शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या उघड्या डीबी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:01 IST

महावितरणने शहरात काही भागांमध्ये वीजप्रवाहासाठी भुयारी केबल टाकले आहेत, तर बऱ्याच ठिकाणी विद्युत प्रवाहासाठी ट्रान्सफार्मरखाली डीबी उभारण्यात आल्या आहेत. या डीबीतून उच्च दाबाच्या वीजप्रवाहाचा संचार होत असताना त्याला समोरील भागात झाकण नाही, असे चित्र सर्वदूर आहे. हल्ली पावसाळा सुरू झाला असताना डीबीला झाकण नसल्याने पावसाचे पाणी आतमध्ये शिरण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देउच्च दाब वीज प्रवाह : लोकवस्ती भागात अप्रिय घटनेला जबाबदार कोण?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अर्थात महावितरणने उभारलेले विद्युत वितरण बॉक्स (डीबी) बहुतांश ठिकाणी सताड उघडे असल्याने ते धोकादायक ठरणारे आहे. काही डीबी या नाल्याच्या काठावर, मैदाने, क्रीडागंणालगत असल्याने त्यातून होणाऱ्या उच्च दाब वीज प्रवाहामुळे जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. या गंभीर बाबीकडे महावितरणने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.महावितरणने शहरात काही भागांमध्ये वीजप्रवाहासाठी भुयारी केबल टाकले आहेत, तर बऱ्याच ठिकाणी विद्युत प्रवाहासाठी ट्रान्सफार्मरखाली डीबी उभारण्यात आल्या आहेत. या डीबीतून उच्च दाबाच्या वीजप्रवाहाचा संचार होत असताना त्याला समोरील भागात झाकण नाही, असे चित्र सर्वदूर आहे. हल्ली पावसाळा सुरू झाला असताना डीबीला झाकण नसल्याने पावसाचे पाणी आतमध्ये शिरण्याची शक्यता आहे. डीबीचे झाकण चोरीस जाते की ते तोडले जाते, याबाबत महावितरण शोध घेण्यास अपयशी ठरली आहे. डीबी उभारल्यानंतर कर्मचारी त्याकडे लक्ष देत नाहीत. विद्युत प्रवाहासाठी असलेल्या डीबीची डागडुजी, दुरुस्तीकरिता पुढाकार घेण्यात येत नाही, हे वास्तव आहे.झाकण दुरूस्तीसाठी टाळाटाळडीबीचे झाकण तुटले अथवा नादुरुस्त असल्यास ते पुन्हा योग्य करण्याची जाबाबदारी महावितरणची आहे. असे असताना शहर वा ग्रामीण भागात ट्रॉन्सफार्मरच्या खाली उभारण्यात आलेल्या डीबी कधी सुरळीत होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. जीवितहानी झाल्यानंतर महावितरण कंपनीला जाग येईल का, असा जाब नागरिकांकडून विचारला जात आहे. झाक ण दुरुस्तीसाठी होत असलेली टाळाटाळ थांबावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.तीन महिन्यांच्या वीज देयकांनी ग्राहक त्रस्तमहावितरणने लॉकडाऊनच्या काळातील तब्बल तीन महिन्यांची वीज देयके ग्राहकांना पाठविली. रक्कम पाहून अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. गरीब, कष्टकरी, शेतमजूर, कामगार मार्च ते मे असे तीन महिने घरीच लॉकडाऊन होते. आता कोरोनासह या नव्या वीज देयकांचा सामना करावा लागत आहे. तीन महिन्यांचे वीज देयके माफ करावेत, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक, कष्टकऱ्यांमधून होत आहे.

टॅग्स :electricityवीज