शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

Lok Sabha Election 2019; नवनीत यांचे चिन्ह गोठवले ऐनवेळी अडचणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 23:09 IST

नवनीत राणा यांनी ज्या ‘टीव्ही’ चिन्हाचा निवडणुकीपूर्वीच कौशल्यपूर्ण प्रचार केला, ते त्यांना अपेक्षित असलेले चिन्ह अखेर निवडणूक आयोगाने शुक्रवारी गोठविले. मतदानाला दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना अनपेक्षितपणे बसलेल्या या झटक्यामुळे नवनीत राणा यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

ठळक मुद्देआयोगाचा निर्णय : बसणार फटका, प्रतिस्पर्ध्याला लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: नवनीत राणा यांनी ज्या ‘टीव्ही’ चिन्हाचा निवडणुकीपूर्वीच कौशल्यपूर्ण प्रचार केला, ते त्यांना अपेक्षित असलेले चिन्ह अखेर निवडणूक आयोगाने शुक्रवारी गोठविले. मतदानाला दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना अनपेक्षितपणे बसलेल्या या झटक्यामुळे नवनीत राणा यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.नवनीत राणा या लोकसभेच्या उमेदवार आहेत. निवडणूक चिन्हांचे वाटप होण्यापूर्वीच त्यांनी अनेक ठिकाणी जाहीरपणे या चिन्हाचा वापर केला, अशी तक्रारदेखील या अनुषंगाने निवडणूक आयोगाला करण्यात आली होती. मावळते खासदार आनंदराव अडसूळ यांनी स्वत: जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जाऊन चिन्हाच्या या मुद्याबाबत तक्रार नोंदविली होती.नवनीत राणा यांचा युवा स्वाभिमान हा पक्ष राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत आहे. परंतु,तो केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदविण्यात आलेला नाही. निवडणूक ही लोकसभेची असल्यामुळे टीव्ही हे चिन्ह गोठविण्याचादेखील मुद्दा समोर आला.ऐनवेळीची अडचण, वेळही अपुरानवनीत राणा यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आनंदराव अडसूळ हे ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. आनंदराव आणि ‘धनुष्यबाण’ हे समीकरण जिल्हाभरात परिचित आहे.नवनीत राणा यांच्याबाबत मात्र चित्र विपरीत आहे. त्या राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवार नाहीत. त्यामुळे त्यांचे बोधचिन्ह अपरिचित आहे. हा मुद्दा राणा यांनी फार पूर्वी हेरला होता. त्याचमुळे त्यांनी टीव्ही या चिन्हाचा वापर करणे सुरू केले होते. चिन्ह जिल्हाभरात पोहोचावे, हा त्यामागचा हेतू होता. त्यात बहुअंशी त्या यशस्वी झालेही; परंतु आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर टीव्ही चिन्ह गोठल्यामुळे सर्वत्र, गाव-खेड्यांत आणि मेळघाटसारख्या दुर्गम भागात त्यांना आयोगाने दिलेले नवेकोरे बोधचिन्ह पोहचविणे हे पृथ्वीला गवसणी घालण्यासम आहे.मतदारंघातील काही भागांत नवनीत राणा यांना बोधचिन्हाच्या तांत्रिक कारणामुळे फटका बसण्याची शक्यता आहे. पूर्वी टीव्ही या चिन्हाचा प्रसार झाल्यामुळे आताचे नवे चिन्ह पोहोचलेही तरी संभ्रमाची स्थिती निर्माण होऊ शकते.