीत राणा यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आनंदराव अडसूळ हे ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. आनंदराव आणि ‘धनुष्यबाण’ हे समीकरण जिल्हाभरात परिचित आहे.नवनीत राणा यांच्याबाबत मात्र चित्र विपरीत आहे. त्या राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवार नाहीत. त्यामुळे त्यांचे बोधचिन्ह अपरिचित आहे. हा मुद्दा राणा यांनी फार पूर्वी हेरला होता. त्याचमुळे त्यांनी टीव्ही या चिन्हाचा वापर करणे सुरू केले होते. चिन्ह जिल्हाभरात पोहोचावे, हा त्यामागचा हेतू होता. त्यात बहुअंशी त्या यशस्वी झालेही; परंतु आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर टीव्ही चिन्ह गोठल्यामुळे सर्वत्र, गाव-खेड्यांत आणि मेळघाटसारख्या दुर्गम भागात त्यांना आयोगाने दिलेले नवेकोरे बोधचिन्ह पोहचविणे हे पृथ्वीला गवसणी घालण्यासम आहे.मतदारंघातील काही भागांत नवनीत राणा यांना बोधचिन्हाच्या तांत्रिक कारणामुळे फटका बसण्याची शक्यता आहे. पूर्वी टीव्ही या चिन्हाचा प्रसार झाल्यामुळे आताचे नवे चिन्ह पोहोचलेही तरी संभ्रमाची स्थिती निर्माण होऊ शकते.