शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्ग खिळखिळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 05:00 IST

शासनाच्या लेखी या महामार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी प्रत्यक्षात अनेक कामे अपूर्ण आहेत. पाच वर्षे रस्त्याची देखभाल कंत्राटदार कंपनीकडे आहे. मात्र कंत्राटदार नॉट रिचेबल तर, यावर नियंत्रण ठेवणारे शासकीय अधिकारी सुद्धा गायब झाल्याची ओरड आहे . वाहने अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातामध्ये दुभाजकावरील लोखंडी कठडे तुटले आहे.

ठळक मुद्देदेखभाल करते तरी कोण ? : पथदिवे बंद, दुभाजकांचे सुरक्षा कठडे तुटले

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड/जरूड : वरुड अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्र ३५३ खिळखिया झाला आहे. या महामार्गावर उभारलेले पथदिवे बंद आहेत. तर दुभाजकावरील कठडे तुटून पडले आहेत. हा मार्ग अपघाताला निमंत्रण देणारा ठरला आहे.शासनाच्या लेखी या महामार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी प्रत्यक्षात अनेक कामे अपूर्ण आहेत. पाच वर्षे रस्त्याची देखभाल कंत्राटदार कंपनीकडे आहे. मात्र कंत्राटदार नॉट रिचेबल तर, यावर नियंत्रण ठेवणारे शासकीय अधिकारी सुद्धा गायब झाल्याची ओरड आहे . वाहने अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातामध्ये दुभाजकावरील लोखंडी कठडे तुटले आहे. दोन महिने लोटूनही दुरुस्ती करण्यात आली नाही. तर पथदिवे सुद्धा बंद आहेत. यामुळे अपघाताला आमंत्रण मिळत आहे. देखभाल करणारी कंपनी करते तरी काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सुद्धा दुर्लक्ष करीत असल्याने कोट्यवधी रुपयांच्या रस्त्याचे वाटोळे होत आहे.सन २०१८ मध्ये नांदगाव पेठ ते जलालखेडा नागपूर आणि पांढुर्णा मध्यप्रदेश सीमेपर्यंत हा तीनपदरी सिमेंटचा राष्ट्रीय महामार्ग तयार झाला. सदर रस्त्याच्या निर्मितीसोबतच पुढील पाच वर्षे या महामार्गाची देखभाल सुद्धा कंपनीला करावयाची आहे. सहा महिन्यातच रस्त्याला तडे गेले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते दबल्या गेले आहेत. तर रस्त्याच्या कडा सुद्धा भरल्या गेलेल्या नाहीत.सुविधा गायब, कार्यालयही नाहीराष्ट्रीय महामार्ग असल्याने कंपनीकडून या मार्गावर रुग्णवाहिका, क्रेन, टो व्हॅन ठेवणे बंधनकारक आहे. एवढेच काय तर कंपनीचे किंवा महामार्ग प्राधिकरणाचे कार्यालय सुद्धा येथे नाही. यामुळे नागरिकांनी तक्रार कुणाकडे करावी? हा प्रश्न आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांचे मौन संशयाला खतपाणी देणारे आहे. पुसला रस्त्यावर मधोमध जीवघेणा खडडा पडला. अनेक दुचाकी त्या खड्ड्यात आदळून अपघातग्रस्त झाल्या. वरुड शहरात शुद्ध तीच परिस्थिती आहे. कंपनीचे अधिकारी नागरिकांच्या मरणाची वाट पाहत आहे का, असा प्रश्न वरूडकरांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :electricityवीज