शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; नवनीत यांचे चिन्ह गोठवले ऐनवेळी अडचणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 23:09 IST

नवनीत राणा यांनी ज्या ‘टीव्ही’ चिन्हाचा निवडणुकीपूर्वीच कौशल्यपूर्ण प्रचार केला, ते त्यांना अपेक्षित असलेले चिन्ह अखेर निवडणूक आयोगाने शुक्रवारी गोठविले. मतदानाला दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना अनपेक्षितपणे बसलेल्या या झटक्यामुळे नवनीत राणा यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

ठळक मुद्देआयोगाचा निर्णय : बसणार फटका, प्रतिस्पर्ध्याला लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: नवनीत राणा यांनी ज्या ‘टीव्ही’ चिन्हाचा निवडणुकीपूर्वीच कौशल्यपूर्ण प्रचार केला, ते त्यांना अपेक्षित असलेले चिन्ह अखेर निवडणूक आयोगाने शुक्रवारी गोठविले. मतदानाला दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना अनपेक्षितपणे बसलेल्या या झटक्यामुळे नवनीत राणा यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.नवनीत राणा या लोकसभेच्या उमेदवार आहेत. निवडणूक चिन्हांचे वाटप होण्यापूर्वीच त्यांनी अनेक ठिकाणी जाहीरपणे या चिन्हाचा वापर केला, अशी तक्रारदेखील या अनुषंगाने निवडणूक आयोगाला करण्यात आली होती. मावळते खासदार आनंदराव अडसूळ यांनी स्वत: जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जाऊन चिन्हाच्या या मुद्याबाबत तक्रार नोंदविली होती.नवनीत राणा यांचा युवा स्वाभिमान हा पक्ष राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत आहे. परंतु,तो केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदविण्यात आलेला नाही. निवडणूक ही लोकसभेची असल्यामुळे टीव्ही हे चिन्ह गोठविण्याचादेखील मुद्दा समोर आला.ऐनवेळीची अडचण, वेळही अपुरानवनीत राणा यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आनंदराव अडसूळ हे ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. आनंदराव आणि ‘धनुष्यबाण’ हे समीकरण जिल्हाभरात परिचित आहे.नवनीत राणा यांच्याबाबत मात्र चित्र विपरीत आहे. त्या राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवार नाहीत. त्यामुळे त्यांचे बोधचिन्ह अपरिचित आहे. हा मुद्दा राणा यांनी फार पूर्वी हेरला होता. त्याचमुळे त्यांनी टीव्ही या चिन्हाचा वापर करणे सुरू केले होते. चिन्ह जिल्हाभरात पोहोचावे, हा त्यामागचा हेतू होता. त्यात बहुअंशी त्या यशस्वी झालेही; परंतु आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर टीव्ही चिन्ह गोठल्यामुळे सर्वत्र, गाव-खेड्यांत आणि मेळघाटसारख्या दुर्गम भागात त्यांना आयोगाने दिलेले नवेकोरे बोधचिन्ह पोहचविणे हे पृथ्वीला गवसणी घालण्यासम आहे.मतदारंघातील काही भागांत नवनीत राणा यांना बोधचिन्हाच्या तांत्रिक कारणामुळे फटका बसण्याची शक्यता आहे. पूर्वी टीव्ही या चिन्हाचा प्रसार झाल्यामुळे आताचे नवे चिन्ह पोहोचलेही तरी संभ्रमाची स्थिती निर्माण होऊ शकते.