शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

'उमेदवार शिंदेंचे पण उमेदवारी द्यायची की नाही भाजप ठरवते, अफलातून कारभार'; बच्चू कडू यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 13:39 IST

Bachchu Kadu : आमदार बच्चू कडू यांनी भाजपावर जोरदार टीका केली.

Bachchu Kadu ( Marathi News ) : लोकसभा निवडणुका संपल्या. आता विधानसभा निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू आहेत. महायुती एकत्रित विधानसभा निवडणुका लढणार असल्याचे बोलले जात आहे. तर लोकसभा निवडणुकीतील जागावाटपावरुन अजुनही चर्चा सुरू आहेत. आमदार बच्चू कडू यांनी आज जागावाटपावरुन भाजपावर जोरदार निशाणा साधला. "हिंगोलीमध्ये एकनाथ शिंदे यांचा उमेदवार बदलला उमेदवार शिंदेंचा आणि ठरवते भाजपा हा अफलातून कारभार आहे',असा टोलाही आमदार बच्चू कडू यांनी लगावला. 

आरक्षण सुरक्षित कसे हे सांगा,लक्ष्मण हाकेंचा शिष्टमंडळाला प्रश्न; मुंबईतील चर्चेचे निमंत्रण स्वीकारले

"हेमंत पाटील यांची उमेदवारी नाकारली, त्या जागेवर उमेदवार द्यायचे की नाही हे भाजपा ठरवणार. अजित पवार यांच्या पक्षाचेही उमेदवार भाजपा ठरवत आहे. अमरावतीमध्ये सगळे एकत्र येऊन नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नका म्हणत होते पण, तिथे त्यांनी उमेदवारी दिली. - जिथे महायुतीचे उमेदवार पडले त्या जागेची भाजप मागणी करत होते पण बदलले नाही, सोबत घेऊन अशा प्रकारचे वागणे चुकीचे आहे अशामुळे भाजपवर कोणी विश्वास ठेवणार नाही, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले.

आमदार बच्चू कडू यांनी पोलीस अधीक्षकांना लिहिले पत्र

आमदार बच्चू कडू यांच्या बाबतीत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आमदार कडू यांच्या जीवाला धोका असल्याची बातमी समोर आली आहे. याबाबत बच्चू कडू यांनी स्वत: जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र दिले आहे. जीवाला धोका असल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. या पत्रामुळे आता मोठी खळबळ उडाली आहे. 

पोलीस अधीक्षकांना दिलेल्या पत्रात माझा अपघात झाल्याची अफवाही पसरवली जात असल्याचं म्हटलं आहे. "गोपनीय माहितीद्वारे माझ्या जीवाला धोका अलल्याचं कडू यांनी पक्षात म्हटले आहे. काही दिवसापासून बच्चू कडू यांच्या निकटवर्तीयांना अज्ञात व्यक्तीकडून फोन जात आहेत. या फोनमध्ये बच्चू कडू यांचा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी मागणी करण्यात आली आहे. 

"गेल्या काही दिवसापासून मी अमरावती जिल्ह्याच्या बाहेर गेलो की माझ्या जवळच्या व्यक्तीला फोन येतो आणि अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या सगळ्यापाठिमागे कोण आहे माहित नाही, पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घ्यावा. कार्यकर्त्यांनाही अज्ञात व्यक्तीकडून फोन येत आहे. काही लोक मुद्दाम करत असतील. आपण सावध राहूया, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले.  

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस